शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

एकाधिकार खरेदी केंद्रांकडे पाठ : अवघी दिडशे क्विंटल तूर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 17:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकाधिकार तूर खरेदीला शेतक:यांकडून अद्यापही अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. नंदुरबारातील केंद्रात केवळ 148 क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. अक्कलकुवा व नवापूर तालुक्यातून अद्याप एकही शेतकरी तूर विक्रीसाठी आलेला नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, खुल्या बाजारात एकाधिकारी खरेदी केंद्रापेक्षा 200 ते 300 रुपये जादा भाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकाधिकार तूर खरेदीला शेतक:यांकडून अद्यापही अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. नंदुरबारातील केंद्रात केवळ 148 क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. अक्कलकुवा व नवापूर तालुक्यातून अद्याप एकही शेतकरी तूर विक्रीसाठी आलेला नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, खुल्या बाजारात एकाधिकारी खरेदी केंद्रापेक्षा 200 ते 300 रुपये जादा भाव मिळत असल्याने शेतक:यांचा त्याकडे कल आहे.नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबारसह शहादा येथे एकाधिकार तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. दोन्ही केंद्रांना प्रत्येकी तीन तालुके जोडण्यात आली आहेत. मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या या केंद्रांना शेतक:यांचा मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तीन तालुके मिळून एकच खरेदी केंद्र असल्यामुळे शिवाय ऑनलाईन नोंदणी करावी लागणार असल्यामुळे प्रतिसाद कमी असल्याचेही दिसून येत आहे.यंदा 16 हजार हेक्टरतुरीचे क्षेत्र यंदा दोन ते तीन हजार हेक्टरने वाढले होते. सरासरी क्षेत्र 15 हजार हेक्टर्पयत आहे. परंतु दरवर्षी 12 ते 14 हजार हेक्टर्पयत क्षेत्र असते. यंदा ते 16 हजार 400 हेक्टर्पयत गेले होते. एकटय़ा नवापूर तालुक्यात तब्बल आठ हजार हेक्टर तुरीचे क्षेत्र होते. गेल्या तीन ते चार वर्षापासून तुरीला मोठय़ा प्रमाणावर भाव मिळत असल्यामुळे यंदा क्षेत्र वाढल्याचे सांगण्यात आले. यंदा पजर्न्यमान चांगली राहिल्याने उत्पादनही चांगले मिळाले. परंतु भाव कमी मिळाल्याने शेतक:यांमध्ये काही प्रमाणात नाराजीही राहिली.एकाधिकार खरेदी केंद्रतुर खरेदीसाठी एकाधिकारी खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अखेर नाफेडअंतर्गत तुरीची खरेदी करण्यासाठी शेतकरी संघामार्फत एकाधिकार खरेदी केंद्र नंदुरबारात सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. खरेदी केंद्रामुळे शेतक:यांना ते सोयीचे होईल अशी अपेक्षा होती. परंतु ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आल्यामुळे शेतक:यांनी या झंझाटातून बाहेर राहणेच पसंत केले. खरेदी केंद्रात तूर आणतांना मालाची आद्रता 12 टक्के एवढी पाहिजे. तूर विक्रीसाठी आणतांना सातबारा उतारा, आधारकार्ड, बँकचे पासबूक आदी कागदपत्रे शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयात ऑनलाईन नोंदणीसाठी आणणे शेतक:यांना बंधनकारक करण्यात आले आहे.वाहतूक खर्च परवडेनासाएका खरेदी केंद्राला तीन तालुके जोडण्यात आल्यामुळे एवढय़ा लांबून तूर विक्रीसाठी आणण्याचा खर्चच शेतक:यांना न परवडणारा आहे. अक्कलकुवा ते नंदुरबार किंवा नवापूर ते नंदुरबार इतक्या अंतराचा मालवाहतुकीचा खर्च परवडणे शेतक:यांना शक्य नाही. शिवाय भाव देखील कमी मिळत असल्यामुळे शेतक:यांचा कल सध्यातरी खरेदी केंद्रांकडे नसल्याचे चित्र आहे.