शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

बँड लावून गावभर जिलेबीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:54 IST

राधेश्याम कुलथे ।  लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : मुलगी झाली म्हटलं तर आजही काही लोक नाक मुरडतात. वंशाच्या वाढीसाठी ...

राधेश्याम कुलथे । लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : मुलगी झाली म्हटलं तर आजही काही लोक नाक मुरडतात. वंशाच्या वाढीसाठी मुलगा हवा या हट्टाच्यापोटी मुलगीची कळी पोटातच कुस्करली जाते. पण अशा बुरसटलेल्या आणि प्रस्थापित रूढींना छेद देत शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथे कन्या जन्माचा अनोखा सोहळा पार पडला.याबाबत वृत्त असे की, सुलतानपूर येथील पवार कुटुंबीयात कन्यार} जन्मल्याने कुटुंबीयांनी थाटामाटात स्वागत केले आहे. मुलगा-मुलगी असा भेद न करत मुलीच्या जन्माचे स्वागत करत या कुटुंबाने समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. सुलतानपूर येथील हर्षल यशवंत पवार यांना 8 नोव्हेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. कन्येचे आगमन झाल्याने तिच्या आजी-आजोबानी आनंदात बँडची वाजंत्री लावत घरोघरी जाऊन ग्रामस्थांना जिलेबी वाटप करुन समाजात अनोखा संदेश दिला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्री जन्माचे स्वागत करा, असा संदेश या वेळी देण्यात आला.मुलगीचा जन्म आजही समाजाला नकोसा वाटतो. स्त्रियांनी यशाचे शिखरे पार केली मात्र तिच्या जन्माचे दु:ख करणारे आजही अनेक आहेत. परंतु समाजात हळूहळू का होईना सुधारणा होत आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथे पहावयास  मिळाला. आज मुलीही मुलांबरोबरच अनेक क्षेत्रात पुढे जात आहेत.  त्यामुळे मुलगा-मुलगी असा भेदभाव करुन तिच्या जगण्याचा हक्क  हिरावून घेण्यापेक्षा तिच्याही पंखांना बळ द्या. मुलगी ही शेवटी परक्यांच्या घरी जाणार असे म्हणून तिच्या लग्नाच्या तयारीपेक्षा तिच्या शिक्षणावर खर्च करा. मग पहा मुलगी देखील कुटुंबीयांचा आधार आणि लखलखता दिवा नक्की बनेल, अशी प्रतिक्रिया पवार कुटुंबीयांनी व्यक्त केली.