शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसानंतर आज होणार व्यवहार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST

नंदुरबार : दोन दिवसानंतर सोमवारी व्यवहार सुरळीत होणार आहेत. दरम्यान, जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशीदेखील कडकडीत बंद पाळण्यात आल्याने कोरोनाची ...

नंदुरबार : दोन दिवसानंतर सोमवारी व्यवहार सुरळीत होणार आहेत. दरम्यान, जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशीदेखील कडकडीत बंद पाळण्यात आल्याने कोरोनाची संपर्क साखळी तोडण्यात काही प्रमाणात यश येण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये शनिवार व रविवारी दोन दिवशीय जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही दिवशी नागरिकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होते. नंदुरबारसह शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा व धडगाव शहरांत हा बंद पाळण्यात आला होता. याशिवाय काही गावांनी देखील स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. यामुळे कोरोनाची संपर्क साखळी तोडण्यास काही प्रमाणात यश येण्याची शक्यता आहे. या दोन दिवशीय जनता कर्फ्यूत शहरी भागातील नागरिकांनी सहकार्य केेले. त्यामुळे संपूर्ण शहरात शुकशुकाट जाणवत होता. केवळ बंदोबस्ताला असलेले पोलीस कर्मचारी रस्त्यावर दिसून येत होते.

आज होणार व्यवहार सुरळीत

दोन दिवशीय जनता कर्फ्यूमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. सोमवारी ते सुळीत होणार आहेत. असे असले तरी नागरिकांनी बाजारात एकाच वेळी गर्दी न करता संयम पाळला तरच या दोन दिवसाचा बंदचा उपयोग होणार आहे. गर्दी करून, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता व मास्कचा वापर न करता बाजारात गर्दी केल्यास कोरोनाच्या संपर्क साखळी खंडित न होता ती पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सोमवारी संयम पाळावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, १ एप्रिलपासूनच्या लॅाकडाऊनची तयारी करण्यात येत आहे.