शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

ऊस उत्पादकांना पावणेदोन कोटींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : यावर्षी संपलेल्या ऊस गाळप हंगामाच्या मार्च महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या उसासाठी लॉकडाऊनमुळे अदा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : यावर्षी संपलेल्या ऊस गाळप हंगामाच्या मार्च महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या उसासाठी लॉकडाऊनमुळे अदा न झालेली एक कोटी ८० लाख रुपयांची रक्कम आदिवासी सहकारी साखर कारखान्याकडून बुधवारी अदा करण्यात आली.आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम १२ मार्च २०२० रोजी पूर्ण झाला. गळीत हंगामात एक लाख २४ हजार १४६ मेट्रीक टन उसाचे गाळप झाले व ९.७५ टक्के साखर उतारासह एक लाख २० हजार ३५२ क्विंटल साखर उत्पादित झाली. यापैकी एक लाख १४ हजार ७४१ मेट्रीक टन उसाची दोन हजार ३०१ रुपये एकरकमी दराने २६ कोटी ४० लाख १९ हजार रुपये रक्कम २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. १ मार्च ते १२ मार्च २०२० पर्यंत नऊ हजार ४०५ मेट्रीक टन गाळप झालेल्या उसाची एक कोटी ८० लाख ४६ हजार ६०० रुपये मात्र देणे बाकी होते. त्याचे पेमेंटचे हिशेब करण्याआधी जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून सुरु झाला. त्यामुुळे सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यातही २२ मार्च २०२० ते १८ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढत गेला. त्यामुळे शासनाचे सर्व कार्यालय व बँकेची कार्यालये बंद झाली. कारखान्याचे कार्यालयेही सोशल डिस्टन्सिंगमुळे ३१ मे २०२० पर्यंत बंद होते. कारखान्याचे मुख्य अधिकारी धुळे व नाशिक जिल्ह्यातील असल्याने व जिल्हाबंदी झाल्याने ते कारखान्यात कामावर येऊ शकले नाहीत. ऊस पेमेंटसाठीची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेतून उपलब्ध करुन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या उपरातही कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या ३२ लाख रुपये रक्कमेतून काही शेतकºयांना कारखान्याने त्यांच्या अडचणी लक्षात घेता ५० टक्के रक्कम चेकने अदा केली. कारखान्याकडून दर पंधरवड्यात १ ते १५ व १६ ते ३० मध्ये गाळप ऊस बिलाचा हिशेब करुन त्याची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा केली जाते. परंतु कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे १ मार्च ते १२ मार्च २०२० पर्यंत गाळप झालेल्या उसाचे पेमेंट थकले. ही उर्वरीत रक्कम १५ जुलै २०२० पर्यंत सर्व शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे कारखान्याने शेतकºयांना आश्वासन दिले होते. त्यानुसार १५ जुलै २०२० पर्यंत उर्वरित शेतकºयांचे ऊस पेमेंट संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यात बुधवारी जमा करण्यात आले असून शेतकºयांनी बँकेशी संपर्क साधून ऊस बिलाची रक्कम जमा झाल्याची खात्री करुन घ्यावी, असे चेअरमन आमदार शिरीष नाईक यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील काही सहकारी साखर कारखान्यांचे अद्यापपर्यंत आधारभूत जाहीर दरानुसार पेमेंट देणे बाकी असताना आदिवासी सहकारी साखर कारखान्याने शासनाच्या जाहीर आधारभूत दरानुसार एकरकमी प्रती मेट्रीक टन दोन हजार ३०१ रुपयेप्रमाणे अदा केले असून कोणत्याही शेतकºयाचे ऊस पेमेंट बाकी नाही, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार शिरीष नाईक व कार्यकारी संचालक विजयानंद कुशारे यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.