शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात पावसाची सरासरी 30 टक्के तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यात केवळ नंदुरबार जिल्ह्यातच पावसाने सरासरी गाठली नसल्याची स्थिती आहे. सरासरीच्या तुलनेत 30 टक्के कमी पाऊस झाला असून पिकांची स्थिती नाजूक आहे. येत्या काळात पाऊस झाला नाही तर मोठी समस्या निर्माण होणार असून त्यादृष्टीने प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना करणे आवश्यक ठरणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील लघु व मध्यम ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यात केवळ नंदुरबार जिल्ह्यातच पावसाने सरासरी गाठली नसल्याची स्थिती आहे. सरासरीच्या तुलनेत 30 टक्के कमी पाऊस झाला असून पिकांची स्थिती नाजूक आहे. येत्या काळात पाऊस झाला नाही तर मोठी समस्या निर्माण होणार असून त्यादृष्टीने प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना करणे आवश्यक ठरणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्येही अवघा 20 टक्के पाणीसाठा आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील जिल्हानिहाय पावसाची सरासरी टक्केवारी जाहीर केली आहे. त्यात केवळ नंदुरबार जिल्हाच डेंजरझोनमध्ये दाखविण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात आतार्पयत सरासरीचा केवळ 26 टक्के पजर्न्यमान    झाले आहे. जे एकूण पावसाच्या तुलनेत   उणे 29 इतके आहे. यामुळे वातावरणाची आणि पावसाची अशीच स्थिती राहिल्यास येत्या काळात जिल्ह्यात पाण्याची स्थिती गंभीर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.नंदुरबार जिल्ह्याची एकूण पावसाची सरासरी 835.83 मि.मी.आहे. गेल्या चार वर्षाचा विचार करता केवळ गेल्यावर्षीच पावसाने सरासरीची नव्वदी गाठली होती. यंदा राज्यभरात सर्वत्र पावसाचे प्रमाण समाधानकारक आणि सरासरीच्या तुलनेत राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु नंदुरबारवर मेघराजाने पाठ फिरविल्याने जून व जुलै महिन्याची सरासरीदेखील गाठता आली नसल्याचे चित्र आहे.2015 मध्ये जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ 15 टक्के पाऊस झाला होता. पावसाचे दिवस अवघे दोन होते.  त्यात नंदुरबार तालुक्यात 24.70 टक्के, नवापूर 1.95, शहादा 18.37, तळोदा 9.89, अक्कलकुवा 3.12 तर धडगाव 29.14 टक्के पाऊस झाला होता.2016 मध्ये जून महिन्यात 41.68 टक्के पाऊस झाला होता. पावसाचे दिवस सरासरी पाच होते. नंदुरबार तालुक्यात 39.89 टक्के, नवापूर 31.73, शहादा 38.84, तळोदा 44.73, अक्कलकुवा 40.29 तर धडगाव 56.95 टक्के पाऊस झाला होता.2017 मध्ये जून महिन्यात 102 टक्के पाऊस झाला होता. त्यात पावसाचे दिवस सरासरी दहा होते. नंदुरबार तालुक्यात 107.47 टक्के, नवापूर 93.25, शहादा 71.00, तळोदा 144.44, अक्कलकुवा 137.22 तर धडगाव 64.53 टक्के पाऊस झाला होता.यंदा अर्थात 2018 मध्ये जून महिन्यात सरासरीचा केवळ 13.82 टक्के पाऊस झाला. पावसाचे दिवस केवळ आठ राहिले. नंदुरबार तालुक्यात 13.95 टक्के, नवापूर 5.52, शहादा 19.67, तळोदा 18.37, अक्कलकुवा 13.63 तर धडगाव 16.28 टक्के पाऊस झाला होता. जुलै महिन्यातील 20 दिवसांची स्थिती पहाता जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पुन्हा तेवढाच अर्थात 13 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतार्पयत सरासरीचा केवळ 26 टक्के पाऊस झाला आहे. त्यातही नंदुरबार तालुक्यात सर्वात कमी 17 टक्के पाऊस झाला आहे. तर सर्वात जास्त पाऊस धडगाव तालुक्यात 38 टक्के पाऊस झाला आहे. पावसाच्या सरासरीच्या तुलनेत अद्यापही 30 टक्क्यांची तूट कायम आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ही तूट भरून निघते किंवा कसे याकडे लक्ष लागून आहे. पाणी टंचाई कायमजिल्ह्यात पाणी टंचाईची स्थिती कायम आहे. उन्हाळ्यात यंदा 76 गावांना पाणी टंचाईची स्थिती होती. त्यातील 45 गावे एकटय़ा नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील होते. या गावांमध्ये अद्यापही टंचाईची तीव्रता कायम आहे. प्रशासनाने टंचाई उपाययोजनेची कामे जून महिन्यातच बंद केली आहेत. त्यामुळे अशा गावांना पाण्यासाठी पावसाळ्यात वणवण करावे लागत असल्याची स्थिती आहे. प्रकल्पासह नदी, नाले कोरडे जिल्ह्यातील नदी, नाले कोरडे आहेत. यंदाच्या पावसाळ्यात कुठलीही नदी किंवा नाला दुथडी भरून वाहू शकला नसल्याचे चित्र आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे गोमाई नदीला पूर आला होता, परंतु ते पाणी वाहून गेले. जून व जुलै महिन्यात एकदाही दमदार पाऊस झाला नसल्यामुळे लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये अद्यापही ठणठणाट आहे. गेल्यावर्षी जुलैर्पयत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सरासरीचा 35 ते 40 टक्के पाणीसाठा झाला होता. यंदा आहे तो पाणीसाठादेखील घटण्याच्या मार्गावर   आहे.प्रशासनाने सतर्क राहावेजुलै महिना संपण्यात आला तरी पावसाची अपेक्षित हजेरी लागली नाही. सरासरीचा केवळ 65 ते 68 टक्के पाऊस झाला आहे. त्यातही नंदुरबार तालुक्यात स्थिती विदारक आहे. त्यामुळे आगामी   पाणी टंचाई आणि पीक नुकसानीची स्थिती पहाता प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे. आधीच उशिराने पावसाचे आगमन झाल्यामुळे अनेक भागातील पेरणी वाया गेली होती. आता जेमतेम पेरण्या झालेल्या असतांना पावसाने दडी मारलेली असल्यामुळे पुन्हा पेरणी व पीक वाया जाण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर उपाययोजनांसाठी प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक ठरणार आहे.