नंदुरबार : आंतरराष्ट्रीय परमिट काढण्यासाठी जिल्ह्यातून प्रत्येक वर्षी किमान चार अर्ज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दाखल करण्यात येत आहेत. यंदा जूनअखेर दोघांनी आंतरराष्ट्रीय परमिटसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना ते प्रदान करण्यात आले आहे. परदेशात गेल्यानंतर तेथे वाहन चालवता यावे यासाठी या परमिटचा उपयोग केला जातो.
जिल्ह्यातून परदेशात नोकरी आणि शिक्षणासाठी नागरिक नियमितपणे जातात. यातील काही नोकरीनिमित्त त्याचठिकाणी स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करतात. परदेशात जाणाऱ्या ९० टक्के नागरिकांना वाहन चालवता येत असल्याने त्या देशात वाहन चालवता यावे यासाठी येथील आरटीओकडे अर्ज केला जात आहे. वर्षभराच्या मुदतीचे हे परवानेही लागलीच दिले जात आहेत. जिल्ह्यातील शहादा शहर आणि तालुक्यातून सर्वाधिक गेल्या दहा वर्षांत केले गेले आहेत. याच भागातून सर्वाधिक नागरिक परदेशात रवाना होतात. दरम्यान, लर्निंग लायसन्ससाठी देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा सुरू केली आहे.
मुदत एक वर्षाचीच
परदेशात वाहन चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना असणे गरजेचे असते. त्यासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज करावा लागतो.
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी त्या-त्या देशातील व्हिसा व पासपोर्ट यावरील पत्ता एकच असणे गरजेचे आहे.
या आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची मुदत एका वर्षाची असते. त्यानंतर तो पुन्हा काढावा लागतो.
परमिटची मुदत संपली व परवानाधारक त्याच देशात असेल तर तेथील भारतीय दूतावासात अर्ज करावा लागतो. यावेळी ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर करावी लागतात. यानंतर परवाना मंजूर करण्यात येतो.
तुम्हालाही काढायचेय इंटरनॅशनल लायसन्स ?
इंटरनॅशनल लायसन्स काढण्यासाठी व्हिसा व पासपोर्ट असणे आवश्यक आहे. तसेच व्हिसा व पासपोर्टवरील पत्ता असणे एकच आहे. हे लायसन्स मिळण्यासाठी त्या व्यक्तीने स्वतः उपस्थित असणे आवश्यक आहे.
नंदुरबार जिल्ह्यातून दरवर्षी किमान दोनजण या परवान्यासाठी अर्ज करतात. शहादा तालुक्याच्या विविध भागातील नागरिकच हे परवाने घेतात. यंदा कोरोनामुळे परदेशातून येणे झालेले नसल्याने ज्यांचा परवाना आहे, त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे अर्ज केल्याचे समजते.
कोरोनामुळे यंदा परदेशात जाणे टळले असल्याने एक एप्रिल २०२१ नंतर एकही अर्ज झालेला नाही.
कामकाज गतिमान
n दरम्यान, याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एन. डी. बच्छाव यांना संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.
n उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क केला असता, दरवर्षी किमान दोघांकडून अर्ज करण्यात येत असून, ते अर्ज मंजूर करण्यात येत असल्याची माहिती दिली गेली.