शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादकांना पावणेदोन कोटींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : यावर्षी संपलेल्या ऊस गाळप हंगामाच्या मार्च महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या उसासाठी लॉकडाऊनमुळे अदा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : यावर्षी संपलेल्या ऊस गाळप हंगामाच्या मार्च महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या उसासाठी लॉकडाऊनमुळे अदा न झालेली एक कोटी ८० लाख रुपयांची रक्कम आदिवासी सहकारी साखर कारखान्याकडून बुधवारी अदा करण्यात आली.आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम १२ मार्च २०२० रोजी पूर्ण झाला. गळीत हंगामात एक लाख २४ हजार १४६ मेट्रीक टन उसाचे गाळप झाले व ९.७५ टक्के साखर उतारासह एक लाख २० हजार ३५२ क्विंटल साखर उत्पादित झाली. यापैकी एक लाख १४ हजार ७४१ मेट्रीक टन उसाची दोन हजार ३०१ रुपये एकरकमी दराने २६ कोटी ४० लाख १९ हजार रुपये रक्कम २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. १ मार्च ते १२ मार्च २०२० पर्यंत नऊ हजार ४०५ मेट्रीक टन गाळप झालेल्या उसाची एक कोटी ८० लाख ४६ हजार ६०० रुपये मात्र देणे बाकी होते. त्याचे पेमेंटचे हिशेब करण्याआधी जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून सुरु झाला. त्यामुुळे सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यातही २२ मार्च २०२० ते १८ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढत गेला. त्यामुळे शासनाचे सर्व कार्यालय व बँकेची कार्यालये बंद झाली. कारखान्याचे कार्यालयेही सोशल डिस्टन्सिंगमुळे ३१ मे २०२० पर्यंत बंद होते. कारखान्याचे मुख्य अधिकारी धुळे व नाशिक जिल्ह्यातील असल्याने व जिल्हाबंदी झाल्याने ते कारखान्यात कामावर येऊ शकले नाहीत. ऊस पेमेंटसाठीची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेतून उपलब्ध करुन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या उपरातही कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या ३२ लाख रुपये रक्कमेतून काही शेतकºयांना कारखान्याने त्यांच्या अडचणी लक्षात घेता ५० टक्के रक्कम चेकने अदा केली. कारखान्याकडून दर पंधरवड्यात १ ते १५ व १६ ते ३० मध्ये गाळप ऊस बिलाचा हिशेब करुन त्याची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा केली जाते. परंतु कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे १ मार्च ते १२ मार्च २०२० पर्यंत गाळप झालेल्या उसाचे पेमेंट थकले. ही उर्वरीत रक्कम १५ जुलै २०२० पर्यंत सर्व शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे कारखान्याने शेतकºयांना आश्वासन दिले होते. त्यानुसार १५ जुलै २०२० पर्यंत उर्वरित शेतकºयांचे ऊस पेमेंट संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यात बुधवारी जमा करण्यात आले असून शेतकºयांनी बँकेशी संपर्क साधून ऊस बिलाची रक्कम जमा झाल्याची खात्री करुन घ्यावी, असे चेअरमन आमदार शिरीष नाईक यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील काही सहकारी साखर कारखान्यांचे अद्यापपर्यंत आधारभूत जाहीर दरानुसार पेमेंट देणे बाकी असताना आदिवासी सहकारी साखर कारखान्याने शासनाच्या जाहीर आधारभूत दरानुसार एकरकमी प्रती मेट्रीक टन दोन हजार ३०१ रुपयेप्रमाणे अदा केले असून कोणत्याही शेतकºयाचे ऊस पेमेंट बाकी नाही, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार शिरीष नाईक व कार्यकारी संचालक विजयानंद कुशारे यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.