शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
"संतोष देशमुखांच्या हत्येला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार"; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
4
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
5
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
6
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
7
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
8
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
9
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
10
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
11
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
12
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
13
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
14
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
15
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
16
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
17
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
18
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
19
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू

तीन शेल्टर होममध्ये १८९ स्थलांतरीतांना दिला आसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने घराकडे पायी जाणाऱ्या स्थलांतरीतांच्या सोयीसाठी जिल्ह्यात नऊ ठिकाणी शेल्टर होम उभारले आहेत़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने घराकडे पायी जाणाऱ्या स्थलांतरीतांच्या सोयीसाठी जिल्ह्यात नऊ ठिकाणी शेल्टर होम उभारले आहेत़ यातील केवळ तीन ठिकाणी सध्या १८९ मजूरांची व्यवस्था करण्यात आली आहे़ या मजूरांना प्रशासन स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी व्यक्तींच्या माध्यमातून मदत देत आहे़कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशभरातील वाहतूक सेवा बंद झाली आहे़ यातून उद्योगधंदे बंद पडल्याने गुजरात राज्याच्या विविध भागातून स्थलांतरीत कामगार पायी घराकडे निघाले होते़ खान्देश, विदर्भ, मराठवाडा आणि परराज्यातील मजूरांचा समावेश होता़ अन्नपाण्याविनाच निघालेल्या या स्थलांतरीत मजूरांची व्यवस्था करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे़ यानुसार जिल्ह्यातील ९ ठिकाणी छावण्या तयार करण्यात आल्या होत्या़ गेल्या आठवड्यात यातील केवळ दोन ठिकाणी ५७ मजूर होते़ परंतु गेल्या तीन दिवसात त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील पेचरीदेव येथील छावणीत सर्वाधिक स्थलांतरीतांना ठेवण्यात आले आहे़ दिवसेंदिवस पायी येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत असली तरी तहसीलदारांच्या अखत्यारित या छावण्यांचे कामकाज देऊन प्रत्येक ठिकाणी तीन ते चार महसूल कर्मचाºयांचा समावेश करण्यात आला आहे़ यात तलाठी, कोतवाल, तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि तहसीलदार हे छावण्यांवर लक्ष ठेवून आहेत़ त्यांच्याकडून येथे वेळोवेळी भेटी देणे सुरु आहे़आरोग्य विभागामार्फत दर एक दिवसाआड आरोग्य विभागाचे प्रत्येकी एक पथक पायी चालून आलेल्यांची तपासणी करत असून आरोग्य सेवकांकडून त्यांचे सर्वेक्षण करुन घेण्यावर भर देण्यात आला आहे़लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर या स्थलांतरीतांना त्यांच्या गावी परत पाठवण्यात येणार आहे़नंदुरबार शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक १ आणि ४, जिल्हा परिषदेची मध्यवर्ती शाळा, तळोदा शहरात प्रकल्प कार्यालयाच्या आवारातील मुलींचे वसतीगृह, खापर ता़ अक्कलकुवा येथील आदिवासी मुलींचे वसतीगृह, नवापुर शहर, सुरवाणी ता़ धडगाव येथील आदिवासी मुलांचे वसतीगृह, म्हसावद आणि प्रकाशा ता़ शहादा येथील सद्गुरु धर्मशाळा येथे स्थलांतरीत मजूरांची व्यवस्था करण्यात आली आहे़ यात अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील वसतीगृहात सर्वाधिक ८९, प्रकाशा येथे ४७ तर म्हसावद येथे १० स्थलांतरीत थांबले आहेत़ जिल्ह्यातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग आणि आंतरजिल्हा मार्गांवरुन हे मजूर घराकडे जात असताना चेकपोस्टवर त्यांच्या तपासण्या करुन त्यांना प्रशासनाकडून छावण्यांमध्ये रवाना करण्यात आले आहे़ सध्या मुक्कामी असलेले सर्वच स्थलांतरीत हे परजिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे़खापर येथे संख्या वाढल्यानंतर स्थलांतरीतांची गैरसोय होवू नये म्हणून प्रशासनाने नवोदय विद्यालयाचे एक वसतीगृह सज्ज ठेवले आहे़खापर येथे मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जेवणाची सोय करुन दिली आहे़ तसेच अक्कलकुवा तालुक्यातील पाच ते सहा सेवाभावी संस्था मदतीला तयार आहेत़स्थलांतरीतांच्या मदतीसाठी सेवाभावी नागरिकही पुढे येत असून शहादा तालुक्यातील विविध नागरिकांनी एकत्र येत प्रकाशा आणि म्हसावद येथे मदत देणे सुरु केले आहे़तयार केलेल्या छावण्यांमध्ये मुबलक पाणी आणि वैद्यकीय सुविधा म्हणून आरोग्य पथकाच्या भेटी निश्चित करण्यात आल्या आहेत़ तसेच सकाळी चहा आणि नाश्त्याचीही सोय काही संस्थांनी करुन दिल्याचे सांगण्यात आले आहे़