शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाने दुरसंचारचे टोचले कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील  बीएसएनएलच्या अनियमित सेवेला नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांनी थेट टॉवरचीच होळी करण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील  बीएसएनएलच्या अनियमित सेवेला नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांनी थेट टॉवरचीच होळी करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. त्याची दखल घेत अक्कलकुवा तहसिलदारांनी दूरसंचार विभागाला पत्राद्वारे नियमित सेवेसाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहे. शिवाय उपाययोजनेचा अहवाल देण्याचेही बजावले आहे.मोलगी परिसरातील ग्राहकांच्या सुविधेसाठी दूरसंचारमार्फत मोलगी, जमाना, सरी व वेली तर धडगाव तालुक्यात खुंटामोडी, सुरवाणी, कात्री, सिसा या ठिकाणी उभारण्यात आलेले टॉवर वारंवार बंद पडतात. या खंडीत सेवेमुळे संपर्काच्या अडचणी निर्माण झाल्या आहे. तर सद्यस्थितीत शासनामार्फत करण्यात आलेली शासकीय व खाजगी ऑनलाईन कामेही वेळेवर पूर्ण होत नाही. तेथील ऑनलाईन सेवा सर्वस्वी बीएसएनएलवर आधारित आहे. त्यामुळे सर्व ऑनलाईन कामेही याच नेटकर्ववर आधारित आहे. परंतु अशा खंडीत व अविश्वसनीय सेवेमुळे सर्वसामान्य नागरिकांसह प्रशासनाची ऑनलाईन कामे रखडत आहे. वारंवार खंडीत होणारी सेवा दुरुस्त व्हावी म्हणून वारंवार पाठपुरावा करण्यात आला, परंतु त्याची दुरसंचारने दखलच घेतली नाही. त्यामुळे त्या भागातील टॉवरची होळी करण्याचा इशारा ग्राहकांनी दिला. याबाबत दुरसंचार विभागाकडून कुठल्याही हालचाली होतांना दिसत नाही. असे असतानाच दुरसंचार विभागाला अक्कलकुवा तहसिलदारांमार्फत पत्र देण्यात आले आहे. त्यात प्रशासनांमार्फत मोलगी भागातील चारही अनियमित सेवा देणा:या टॉवरसह डाब, काठी व भगदरी येथे टॉवर उभारण्यासाठी खोदलेल्या खड्डय़ांचाही उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय ऑनलाईनची प्रशासकीय कामे व 108 रुग्णवाहिका या सुविधांपासूनही नागरिकांना वंचित राहावे लागत असल्याचे नमुद केले आहे. प्रशासनामार्फत पत्र देण्यात आले असतानाही दुरसंचार विभागामार्फत अपेक्षीत हालचाली सुरू झाल्या नसल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांच्या  आंदोलनात मालमत्तेचे नुकसान झाले अथवा कुठलाही प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी दुरसंचार विभागच जबाबदार राहणार असल्याचे पत्रात तहसिलदारांमार्फत नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे दूरसंचार विभागामार्फत कुठली भूमिका घेतली जाते याकडे मोलगी भागातील बीएसएनएलच्या ग्राहकांचे लक्ष लागून आहे.