शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

एकाधिकार खरेदी केंद्रांकडे पाठ : अवघी दिडशे क्विंटल तूर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 17:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकाधिकार तूर खरेदीला शेतक:यांकडून अद्यापही अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. नंदुरबारातील केंद्रात केवळ 148 क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. अक्कलकुवा व नवापूर तालुक्यातून अद्याप एकही शेतकरी तूर विक्रीसाठी आलेला नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, खुल्या बाजारात एकाधिकारी खरेदी केंद्रापेक्षा 200 ते 300 रुपये जादा भाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकाधिकार तूर खरेदीला शेतक:यांकडून अद्यापही अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. नंदुरबारातील केंद्रात केवळ 148 क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. अक्कलकुवा व नवापूर तालुक्यातून अद्याप एकही शेतकरी तूर विक्रीसाठी आलेला नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, खुल्या बाजारात एकाधिकारी खरेदी केंद्रापेक्षा 200 ते 300 रुपये जादा भाव मिळत असल्याने शेतक:यांचा त्याकडे कल आहे.नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबारसह शहादा येथे एकाधिकार तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. दोन्ही केंद्रांना प्रत्येकी तीन तालुके जोडण्यात आली आहेत. मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या या केंद्रांना शेतक:यांचा मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तीन तालुके मिळून एकच खरेदी केंद्र असल्यामुळे शिवाय ऑनलाईन नोंदणी करावी लागणार असल्यामुळे प्रतिसाद कमी असल्याचेही दिसून येत आहे.यंदा 16 हजार हेक्टरतुरीचे क्षेत्र यंदा दोन ते तीन हजार हेक्टरने वाढले होते. सरासरी क्षेत्र 15 हजार हेक्टर्पयत आहे. परंतु दरवर्षी 12 ते 14 हजार हेक्टर्पयत क्षेत्र असते. यंदा ते 16 हजार 400 हेक्टर्पयत गेले होते. एकटय़ा नवापूर तालुक्यात तब्बल आठ हजार हेक्टर तुरीचे क्षेत्र होते. गेल्या तीन ते चार वर्षापासून तुरीला मोठय़ा प्रमाणावर भाव मिळत असल्यामुळे यंदा क्षेत्र वाढल्याचे सांगण्यात आले. यंदा पजर्न्यमान चांगली राहिल्याने उत्पादनही चांगले मिळाले. परंतु भाव कमी मिळाल्याने शेतक:यांमध्ये काही प्रमाणात नाराजीही राहिली.एकाधिकार खरेदी केंद्रतुर खरेदीसाठी एकाधिकारी खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अखेर नाफेडअंतर्गत तुरीची खरेदी करण्यासाठी शेतकरी संघामार्फत एकाधिकार खरेदी केंद्र नंदुरबारात सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. खरेदी केंद्रामुळे शेतक:यांना ते सोयीचे होईल अशी अपेक्षा होती. परंतु ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आल्यामुळे शेतक:यांनी या झंझाटातून बाहेर राहणेच पसंत केले. खरेदी केंद्रात तूर आणतांना मालाची आद्रता 12 टक्के एवढी पाहिजे. तूर विक्रीसाठी आणतांना सातबारा उतारा, आधारकार्ड, बँकचे पासबूक आदी कागदपत्रे शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयात ऑनलाईन नोंदणीसाठी आणणे शेतक:यांना बंधनकारक करण्यात आले आहे.वाहतूक खर्च परवडेनासाएका खरेदी केंद्राला तीन तालुके जोडण्यात आल्यामुळे एवढय़ा लांबून तूर विक्रीसाठी आणण्याचा खर्चच शेतक:यांना न परवडणारा आहे. अक्कलकुवा ते नंदुरबार किंवा नवापूर ते नंदुरबार इतक्या अंतराचा मालवाहतुकीचा खर्च परवडणे शेतक:यांना शक्य नाही. शिवाय भाव देखील कमी मिळत असल्यामुळे शेतक:यांचा कल सध्यातरी खरेदी केंद्रांकडे नसल्याचे चित्र आहे.