शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

धान्यमालाची आवक आली अवघी ४० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

नंदुरबार : संचारबंदीच्या कालावधीत बाजार समितीत धान्यमालाची आवक कमालीची घटली आहे. सध्या हंगाम संपत आल्याने आवक कमी व भाव ...

नंदुरबार : संचारबंदीच्या कालावधीत बाजार समितीत धान्यमालाची आवक कमालीची घटली आहे. सध्या हंगाम संपत आल्याने आवक कमी व भाव देखील स्थिर असल्याचे चित्र आहे. दरम्यान ११ वाजेची वेळमर्यादा असल्याने शेतकरी पहाटेच कृषी माल घेऊन बाजार समितीत दाखल होत असल्याचे दिसून येते.

गेल्यावर्षी लॅाकडाऊनच्या कालावधीत बाजार समितीदेखील बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे गहू, मका, कापूस, मिरची या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा लॅाकडाऊन नसला तरी संपूर्ण संचारबंदी असतानाही कृषी मालाच्या खरेदी-विक्रीला मुभा देण्यात आली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील सहाही बाजार समितींमध्ये आवक निम्म्यावर आली आहे. सद्यस्थितीत केवळ गहू, मका, भुईमूग, शेंगा, ज्वारी या मालाची आवक होत आहे. ती देखील ३० ते ४० टक्क्यांवर आली असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे आवक कमी असली तरी भाव स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरणही आहे.

गव्हाचे भाव यंदा स्थिर राहिले. सद्यस्थितीत केवळ १६०० ते २२०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. यंदा आपण २० एकरवर गहू टाकला होता. भाव चांगला मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु कोरोना आणि संचारबंदीमुळे भाव फारसा मिळू शकला नाही.

-सुदाम पाटील, शेतकरी, नंदुरबार.

खरीप हंगाम यंदा अतिपावसाने कमी आला होता. रब्बी हंगामातदेखील अवकाळी पावसाने गहू, हरभरा व मकाला फटका बसला होता. भाव यंदा बऱ्यापैकी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली. नैसर्गिकसह मानवनिर्मित संकटाचा सामना करावा लागत आहे.

-वसंत जाधव, शेतकरी, शहादा.

हंगाम संपत आल्याने बाजार समितीत आवक कमी झाली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व लिलाव पार पाडले जातात. संचारबंदी काळात शेतकऱ्यांना अडचणी येऊ नये यासाठी सर्व ती खबरदारी घेतली जाते.

-योगेश अमृतकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार.