शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

सातपुड्यात सेंद्रिय शेतीचा अवलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 13:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : कृषी जागृतीसाठी खेड्याकडे चला या केंद्र शासनाच्या अभियानांतर्गत सातपुड्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : कृषी जागृतीसाठी खेड्याकडे चला या केंद्र शासनाच्या अभियानांतर्गत सातपुड्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. त्यात तीन गावांमधील १० शेतकऱ्यांनी पॉलीहाऊसद्वारे या शेती पद्धतीला सुरुवात केली आहे. याशिवाय अनेक शेतकºयांनाही याबाबत मार्गदर्शन केले जात असून या पद्धतीचा अवलंब करणाºयांमध्ये भर पडण्याची शक्यता आहे.नंदुरबार जिल्ह्यात सेंद्रिय शेतीतून अन्नधान्य व भाजीपालाचे उत्पादन वाढावे म्हणून जिल्ह्यात जेल्वे फॉऊंडेशनमार्फत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच या शेती पद्धतीचे होणारे फायदे देखील स्पष्ट करुन दिले जात आहे. सेंद्रिय शेतीला मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी प्रथम सातपुड्याच्या कुशीतील वाड्या वस्त्यांपासून सुरुवात केली. वसावे यांच्या चळवळीला सातपुड्यातील शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. या पद्धतीचा अवलंब केला जात असून प्रत्यक्ष अन्नधान्य व भाजीपाल्याचे उत्पादनच घेत आहे. त्यात बेडाकुंड ता.अक्कलकुवा येथील शेतकरी मिठ्या वळवी, सुपा वळवी यांच्यासह चार शेतकºयांनी याचा अवलंब केला आहे. तर जमाना येथील भरत पाडवी यांच्यासह सहा शेतकºयांनी पॉलीहाऊस निर्माण केले आहे. तर पोहरा येथील रतिलाल तडवी यानेही पॉलीहाऊस तयार करीत भाजीपाल्याची लागवड केली आहे.या शेतकºयांनी पुढाकार घेतल्यानंतर अनेक शेतकरी याकडे वळत आहे. शासनाकडून पॉलीहाऊससाठी अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यातून त्यांनी पॉलिहाऊस तयार करून त्यामध्ये सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. यातून उत्पादित भाज्यांची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांना देण्यात आली. दरम्यान या शेती पद्धतीचे जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी मार्गदर्शक वसावे यांचे कौतुक केले. दरम्यान सातपुड्यातील शेतकºयांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे करण्यासाठी डॉ.भारुड यांनी वसावे यांची पाठ थोपाटली.सेंद्रिय शेतीत महाराष्ट्रातील वाशिम जिल्हा आघाडीवर असून दुसºया क्रमांकावर नंदुरबार जिल्हा असल्याचे राजेंद्र वसावे यांनी सांगितले. सेंद्रिय शेतीमुळे मानवी आरोग्यासह पर्यावरणाचे समतोल ठेवण्यासाठीही सहकार्य होत आहे. शिवाय पशू पक्ष्यांच्या आरोग्यासाठीही ही शेती पद्धत उपायकारक असल्याचे म्हटले जात आहे.

 

 

सातपुड्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करणारे राजेंद्र वसावे यांचा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान सेंद्रिय शेतीबाबत नंदुरबार जिल्हा दुसºया क्रमांकावर येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली.