शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

नंदुरबारातील विविध भागात जुन्या वृक्षांवर सर्रास कुºहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील अनेक ढेरदार आणि जुनी वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. एक वृक्ष तोडण्याच्या बदल्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील अनेक ढेरदार आणि जुनी वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. एक वृक्ष तोडण्याच्या बदल्यात दुसऱ्या ठिकाणी वृक्षारोपण करणे आवश्यक असतांनाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विशेषत: इमारत बांधकामाला अडचणीचे ठरणाºया ठिकाणी अशी वृक्षतोड झाली आहे. याबाबत पालिकेने मात्र उदासिनतेची भुमिका घेतली आहे. यामुळे पर्यावरण प्रेमी नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.नंदुरबार शहरातील अनेक भागात जुनी ढेरेदार वृक्ष आहेत. विशेषत: जुन्या वस्तीच्या भागात अशी वृक्षे आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. शहरातील पर्यावरण टिकविण्यासाठी या वृक्षांचे मोठे योगदान असतांना अनेक बिल्डर, बांधकाम करणारे नागरिक यांनी आपल्या स्वार्थासाठी अशा वृक्षांची कत्तल केली आहे.मुख्य चौकातील वृक्षशहरातील मुख्य चौकातील वृक्षांवर ही कुºहाड चालविण्यात आली आहे. त्यात माणिक चौक, परदेशीरा समोरील शेतकी संघाजवळील, हाट दरवाजा आदी ठिकाणी ही वृक्षतोड झाली आहे. एक वृक्ष तोडल्यास त्या बदल्यात दुसरे वृक्ष लावणे आवश्यक असते. तसा नियमच आहे. परंतु शहरातील या भागात झालेल्या वृक्षतोडीबाबत मात्र सर्वच नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचा आरोप होत आहे. संबधितांवर ना पालिकेने ना वन विभागाने कारवाई केल्याचे निदर्शनास आले आहे.परवाणगी आवश्यकपालिका हद्दीतील वृक्षतोड करावयाची असल्यास पालिकेकडे अर्ज करून रितसर परवाणगी घेणे आवश्यक असते. मोठी वृक्ष राहिल्यास पालिका वन विभागाकडून ना हरकत दाखला आणण्यास सांगत असते. त्यानंतरच वृक्षतोड करता येते. शहरात गेल्या वर्षभरात झालेल्या वृक्षतोड बाबत अशी कुठलीही परवाणगी घेतली गेली किंवा कशी याबाबत संदिग्धता आहे.फाईल शोधावी लागेल...पालिकेकडे देखील याबाबत अद्ययावत रेकॉर्ड नाही. ज्या कर्मचाºयाकडे याची जबाबदारी आहे त्या कर्मचाºयाने ‘फाईल कुठे ठेवली गेली ते शोधावे लागेल’ अशी बेजबाबदार उत्तरे दिली. त्यामुळे पालिकेचेही अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचेही दिसून येत आहे.पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजीजुने व ढेरेदार वृक्ष सर्रास तोडले जात असतांना पाकिलेने देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. वन विभागाला देखील याबाबत थेट कारवाईचा अधिकार असतो. तोडलेल्या वृक्षाचे लाकूड कुठे गेले. कुठल्या सॉ मिलला ते विकण्यात आले. त्याची पावती आहे का? रितसर परवाणगी घेऊन ते लाकूड विकले गेले का? याबाबत वन विभागानेही देखील चौकशी करणे आवश्यक असतांना वन विभागाने देखील या सर्व प्रक्रियेकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वृक्षतोड करणाऱ्यांच्या पाठीमागे कुणाचा हात आणि मार्गदर्शन आहे याबाबत शहरवासीयांमध्ये चर्चा सुरू आहे.