शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

वसाहतीतील रस्ते, गटारींच्या कामांच्या चौकशीसाठी प्रकल्पग्रस्त आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:18 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तब्बल सात महिन्यानंतर जिल्हा पुनर्वसन समितीची बैठक शुक्रवारी अपर जिल्हाधिका:यांच्या दालनात घेण्यात आली. या ...

 लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तब्बल सात महिन्यानंतर जिल्हा पुनर्वसन समितीची बैठक शुक्रवारी अपर जिल्हाधिका:यांच्या दालनात घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषदेमार्फत वसाहतींमध्ये करण्यात आलेल्या निकृष्ठ रस्ते, इमारती बांधकाम, शौचालये व पाणीपुरवठय़ाच्या कामाची चौकशी करण्याची तक्रार सदस्यांनी केली. यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आली.सरदार सरोवर कार्यालय व जिल्हा पुनर्वसन अधिका:यांची बदली आणि त्यानंतर लगेच लोकसभेच्या निवडणुकीची लागू झालेली आचारसंहितेमुळे                  जिल्हा पुनर्वसन समितीच्या बैठकीसही तब्बल सात महिन्यांचा खंड पडला होता. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, वैयक्तिक समस्या तशाच प्रलंबित होत्या. खंडित झालेली ही                 बैठक शुक्रवारी अप्पर जिल्हाधिका:यांच्या दालनात          घेण्यात आली. अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरूडे होते. याप्रसंगी समितीचे सदस्य दाज्या                 पावरा, शरद वसावे, तेरसिंग वसावे, कैलास वसावे, दशरथ पावरा, रवींद्र पावरा, नर्मदा विकास विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, उपजिल्हाधिकारी जयश्री सैंदाणे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता गणेश भावसार आदी उपस्थित होते. बैठकीत नवीन गावठाणांमध्ये नुकतेच पुनर्वसन केलेल्या बहुसंख्य बाधितांना कागदोपत्री सिंचनाची जमिनी दाखविल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात सिंचनाची सुविधा नाही. हा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला होता. त्या वेळी समितीचे अध्यक्ष दत्तात्रय बोरूडे  यांनी अशा शेतक:यांची फेर तपासणी करावी. याशिवाय ज्यांच्या कूपनलिका आटल्या पूर्णपणे आटल्याने बंद पडल्या आहेत. त्याबाबतही कार्यवाही करण्याची सूचना नर्मदा विकास विभागाच्या अधिका:यांना देवून सिंचनाचा प्रश्न            तातडीने सोडविण्यात यावा, अशी सूचना देण्यात आली. त्याच बरोबर दीड-दोन वर्षापूर्वी राज्यशासनाने वसाहतींच्या विकासासाठी साधारण 27 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. हा निधी संबंधीत नर्मदा विकास विभागाने जिल्हा परिषदेकडे तातडीने वर्ग केला होता. जिल्हा परिषदेनेदेखील देवमोगरा, नर्मदानगर, रेवानगर, सरदारनगर, रोझवा, वाडी पुनर्वसन, त:हावद पुनर्वसन,          गोपाळपूर पुनर्वसन, वडछील अशा नऊ वसाहतींमधील अंतर्गत रस्ते, शासकीय इमारती, संरक्षण भिंत, पाणीपुरवठा व सार्वजनिक शौचालयांची कामी हाती घेतली होती. तथापि ही सर्व कामे अतिशय दर्जाची झाली असल्याचा आरोप समितीच्या सदस्यांनी केला असून, सहा महिने, वर्षभरातच त्याची दैयनिय अवस्था झाली आहे. या कामांची सखोल चौकशी करण्याचा मुद्दाही सदस्यांनी उपस्थित केला होता. याप्रकरणी चौकशीसाठी तातडीने स्वतंत्र समिती नेमून तत्काळ अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या अधिका:यांना देण्यात आली.

जिल्हा पुनर्वसन समितीच्या चार ही अशासकीय सदस्यांनी नूतन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या दालनात जावून त्यांची भेट घेतली. यावेळी या सर्व  सदस्यांनी समितीच्या बैठकीची माहिती सांगून आपापल्या सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन वसाहतीतील प्रश्नांबाबत चर्चा केली. याशिवाय जलसंधारणाची रखडलेली व नवीन कामे, प्रकल्प बाधितांच्या सिंचन सुविधा, इतरांच्या घर प्लॉटचा व अतिक्रमणाचा प्रश्न, वृक्षारोपण अशा वेगवेगळ्या प्रश्नावर प्रशासनाने सकारात्मक चर्चा केली. त्याचबरोबर पुनर्वसन समितीच्या बैठकीत काही विभागातील अधिकारींची अनास्थेबाबत सक्त ताकीद देण्याची मागणी केली. दरम्यान, वसाहतींमध्ये गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून दर गुरुवारी होणारा पुनर्वसन ‘डे’ सुरू करण्याबाबत ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी वसाहतधारकांनी केली आहे.