शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

वसाहतीतील रस्ते, गटारींच्या कामांच्या चौकशीसाठी प्रकल्पग्रस्त आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:18 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तब्बल सात महिन्यानंतर जिल्हा पुनर्वसन समितीची बैठक शुक्रवारी अपर जिल्हाधिका:यांच्या दालनात घेण्यात आली. या ...

 लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तब्बल सात महिन्यानंतर जिल्हा पुनर्वसन समितीची बैठक शुक्रवारी अपर जिल्हाधिका:यांच्या दालनात घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषदेमार्फत वसाहतींमध्ये करण्यात आलेल्या निकृष्ठ रस्ते, इमारती बांधकाम, शौचालये व पाणीपुरवठय़ाच्या कामाची चौकशी करण्याची तक्रार सदस्यांनी केली. यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आली.सरदार सरोवर कार्यालय व जिल्हा पुनर्वसन अधिका:यांची बदली आणि त्यानंतर लगेच लोकसभेच्या निवडणुकीची लागू झालेली आचारसंहितेमुळे                  जिल्हा पुनर्वसन समितीच्या बैठकीसही तब्बल सात महिन्यांचा खंड पडला होता. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, वैयक्तिक समस्या तशाच प्रलंबित होत्या. खंडित झालेली ही                 बैठक शुक्रवारी अप्पर जिल्हाधिका:यांच्या दालनात          घेण्यात आली. अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरूडे होते. याप्रसंगी समितीचे सदस्य दाज्या                 पावरा, शरद वसावे, तेरसिंग वसावे, कैलास वसावे, दशरथ पावरा, रवींद्र पावरा, नर्मदा विकास विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, उपजिल्हाधिकारी जयश्री सैंदाणे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता गणेश भावसार आदी उपस्थित होते. बैठकीत नवीन गावठाणांमध्ये नुकतेच पुनर्वसन केलेल्या बहुसंख्य बाधितांना कागदोपत्री सिंचनाची जमिनी दाखविल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात सिंचनाची सुविधा नाही. हा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला होता. त्या वेळी समितीचे अध्यक्ष दत्तात्रय बोरूडे  यांनी अशा शेतक:यांची फेर तपासणी करावी. याशिवाय ज्यांच्या कूपनलिका आटल्या पूर्णपणे आटल्याने बंद पडल्या आहेत. त्याबाबतही कार्यवाही करण्याची सूचना नर्मदा विकास विभागाच्या अधिका:यांना देवून सिंचनाचा प्रश्न            तातडीने सोडविण्यात यावा, अशी सूचना देण्यात आली. त्याच बरोबर दीड-दोन वर्षापूर्वी राज्यशासनाने वसाहतींच्या विकासासाठी साधारण 27 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. हा निधी संबंधीत नर्मदा विकास विभागाने जिल्हा परिषदेकडे तातडीने वर्ग केला होता. जिल्हा परिषदेनेदेखील देवमोगरा, नर्मदानगर, रेवानगर, सरदारनगर, रोझवा, वाडी पुनर्वसन, त:हावद पुनर्वसन,          गोपाळपूर पुनर्वसन, वडछील अशा नऊ वसाहतींमधील अंतर्गत रस्ते, शासकीय इमारती, संरक्षण भिंत, पाणीपुरवठा व सार्वजनिक शौचालयांची कामी हाती घेतली होती. तथापि ही सर्व कामे अतिशय दर्जाची झाली असल्याचा आरोप समितीच्या सदस्यांनी केला असून, सहा महिने, वर्षभरातच त्याची दैयनिय अवस्था झाली आहे. या कामांची सखोल चौकशी करण्याचा मुद्दाही सदस्यांनी उपस्थित केला होता. याप्रकरणी चौकशीसाठी तातडीने स्वतंत्र समिती नेमून तत्काळ अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या अधिका:यांना देण्यात आली.

जिल्हा पुनर्वसन समितीच्या चार ही अशासकीय सदस्यांनी नूतन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या दालनात जावून त्यांची भेट घेतली. यावेळी या सर्व  सदस्यांनी समितीच्या बैठकीची माहिती सांगून आपापल्या सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन वसाहतीतील प्रश्नांबाबत चर्चा केली. याशिवाय जलसंधारणाची रखडलेली व नवीन कामे, प्रकल्प बाधितांच्या सिंचन सुविधा, इतरांच्या घर प्लॉटचा व अतिक्रमणाचा प्रश्न, वृक्षारोपण अशा वेगवेगळ्या प्रश्नावर प्रशासनाने सकारात्मक चर्चा केली. त्याचबरोबर पुनर्वसन समितीच्या बैठकीत काही विभागातील अधिकारींची अनास्थेबाबत सक्त ताकीद देण्याची मागणी केली. दरम्यान, वसाहतींमध्ये गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून दर गुरुवारी होणारा पुनर्वसन ‘डे’ सुरू करण्याबाबत ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी वसाहतधारकांनी केली आहे.