शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अक्कलकुवा ग्रामपंचायतीचा निकाल लांबल्याने चर्चांना उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

अक्कलकुवा ग्रामपंचायतीत २०१६ ते २०२० या काळात चार कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचे जिल्हा परिषदेने नियुक्त केलेल्या चाैकशी समितीकडून ...

अक्कलकुवा ग्रामपंचायतीत २०१६ ते २०२० या काळात चार कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचे जिल्हा परिषदेने नियुक्त केलेल्या चाैकशी समितीकडून निष्पन्न झाले होते. चाैकशीनंतर विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक व प्रशासक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले होते. या आदेशांच्या विरोधात विद्यमान सरपंच व उपसरपंच यांनी ग्रामविकासमंत्र्यांकडे अपील केले होते. या अपिलाची अंतिम सुनावणी २९ जून रोजी मंत्रालयात पार पडली. यावेळी ग्रामविकासमंत्र्यांनी गुन्हे दाखल करण्याबाबत देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात यावी, असे स्पष्ट शब्दात सूचित केले होते. दरम्यान, याबाबत लेखी आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु आठवडा उलटूनही कारवाई करण्यात आलेली नसल्याने पुढे काय होणार, याबाबत चर्चा रंगत आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर राैंदळ यांना संपर्क केला असता, लेखी आदेशांची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेत अद्याप अप्राप्त असलेल्या आदेशांना विलंब होण्यास सुुरू असलेल्या अधिवेशनामुळे उशीर होत असल्याचेही कारण दिले जात आहे.

एकीकडे आदेशांची प्रतीक्षा असताना गैरव्यवहाराची निश्चित आकडेवारी समोर येण्यासाठी चार वर्षातील कामकाजाचे लेखापरीक्षणही होणार असल्याची माहिती दिली जात आहे. अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराची चाैकशी करण्यासाठी नियुक्त समितीला दप्तरच उपलब्ध करून दिले जात नसल्याने निश्चित आकडा समोर येऊ शकला नव्हता. जिल्हा परिषदेने बँक तसेच इतर ठिकाणी देण्यात आलेल्या बिलांवरून चाैकशी करत गैरव्यवहाराची रक्कम निश्चित केली आहे. दरम्यान, फौजदारी कारवाई झाल्यास तपासानंतर मोठा आकडा समोर येण्याची शक्यताही सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.