शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

तब्बल ३७ वर्षांनी नंदुरबारात मार्चमध्येच तापमान चाळीशी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 21:30 IST

उष्णतेची लाट : १९८२ मध्ये नोंदवले होते ४१.४ अंश तापमान

नंदुरबार : मार्च महिन्यातच कमाल तापमानाची चाळीशी पार करीत जिल्ह्यात तापमानाने तब्बल सदोतीस वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे़ नंदुरबारात सोमवारी तब्बल ४०.५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले़ या आधी २७ मार्च १९८२ साली ४१.४ इतके कमाल तापमान नोंदविले होते़ त्याच प्रमाणे ३१ मार्च १९५८ रोजीही तापमान ४३ अंशापर्यंत पोहचले होते़सध्या उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात हवेचा दाब प्रचंड प्रमाणात कमी झाला आहे़ त्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट बघायला मिळत आहे़नंदुरबारात सोमवारी १ हजार ४ हेक्टापास्कल इतका हवेचा दाब होता़ तर साधारणत: ताशी १० किमी वेगाने वारे वाहत होते़ आद्रता साधारणत: ३६ टक्के इतकी नोंदविण्यात आली होती़ त्यामुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणात उकाडा सहन करावा लागला होता़ नंदुरबारात सदोतीस वर्षांनी प्रथमच मार्चमध्ये तापमानाने चाळीशी पार केली आहे़ त्यामुळे नागरिकांना उष्णतेची दाहकता सहन करावी लागत होती़तीन दिवसात तापमानात वाढनंदुरबारसह संपूर्ण खान्देशात २६ ते २८ मार्च दरम्यान मोठ्या प्रमाणात तापमान वाढ होणार असल्याचा अंदाज पुणे येथील हवामानतज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे़ तर ‘आयएमडी’नुसार येत्या आठवडाभरात तापमान उष्ण व कोरडे राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़सूर्याच्या उत्तरायणास सुरुवातडॉ़ रामचंद्र साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, सूर्याची वाटचाल आता दिवसेंदिवस उत्तरेकडे सुरु राहिल़ सूर्याचे उत्तरायणास सुरुवात झाली असल्याने रोज तापमानामध्ये किंचित वाढ होताना दिसून येणार आहे़ सध्या वाऱ्यांची दिशा दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे़ त्यामुळे परिणामी उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये कमालीची तापमान वाढ होऊन उष्णता जाणवनार आहे़ त्याच प्रमाणे उत्तर महाराष्ट्रात जरी तापमान वाढ होणार असली तरी महाराष्ट्रातील दक्षिण भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे़सध्या बंगालच्या उपसागरात बाष्पीभवन वेगाने होत आहे़ सोबतच दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे वाहत असल्याने दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे़ तसेच विदर्भातदेखील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ नंदुरबारसह जळगाव व धुळ्यातही सोमवारी तापमान चाळीशीच्या जवळपास होते़ जळगावात कमाल ४०.५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले़ तर ताशी २० किमीपर्यंत वेगाने वारे वाहत होते़ धुळ्यात ३९.९ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले़ जळगाव व धुळ्यात अनुक्रमे २२ व ३४ टक्के इतकी आद्रतेची नोंद करण्यात आली होती़ राज्यात अमरावती, सांगली, सोलापूर, बीड, परभणी आदी जिल्ह्यांमधील तापमानदेखील सोमवारी चाळीशीवर गेले होते़ दोन दिवसात उष्ण लहरींचा प्रभाव वाढणार असल्याचा अंदाज आहे़