लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील जळका बाजार परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पंचामृताने विधिवत अभिषेक करण्यात आला. वीर छत्रपती ब्रिगेड सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फे हा उपक्रम घेण्यात आला़कार्यक्रमास माजी आमदार शिरीष चौधरी, नगरसेवक प्रशांत चौधरी, नगरसेवक आकाश चौधरी, वीर छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष नयन चौधरी, खुशाल चौधरी, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जयेश चौधरी, उपाध्यक्ष निखिल खलाने, सचिव अमोल पाटील, खजिनदार खुषाल चौधरी, सूचित अहिरे, चेतन चौधरी, पियुश सोनार, कुणाल सोनार, जयदीप चौधरी, विक्की चौधरी, दीवेश कासार, दीपक बैसाणे, अतुल वाडीले, अभिजीत चौधरी, हितेश चौधरी, पंकज मराठे, दीनेश चौधरी, अक्षय वळवी,चेतन चौधरी, शिशुपाल राजपूत, दिपक बैसाने, भैय्या चौधरी, राहुल अहिरे, संदीप चव्हाण, राहुल चौधरी, सुरज चौधरी, सागर चौधरी, विक्की चौधरी, संजू चौधरी, सचिन जयस्वाल, कुतुक बोहरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते़यावेळी माजी आमदार चौधरी यांनी युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार सर्वत्र पोहोचवण्याचे कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याबरोबर रक्त सळसळत असते. शिवराय डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा महाराजांचे विचार डोक्यात रुजवणे महत्वाचे आहे. प्रत्येक युवकाने शिवाजी महाराजांचे आचार- विचार तळागाळात पोहोचवावे असे सांगितले़ प्रारंभी माजी आमदार चौधरी व नगरसेवक चौधरी यांच्या हस्ते धार्मिक विधीसह पुरोहितांच्या उपस्थितीत शिवरायांच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक केला़उपक्रमानंतर सायंकाळी युवकांनी जळका बाजार परिसरातून मिरवणूक काढली होती़
पंचामृताने अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:49 IST