शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

अक्कलकुवा ग्रा.पंच्या वाढल्या तक्रारी प्रशासनाने केली कार्यवाहीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : ग्रामपंचायतीत चार कोटी ७५ लाख रूपयांचा खर्च शासकीय नियमांनुसार नसल्याचा प्रकार चाैकशी समितीने उघडकीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : ग्रामपंचायतीत चार कोटी ७५ लाख रूपयांचा खर्च शासकीय नियमांनुसार नसल्याचा प्रकार चाैकशी समितीने उघडकीस आणला होता. यातून नोटीसा देवूनही योग्य ते खुलासे न आल्याने जिल्हा परिषदेकडून आजी-माजी सरपंच तथा प्रशासकांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी सर्व ९ जणांना अंतिम नाेटीसा देण्यात येणार आहेत. २०१६ ते २०२० या काळात अक्कलकुवा ग्रामपंचायतीत नियुक्त ग्रामसेवक, प्रशासक आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांनी शहरात केलेल्या विकासकामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप व तक्रारी सातत्याने होत होते. यांतर्गत मे २०२० मध्ये गटविकास अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर या प्रकाराचे गांभिर्य समोर आले होते. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर राैंदळ यांच्या मार्गदर्शनात चार जणांची चाैकशी समिती गठीत करुन तपास सुरु करण्यात आला होता. दरम्यान चार वर्षाच्या काळात १४ वा वित्त आयोग व पाच टक्के पेसा निधीचा हिशोब नसल्याचे समोर आले होते. समितीने नोव्हेंबर २०२० मध्ये ३१ पानी चाैकशी अहवाल जिल्हा परिषदेला दिला होता. परंतू यावर कारवाई होत नसल्याने पुन्हा तक्रारी सुरु झाल्या होत्या या तक्रारींची दखल घेत याप्रकरणात चाैकशी झालेल्या सर्व ९ जणांना सोमवारी अंतिम नोटीस देण्यात येणार आहे. दरम्यान यापूर्वी देण्यात आलेल्या नोटीसांमध्ये योग्य त्या पद्धतीने खुलासे न मिळाल्याची माहिती आहे. सोमवारी काढण्यात येणा-या नोटीसा संबधितांना प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरु होणार आहे. 

   कागदपत्रे मिळेनातचार सदस्यीय समितीने ग्रामपंचायतीत केलेली कामे, ई-टेंडरिंग, दरपत्रक, एमबी, कामांचे ईस्टीमेट, ग्रामसभांची मंजूरी यांची तपासणी केली होती. यात अनेक तफावती आढळून आल्या होत्या.  समितीने एकूण चार कोटी ७५ लाख रूपयांचा हिशोब नसल्याचे ३१ पानी अहवालातून समोर आणले होते. 

   उपोषणाच्या तयारीत नोव्हेंबर महिन्यात देण्यात आलेल्या अहवालावर कारवाई होण्यास विलंब होत असल्याने अक्कलकुवा शहरातून तक्रारी वाढल्या होत्या. यातून २५ जानेवारीपासून काहींनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. तसेच विविध राजकीय पक्षांकडून राज्यपातळीवर या प्रकाराची चाैकशीसाठी पाठपुरावा सुरु होता. 

यांना द्यावा लागणार पुन्हा खुलासा  समितीने २०१६ मध्ये सरपंच असलेले अमरसिंग हुपा वळवी, डिसेंबर २०१६ पर्यंतचे प्रशासक आर.एम.देव, मार्च २०१७ पर्यंतचे प्रशासक जे.एस.बोराळे, २०१७ ते २०१९ यादररम्यान लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा, २०१९ मधील उपसरपंच ताजमहंमद अल्लारखा मक्राणी, जून २०१९ पासून लोकनियुक्त सरपंच राजेश्वरी इंद्रवदन वळवी, २०१५ ते २०१८ या काळातील ग्रामविकास अधिकारी व्ही.बी.जाधव, २०१८ ते २०१९ दरम्यानचे ग्रामविकास अधिकारी आनंदा पाडवी, २०१९ ते २०२० पर्यंत ग्रामसेवक एस.आर.कोळी यांना यापूर्वी नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.  पहिल्या नोटीसीचे उत्तर मिळाल्यानंतर त्यात अनेक बाबींची स्पष्टता नसल्याने दुस-यांना नोटीस दिली जाणार आहे. यातून योग्य ते समाधान झाल्यास गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही होणार आहे.