शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

दर्जान्नोतीसाठी आश्रमशाळांची स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वच्छतेबाबत खालावेल्या दर्जामुळे चर्चेत असलेल्या ११ आश्रमशाळांचा कायपालट करण्याची किमया नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वच्छतेबाबत खालावेल्या दर्जामुळे चर्चेत असलेल्या ११ आश्रमशाळांचा कायपालट करण्याची किमया नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने अवघ्या १५ दिवसात करुन दाखवली आहे़ प्रकल्प कार्यालयाने स्वच्छतेसाठी घेतलेल्या या स्पर्धेत तीन शाळांना पुरस्कृत करुन प्रोत्साहन देण्यात येणार आहे़आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील अस्वच्छता, बेशिस्ती, खालावलेली शैक्षणिक गुणवत्ता याबाबत सातत्याने ओरड होत आहे़ प्रकल्प कार्यालयांनी सातत्याने कारवाई करुनही कामकाज सुरळीत होत नसल्याचे चित्र आहे़ यावर मार्ग म्हणून नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्पाधिकारी वसुमना पंत यांनी गेल्या महिन्यात ‘दर्जान्नोती’साठी ११ आश्रमशाळांची निवड करुन त्यांच्यात स्पर्धा होणार असल्याचे कळवले होते़ प्रथम तीन शाळांना रोख बक्षिसे आणि पारितोषिक देण्याची घोषणा त्यांनी केली होती़ त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद देत १५ जानेवारीपासून सुरु झालेल्या स्पर्धेत सर्व ११ आश्रमशाळांनी हिरीरीने सहभाग घेत आश्रमशाळांचा कायापालट केल्याचे चित्र दिसून येत आहे़ विद्यार्थी, शिक्षक आणि आश्रमीय कर्मचारी यांच्या सहकार्याने रंगलेल्या या स्पर्धेमुळे नंदुरबार प्रकल्पातील सर्वाधिक वाईट या यादीतील आश्रमशाळा थेट सर्वाधिक चांगल्या यादीत आल्या आहेत़ विशेष म्हणजे या उपक्रमासाठी खूप सारा शासकीय निधी खर्च न करता प्रथमच आश्रमशाळा प्रशासनाने श्रमदान करुन कामकाज केल्याने त्यांची गाडी रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे़आश्रमशाळांनी १५ दिवसात राबवलेल्या विविध कामांची माहिती घेण्यासाठी ९ अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन पडताळणी करण्यात आली होती़ अधिकाऱ्यांनी त्या-त्या आश्रमशाळांना भेटी देत गुणदान करुन अहवाल प्रकल्पाधिकारी यांना सोपवला आहे़ येत्या १५ फेब्रुवारीनंतर या स्पर्धेचा निकाल घोषित होण्याची शक्यता असून मुख्याध्यापक व शाळा प्रशासनानांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती आहे़नंदुरबार प्रकल्पांतर्गत शहादा तालुक्यातील चिरखान, चांदसैली, मलगाव, नवलपूर, राणीपूर आणि गणोर येथील शासकीय आश्रमशाळा, नवापुर तालुक्यातील निजामपूर, बंधारे, खेकडा, वडकळंबी तर नंदुरबार तालुक्यातील खोक्राळे, भालेर येथील शासकीय आश्रमशाळांमध्ये हा प्रकल्प राबण्यात आला आहे़ स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व ११ आश्रमशाळांसाठी १०० गुणांचे निकष लावण्यात आले होते़ त्यानुसार शाळांनी पूर्ण केलेल्या उपक्रमांची पाहणी सहायक प्रकल्पाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकाºयांनी केली़ नंदुरबार तालुक्यात सहायक प्रकल्प अधिकारी पी़बी देसाई, जिजाबाई पाडवी, नवापुर तालुक्यात शिक्षण विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे, यु़एल़बेडसे तर शहादा तालुक्यात सहायक प्रकल्पाधिकारी एस़एनक़ाकडे यांनी भेटी दिल्या होत्या़ सर्व ११ आश्रमशाळांनी राबवलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करुन त्या निकषानुसार गुणदान देत अहवाल प्रकल्पाधिकाºयांना दिला आहे़उपक्रमांतर्गत विद्यार्थी सहभागासाठी १० गुण देण्यात आले होते़ यात गणवेश, शिस्तपालन, वर्गसजावट, वसतीगृह, शाळा, वर्गखोल्या स्वच्छता, विद्यार्थी रॅली, आरोग्य, जनजागृती, शैक्षणिक गुणवत्ता आदी १० निकषांचा समावेश होता़४कर्मचारी सहभाग यांतर्गत १० गुण देण्यात आले़ शाळेचे नियोजन, वेळ, कामकाज, विद्यार्थ्यांची तपासणी, पालकांसोबत संवाद, ज्यादा तासिकांचे नियोजन, विद्यार्थी गुणवत्तासाठी प्रयत्न आदी मुद्दे होते़शालेय इमारत व परिसरासाठी गुणदान करण्यात आले होते़ यात विद्युत कनेक्शन, सुरक्षिता, पुरेशा खोल्या, स्वच्छता, मांडणी, वृक्षसंवर्धन, क्रीडांगण आदी मुद्द्यांना गुण देण्यात आले़स्पर्धेंतर्गत सोयी सुविधा व टापटीप याचेही परीक्षण करण्यात आले़ यात मुख्याध्यापक कक्ष, शिक्षकांचे दालन, पिण्याचे शुद्ध पाणी, वाचन कट्टा, स्वच्छ परिसर, पारंपरिक नियोजन, भोजन व्यवस्था, पुरेसे आणि चवदार भोजन यांचे परीक्षण करण्यात आले़विद्यार्थ्यांच्या सहभागाने उपयोगी परसबागेची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली होती़ त्याची माहिती अधिकाºयांनी घेतली़पाण्याची सोय, मुबलकता, स्वच्छतागृह, स्रानगृह आणि स्वच्छता यांचाही आढावा घेण्यात आला़वसतीगृह व्यवस्थापन, स्वच्छता टापटीप याचीही पाहणी पथकांनी केली़या उपक्रमांतर्गत शालेय अभिलेखे, दस्तावेज, मांडणी यांची पाहणी करण्यात आली़ बहुतांश आश्रमशाळांमध्ये कपाट, खुर्च्या, टेबल यांची सोय असली तरीही त्यांची निगा घेतली जात नसल्याचे यापूर्वी निदर्शनास आले होते़ यामाध्यमातून त्यांची दुरुस्ती आणि स्वच्छता झाली़तसेच विद्यार्थ्यांची कागदपत्रे, दाखले, गुणपत्रके, मासिक सभा, इतिवृत्त यांचीही माहिती आश्रमशाळांनी नेटकी करुन सादर केल्याने पुढील अडचणी दूर झाल्या आहेत़