शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ८ मे.वॅ.ची अतिरिक्त मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 11:41 IST

उन्हाळ्याचा परिणाम : २५० मेगावॅट विजेची जिल्ह्याला आवश्यकता, लोडशेडींग नाही

नंदुरबार : तापमानात मोठी वाढ होत असताना दुसरीकडे विजेची मागणीही वाढली असल्याचे दिसून येत आहे़ सध्याच्या परिस्थितीला जिल्ह्याला २५० मेगावॅट वीजेची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ तर नंदुरबार शहरातदेखील ८ मॅगावॅटची मागणी आहे़दरम्यान, सध्या जिल्ह्यात नंदुरबार, विसरवाडी, तळोदा, शहादा तसेच समशेरपूर या पाच अतिउच्चदाब असलेल्या उपकेंद्रातून तसेच ५८ विविध ठिकाणच्या ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येत आहे़ गेल्या वर्षी जुलै महिन्यात वीजेची सर्वाधिक मागणी वाढली होती़ ती साधारणत ३०० मेगावॅटपर्यंत गेलेली होती़ सध्या तापमानात मोेठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने मे-जूनपर्यंत वीजेच्या मागणीत अधिक वाढ होणार असल्याची माहिती मिळाली आहे़लोडशेडींगची समस्या नाहीगेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झालेली आहे़ त्यामुळे साहजिकच उन्हाळ्यात वीजेला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असते़ सध्या महावितरणकडे पर्याप्त वीज उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले असले तरी, मागील वर्षीचा अनुभव बघता यंदाही मेपर्यंत वीजेच्या मागणीत अचानक मोठी वाढ होऊ शकते असे सांगण्यात येत आहे़ मागील वर्षी जुलै महिन्याता वीजेची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती़ गेल्या वर्षी पाऊसदेखील समाधानकारक झाला नसल्याने मागणीनुसार वीजपुरवठा करणे हे महावितरणसमोर आव्हान होते़राज्यात १९ हजार ४३३ मेगावॅट वीजेची आवश्यकताराज्यात सध्या १९ हजार ४३३ मेगावॅट वीजेची आवश्यकता आहे़ सध्या राज्यात कोळश्याचा पुरवठा बऱ्यापैकी होत असल्याने वीजेची टंचाई भासनार नसल्याचे महावितरणच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे़ एप्रिल महिना पूर्ण तसेच मे व जूनपर्यंत ही मागणी २१ हजार मॅगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ सर्वसाधारण दिवसांमध्ये राज्यात १५ हजार ६०० मेगावॅटपर्यंत वीजेची आवश्यकता असते़ वाढत्या तापमानामुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे़ त्यामुळे शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे़ पाण्याअभावी पिक वाया जाण्याच्या स्थितीत असल्याने शेतकऱ्यांकडून मोठ्या संख्येने कृषीपंपाचा वापर करण्यात येत आहे़ त्यामुळे साहजिकच कृषिपंपासाठी मोठ्या प्रमाणात वीजेची आवश्यकता असते़ ग्रामीण भागात वीज बचत करण्यासाठी अनेक वेळा भारनियमणाचा मार्गदेखील अंमलात आणला जात असतो़ शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणा कृषीपंपाचा वापर वाढला असल्याने मुख्यत्वे दिवसा वीज वितरणावर मोठ्या प्रमाणात लोड येत असल्याचे सांगण्यात आले आहे़उकाड्यात झाली वाढतापमान व आद्रता वाढली असल्याने साहजिकच मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत असतो़ त्यामुळे नागरिकांकडून फ्रीज,एसी, कुलर पंखे आदींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे़ त्यामुळे साहजिकच दिवसा व रात्रीची मोठ्या प्रमाणात वीजेची मागणी वाढत असते़ जिल्ह्यात उद्योग-धंदे नसले तरी घरगुती वापर, शेती क्षेत्रात होणारा विजेचा वापर बघता वीजेची मोठी मागणी आहे़ नंदुरबार शहराचा विचार करता, नंदुरबारात नेहरु नगर, एकता नगर, पातोंडा येथील उपकेंद्राव्दारे साधारणत: सात ते आठ मेगावॅटचा वीजपुरवठा करण्यात येत असतो़ नंदुरबार शहरात उन्हाळ्यात ७० लाख युनीटची मागणी असते़ तीच मागणी सामान्य दिवसांमध्ये ५० लाख युनिटपर्यंत जात असते़