शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

सततच्या लाॅकडॉऊनमुळे बळिराजा आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST

खरीप हंगाम नापिकीचा ठरल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, मका, हरभऱ्याची पेरणी अधिक प्रमाणात केली होती. हा माल घरात येत ...

खरीप हंगाम नापिकीचा ठरल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, मका, हरभऱ्याची पेरणी अधिक प्रमाणात केली होती. हा माल घरात येत नाही तोच कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने शासनाने राज्यात लॉकडाऊन लागू केले. या लॉकडाऊन काळात वाहतूक तसेच इतर मोठ्या शहरात व्यवहार बंद असल्याने व्यापारीही शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यास कचरत आहे. त्यामुळे या हंगामात घरी आलेला माल शेतकऱ्याच्या घरामध्ये पडून असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

खेडा खरेदीतसुद्धा शेतकरी लुबाडला जात आहे

सद्य:स्थितीत शेतीच्या मशागतीची कामे सुरू असून, त्यासाठी लागणारी मजुरांची मजुरी अथवा यंत्राचे भाडे देण्यासाठीसुद्धा शेतकऱ्यांकडे पैसा उपलब्ध नसल्याने काही शेतकऱ्यांची मशागतीची कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूर आर्थिक विवंचनेत आहे. शेतकऱ्याकडेच आर्थिक सुबत्ता नसल्यामुळे जगण्याचे मोठे हाल होत आहे.

शेतीची मशागत यंत्राच्या साह्याने केल्याशिवाय शेतकऱ्याकडे पर्याय उरला नाही. तसेच डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्‍टरचेही दर वाढले आहेत. त्यामुळे शेती करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

चारा टंचाई

चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांना बैलजोडी ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेती मशागतीसाठी आधुनिक तंत्राचा वापर वाढल्याचे चित्र आहे.

खरीप हंगामापूर्वी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. खरीप हंगामासाठी प्रशासनाने कृषीविषयक दुकानाची वेळ वाढवून दिली आहे. मात्र, संचार बंदीमुळे शेतकऱ्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. बी-बियाणे, खतेही महागण्याचे चित्र आहे. आधीच पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दुसरीकडे भाव वाढ झाल्याने शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढवले आहे.