शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

तब्बल ३७ वर्षांनी नंदुरबारात मार्चमध्येच तापमान चाळीशी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 21:30 IST

उष्णतेची लाट : १९८२ मध्ये नोंदवले होते ४१.४ अंश तापमान

नंदुरबार : मार्च महिन्यातच कमाल तापमानाची चाळीशी पार करीत जिल्ह्यात तापमानाने तब्बल सदोतीस वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे़ नंदुरबारात सोमवारी तब्बल ४०.५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले़ या आधी २७ मार्च १९८२ साली ४१.४ इतके कमाल तापमान नोंदविले होते़ त्याच प्रमाणे ३१ मार्च १९५८ रोजीही तापमान ४३ अंशापर्यंत पोहचले होते़सध्या उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात हवेचा दाब प्रचंड प्रमाणात कमी झाला आहे़ त्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट बघायला मिळत आहे़नंदुरबारात सोमवारी १ हजार ४ हेक्टापास्कल इतका हवेचा दाब होता़ तर साधारणत: ताशी १० किमी वेगाने वारे वाहत होते़ आद्रता साधारणत: ३६ टक्के इतकी नोंदविण्यात आली होती़ त्यामुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणात उकाडा सहन करावा लागला होता़ नंदुरबारात सदोतीस वर्षांनी प्रथमच मार्चमध्ये तापमानाने चाळीशी पार केली आहे़ त्यामुळे नागरिकांना उष्णतेची दाहकता सहन करावी लागत होती़तीन दिवसात तापमानात वाढनंदुरबारसह संपूर्ण खान्देशात २६ ते २८ मार्च दरम्यान मोठ्या प्रमाणात तापमान वाढ होणार असल्याचा अंदाज पुणे येथील हवामानतज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे़ तर ‘आयएमडी’नुसार येत्या आठवडाभरात तापमान उष्ण व कोरडे राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़सूर्याच्या उत्तरायणास सुरुवातडॉ़ रामचंद्र साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, सूर्याची वाटचाल आता दिवसेंदिवस उत्तरेकडे सुरु राहिल़ सूर्याचे उत्तरायणास सुरुवात झाली असल्याने रोज तापमानामध्ये किंचित वाढ होताना दिसून येणार आहे़ सध्या वाऱ्यांची दिशा दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे़ त्यामुळे परिणामी उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये कमालीची तापमान वाढ होऊन उष्णता जाणवनार आहे़ त्याच प्रमाणे उत्तर महाराष्ट्रात जरी तापमान वाढ होणार असली तरी महाराष्ट्रातील दक्षिण भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे़सध्या बंगालच्या उपसागरात बाष्पीभवन वेगाने होत आहे़ सोबतच दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे वाहत असल्याने दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे़ तसेच विदर्भातदेखील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ नंदुरबारसह जळगाव व धुळ्यातही सोमवारी तापमान चाळीशीच्या जवळपास होते़ जळगावात कमाल ४०.५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले़ तर ताशी २० किमीपर्यंत वेगाने वारे वाहत होते़ धुळ्यात ३९.९ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले़ जळगाव व धुळ्यात अनुक्रमे २२ व ३४ टक्के इतकी आद्रतेची नोंद करण्यात आली होती़ राज्यात अमरावती, सांगली, सोलापूर, बीड, परभणी आदी जिल्ह्यांमधील तापमानदेखील सोमवारी चाळीशीवर गेले होते़ दोन दिवसात उष्ण लहरींचा प्रभाव वाढणार असल्याचा अंदाज आहे़