शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्याच्या 535 कोटींच्या वार्षिक आराखडय़ास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी उपयोजना आणि उपयोजना क्षेत्राबाहेरील कामांच्या प्रश्नावर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत बरीच गरमागरम चर्चा झाली. दरम्यान, जिल्हा वार्षीक योजनेचा अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील असा एकुण 535 कोटी रुपयांच्या नियतव्यास मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी उपयोजना आणि उपयोजना क्षेत्राबाहेरील कामांच्या प्रश्नावर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत बरीच गरमागरम चर्चा झाली. दरम्यान, जिल्हा वार्षीक योजनेचा अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील असा एकुण 535 कोटी रुपयांच्या नियतव्यास मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक झाली. जवळपास साडेचार ते पाच तास चाललेल्या बैठकीत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. शिवाय जलयुक्त शिवार, वन, विद्युत, आरोग्य, महिला-बालकल्याण, पाणीपुरवठा आणि शिक्षण विषयावर चर्चा झाली.  यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आमदार सुरुपसिंग नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार अॅड.के.सी.पाडवी, आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवाडे, पोलीस अधीक्षक संजय पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी उपस्थित होते.बैठकीत आदिवासी उपयोजना व उपयोजना क्षेत्राबाहेरील कामे व निधी यावर चर्चा करण्यात आली. प्लॅन अँड नॉन प्लॅनची कामे तातडीने सुरू करावीत अशी मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली. जलयुक्तची कामे निवडलेल्या गावांशिवाय इतरही गावात कामे व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्ह्यात नकली बियाणे विक्रेत्यांवर काय कार्यवाही केली यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांनी जिल्हाभरातील 35 विक्रेत्यांवर परवाना रद्दची कार्यवाही करण्यात आली आहे. अद्यापही चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजवर मासेमारीसाठी टेंडर काढण्याबाबत मत्स्यविकास अधिकारी यांनी सांगितले असता, सदस्य जयपाल रावल यांनी त्यास विरोध दर्शविला. या दोन्ही ठिकाणी अनेक समाजातील लोक अनेक वर्षापासून मासेमारी करीत आहेत. तसे झाल्यास गावागावात भानगडी होतील. शिवाय नदीवरील बॅरेज असल्याने या ठिकाणी टेंडर काढू नये असा ठराव करावा अशी मागणी जयपाल रावल यांनी केली.आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी वनविभागातर्फे दरवर्षी झाडे लावली जातात, मात्र आहे त्या जंगलाच्या संवर्धनासाठी प्रय} व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तळोदा ग्रामिण रुग्णालयातील भूलतज्ज्ञ महिला कर्मचारी आदिवासी रुग्णांशी अरेरावीने वागतात. संबधीतांची चौकशी करून कारवाईची मागणी केली. पालकमंत्र्यांनी संबधित अधिका:यांना योग्य कार्यवाहीच्या सुचना देत समज देण्याचे सांगितले. किरसिंग वसावे, संध्या पाटील, देवमन पवार, सागर तांबोळी आदींनीही चर्चेत सहभाग घेतला.यावेळी बोलतांना पालकमंत्री रावल यांनी सांगितले, जिल्ह्यात डीपीडीसी मार्फत नाविण्यपुर्ण योजनांची अंमलबजावणी करावी. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करतांना तालुका, ग्रामपातळीवर लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. यंत्रणांनी निधी उपलब्ध होताच कामांना सुरुवात करावी. अखर्चीत निधी मार्चअखेर खर्च करण्यासाठी प्रय} करण्याचा सुचनाही त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी निती आयोगाने नंदुरबार जिल्हा निती आयोगाने दत्तक घेतला आहे. 48 बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्यासाठी पालक सचिवांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा उपनिबंधक एस.वाय.पुरी यांनी जिल्ह्यातील 14 हजार 598 शेतक:यांना 33 कोटी रुपयांची कजर्माफी देण्यात आल्याचे सांगितले.