शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील विविध भागात जुन्या वृक्षांवर सर्रास कुºहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील अनेक ढेरदार आणि जुनी वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. एक वृक्ष तोडण्याच्या बदल्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील अनेक ढेरदार आणि जुनी वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. एक वृक्ष तोडण्याच्या बदल्यात दुसऱ्या ठिकाणी वृक्षारोपण करणे आवश्यक असतांनाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विशेषत: इमारत बांधकामाला अडचणीचे ठरणाºया ठिकाणी अशी वृक्षतोड झाली आहे. याबाबत पालिकेने मात्र उदासिनतेची भुमिका घेतली आहे. यामुळे पर्यावरण प्रेमी नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.नंदुरबार शहरातील अनेक भागात जुनी ढेरेदार वृक्ष आहेत. विशेषत: जुन्या वस्तीच्या भागात अशी वृक्षे आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. शहरातील पर्यावरण टिकविण्यासाठी या वृक्षांचे मोठे योगदान असतांना अनेक बिल्डर, बांधकाम करणारे नागरिक यांनी आपल्या स्वार्थासाठी अशा वृक्षांची कत्तल केली आहे.मुख्य चौकातील वृक्षशहरातील मुख्य चौकातील वृक्षांवर ही कुºहाड चालविण्यात आली आहे. त्यात माणिक चौक, परदेशीरा समोरील शेतकी संघाजवळील, हाट दरवाजा आदी ठिकाणी ही वृक्षतोड झाली आहे. एक वृक्ष तोडल्यास त्या बदल्यात दुसरे वृक्ष लावणे आवश्यक असते. तसा नियमच आहे. परंतु शहरातील या भागात झालेल्या वृक्षतोडीबाबत मात्र सर्वच नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचा आरोप होत आहे. संबधितांवर ना पालिकेने ना वन विभागाने कारवाई केल्याचे निदर्शनास आले आहे.परवाणगी आवश्यकपालिका हद्दीतील वृक्षतोड करावयाची असल्यास पालिकेकडे अर्ज करून रितसर परवाणगी घेणे आवश्यक असते. मोठी वृक्ष राहिल्यास पालिका वन विभागाकडून ना हरकत दाखला आणण्यास सांगत असते. त्यानंतरच वृक्षतोड करता येते. शहरात गेल्या वर्षभरात झालेल्या वृक्षतोड बाबत अशी कुठलीही परवाणगी घेतली गेली किंवा कशी याबाबत संदिग्धता आहे.फाईल शोधावी लागेल...पालिकेकडे देखील याबाबत अद्ययावत रेकॉर्ड नाही. ज्या कर्मचाºयाकडे याची जबाबदारी आहे त्या कर्मचाºयाने ‘फाईल कुठे ठेवली गेली ते शोधावे लागेल’ अशी बेजबाबदार उत्तरे दिली. त्यामुळे पालिकेचेही अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचेही दिसून येत आहे.पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजीजुने व ढेरेदार वृक्ष सर्रास तोडले जात असतांना पाकिलेने देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. वन विभागाला देखील याबाबत थेट कारवाईचा अधिकार असतो. तोडलेल्या वृक्षाचे लाकूड कुठे गेले. कुठल्या सॉ मिलला ते विकण्यात आले. त्याची पावती आहे का? रितसर परवाणगी घेऊन ते लाकूड विकले गेले का? याबाबत वन विभागानेही देखील चौकशी करणे आवश्यक असतांना वन विभागाने देखील या सर्व प्रक्रियेकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वृक्षतोड करणाऱ्यांच्या पाठीमागे कुणाचा हात आणि मार्गदर्शन आहे याबाबत शहरवासीयांमध्ये चर्चा सुरू आहे.