शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

चिनोदा परिसरात चारा साठवणुकीसाठी पशुपालकांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

रब्बी हंगामातील उन्हाळी ज्वारी, गहू, भुईमूग, बाजरी, टरबूज आदी पिकांची काढणी झाल्यानंतर आपल्या पशुधनासाठी वर्षभराचा चारा साठवला जातो. शेतकऱ्यांचा ...

रब्बी हंगामातील उन्हाळी ज्वारी, गहू, भुईमूग, बाजरी, टरबूज आदी पिकांची काढणी झाल्यानंतर आपल्या पशुधनासाठी वर्षभराचा चारा साठवला जातो. शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय म्हणून पशुपालनासाठी चाऱ्याची योग्य साठवणूक होणे गरजेचे असते. जसजसा उन्हाळा संपू लागला आहे, तसतशी पावसाची शक्‍यताही वाढू लागली आहे. यामुळे सध्या बळीराजा चारा साठवण्यासाठी धावपळ करीत आहे. पावसाचे आगमन होण्यापूर्वी शेतकरी शेतात घाम गाळून शेती मशागतीचे काम पूर्ण करून घेतो. तसेच पावसाने हा चारा वाया जाऊन नुकसान होऊ नये किंवा खराब होऊ नये यासाठी शेतकरी आपल्या गोठ्यात चाऱ्याची साठवण करतात. चाऱ्याचा साठा ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्यात येते. तसेच जिथे चारा दीर्घकाळ टिकू शकेल अशा जागेचीही दुरुस्ती केली जाते. चारा ठेवण्यापूर्वी संपूर्ण जागेची साफसफाई करून मग चारा ठेवला जातो. यासाठी शेतकरी आपली शेतीची पूर्वमशागतीचे कामे करून आपल्या जनावरांसाठी चाऱ्याच्या साठवणुकीसाठी धावपळ करीत असल्याचे चित्र चिनोदासह परिसरात दिसून येत आहे.