शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

सततच्या लाॅकडॉऊनमुळे बळिराजा आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST

खरीप हंगाम नापिकीचा ठरल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, मका, हरभऱ्याची पेरणी अधिक प्रमाणात केली होती. हा माल घरात येत ...

खरीप हंगाम नापिकीचा ठरल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, मका, हरभऱ्याची पेरणी अधिक प्रमाणात केली होती. हा माल घरात येत नाही तोच कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने शासनाने राज्यात लॉकडाऊन लागू केले. या लॉकडाऊन काळात वाहतूक तसेच इतर मोठ्या शहरात व्यवहार बंद असल्याने व्यापारीही शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यास कचरत आहे. त्यामुळे या हंगामात घरी आलेला माल शेतकऱ्याच्या घरामध्ये पडून असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

खेडा खरेदीतसुद्धा शेतकरी लुबाडला जात आहे

सद्य:स्थितीत शेतीच्या मशागतीची कामे सुरू असून, त्यासाठी लागणारी मजुरांची मजुरी अथवा यंत्राचे भाडे देण्यासाठीसुद्धा शेतकऱ्यांकडे पैसा उपलब्ध नसल्याने काही शेतकऱ्यांची मशागतीची कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूर आर्थिक विवंचनेत आहे. शेतकऱ्याकडेच आर्थिक सुबत्ता नसल्यामुळे जगण्याचे मोठे हाल होत आहे.

शेतीची मशागत यंत्राच्या साह्याने केल्याशिवाय शेतकऱ्याकडे पर्याय उरला नाही. तसेच डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्‍टरचेही दर वाढले आहेत. त्यामुळे शेती करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

चारा टंचाई

चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांना बैलजोडी ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेती मशागतीसाठी आधुनिक तंत्राचा वापर वाढल्याचे चित्र आहे.

खरीप हंगामापूर्वी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. खरीप हंगामासाठी प्रशासनाने कृषीविषयक दुकानाची वेळ वाढवून दिली आहे. मात्र, संचार बंदीमुळे शेतकऱ्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. बी-बियाणे, खतेही महागण्याचे चित्र आहे. आधीच पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दुसरीकडे भाव वाढ झाल्याने शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढवले आहे.