शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

पुनर्वसितांना विश्वासात न घेता जमिनी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पुनर्वसन झालेल्या प्रकल्प बाधितांना त्यांच्या आवडी-निवडीनुसार जमिन वाटप करण्याची तरतुद शासनामार्फत करण्यात आली होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पुनर्वसन झालेल्या प्रकल्प बाधितांना त्यांच्या आवडी-निवडीनुसार जमिन वाटप करण्याची तरतुद शासनामार्फत करण्यात आली होती. परंतु काथर्देदिगर येथील येथील सहा बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता प्रशासकीय यंत्रणेने परस्पर खराब जमिनी त्यांच्या नावावर केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहे.सरदार सरोवर प्रकल्पाच्या विकसासाठी नर्मदा नदी काठावरील गावांची अक्कलकुवा, तळोदा व शहादा तालक्यांमध्ये पूनर्वसन करण्यात आले आहे. त्यात अक्कलकुवा तालुक्यातील डनेल, मुखडी या भागातील बांधवांचे शहादा तालुक्यातील तºहावद येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. तेथे पुन्हा जागा कमी पडत असल्यामुळे बहुतांश कुटुंबांचे काथर्देदिगर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यात प्रथम ८१ कुटुंबांचे पूनर्वसन झाले त्यानंतर टप्प्या-टप्प्याने ४० व २७ असे एकुण १४८ कुटुंबांचा तेथे समावेश करण्यात आला आहे. पूनर्वसित गावांमध्ये अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे शासनामार्फत सांगण्यात आले होते. परंतु काही सुविधा वगळता बहुतांश सुविधा शासनामार्फत उपलब्ध करुन दिल्या नसल्याने काथर्देदिगर ता.शहादा येथील विस्थापितांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.नर्मदा नदीकाठावर मोठ्या जंगलामुळे उदरनिर्वाहासाठी विविध माध्यमातून नागरिकांना भांडवल उपलब्ध होत होते. परंतु पूनर्वसित गावांमध्ये विस्थापित बांधवांना केवळ शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. उदरनिर्वाह व जीवनाचा आधार मिळविण्यासाठी विस्थापितांची धावपळ होत आहे. नर्मदा नदीकाठावर उपलब्ध होणाºया भांडवलासारखे भांडवल काथर्देदिगर येथेही उपलब्ध व्हावे, या अपेक्षेनेच डनेल, मुखडी व अन्य गावांमधील बाधित काथर्देदिगर येथे स्थायिक झालेया बाधितांना त्यांच्या आवडी-नवडी विचारात घेत व त्यांनी होकार दिल्यानंतरच जमिन त्यांच्या नावावर करण्यात याव्या, अशा तरतुदी देखील शासनामार्फत करण्यात आल्या होत्या. परंतु काथर्देदिगर ता.शहादा येथे पुनर्वसन करण्यात आलेल्या सहा बाधितांना विश्वासात न घेता शासन यंत्रणेमार्फत त्यांच्या नावावर जमिनी करुन दिल्या आहे. त्यांना काहीही न विचारता नावावर करण्यात आलेल्या जमिनी वेगवेगळ्या कारणांनी खराब निघाल्याचे बाधितांमार्फत सांगण्यात आले आहे.या जमिनी रद्द करीत सहाही शेतकऱ्यांना नवीन जमिनी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करुनही बाधितांच्या समस्येशी दखल घेतली जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. मागºया प्रस्तावित असल्याचे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात कुठलीही कार्यवाही होतांना दिसत नाही. त्यामुळे काथर्देदिगर येथील अन्यायग्रस्त नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला आहे.तक्रार करणाºया शेतकºयांना काहीही न विचारता जमिनी नावावर करण्यात आलेल्या जमिनी प्रत्याक्षात उत्पादन क्षमता कमी असल्याचे आढळलन आल्या. तर काही जमिनींची प्रत खालावलेली असल्याचे देखील या बाधित शेतकºयांमार्फत सांगण्यात येत असून त्यांना कसदार जमिनीची प्रतिक्षा लागली आहे.