शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

पोटनिवडणुकीत सर्वच पक्ष उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST

नंदुरबार : जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीत सर्वच अर्थात भाजप, काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी हे चारही प्रमुख पक्ष ...

नंदुरबार : जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीत सर्वच अर्थात भाजप, काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी हे चारही प्रमुख पक्ष आपले उमेदवार रिगंणात उतरविणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली असून गेल्या निवडणुकीतील उमेदवारांनाच उमेदवारी दिली जाईल, असे बोलले जात आहे.

जिल्हा परिषदेच्या ११ व पंचायत समितीच्या १४ जागांसाठी मंगळवारी निवडणूक जाहीर करण्यात आली. २९ जून रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होऊन त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी अगदी कमी दिवस शिल्लक राहिल्याने राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे. ज्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे त्या सदस्यांची उमेदवारी तर राहणारच आहे. परंतु जे उमेदवार गेल्या निवडणुकीत पराभूत झाले होते, त्यांनाही ते ते पक्ष उमेदवारी कायम ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस गेल्या वेळेप्रमाणेच राहील, अशी शक्यता आहे.

अर्थात काही ठिकाणी उमेदवारी बदलण्याची शक्यता आहे. ज्यांनी गेल्या वेळी चांगले मते मिळविली नाहीत; अशांना या निवडणुकीत पुन्हा उमेदवारी न देण्याबाबतही पक्षांचा विचार राहणार आहे.

भाजपने आधीच शतप्रतिशत भाजपचा नारा दिला आहे. शिवसेनादेखील आपले सदस्य वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. काँग्रेसला शिवसेनेचा टेकू घ्यावा लागल्यामुळे काँग्रेसदेखील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करेल. राष्ट्रवादीचे उमेदवार काही ठिकाणी तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर होते. आता पक्षाची स्थिती सुधारली असून पक्षही सक्षम उमेदवार देण्याकडे भर देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चित्र आहे.