शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या रणांगणातील शांततेमुळे कार्यकर्ते संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर होऊन देखील जिल्ह्यातील राजकीय पातळीवर सन्नाटा दिसून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर होऊन देखील जिल्ह्यातील राजकीय पातळीवर सन्नाटा दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांनी अद्यापही गांभिर्याने घेतले नसल्याने कार्यकत्र्यामध्ये चलबिचलता वाढली आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सुटल्यानंतर आता तरी राजकीय नेतेमंडळी कार्यकत्र्याना विश्वासात घेवून निवडणुकीच्या तयारीला लागतील अशी अपेक्षा कार्यकत्र्याकडून व्यक्त होत आहे.  नंदुरबार जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच जाहीर झाली. प्रत्यक्षात निवडणुकीचे कामकाज अर्थात अर्ज दाखल करण्याची कार्यवाही ही 18 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. यात बराच कालावधी असल्यामुळे राजकीय पातळीवर सध्या शांतता दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ता स्थापनेचा संघर्षामुळे सर्वच नेतेमंडळी आणि पदाधिकारी मुंबई येथे ठाण मांडून होते. आता सत्तापेच सुटल्यानंतर तरी निवडणुकांबाबत राजकीय पक्षांनी कार्यकत्र्यामधील चलबिचलता संपवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.कार्यकत्र्यामध्ये उत्सूकताबदलत्या राजकीय परिस्थितीमुळे सर्वच पक्षांमधील कार्यकत्र्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीविषयी प्रचंड उत्सूकता लागून आहे. आघाडी होते का?, पक्षीय पातळीवर आणि चिन्हावर निवडणूक लढविली जाते का? कुणाला तिकीट मिळेल यासह विविध प्रश्न कार्यकत्र्याच्या मनात निर्माण होत आहेत. गावागावात याबाबत चर्चा आणि तर्कवितर्काना उधान आले आहे. राजकीय पक्षांमधील निणर्यावर गट आणि गणातील उमेदवारी अवलंबून असल्याने अनेकजणांना निर्णयाची प्रतिक्षा लागून आहे. बैठका नाही, मार्गदर्शन नाही..निवडणुकीसंदर्भात बैठका नाही, कार्यकत्र्याना मार्गदर्शन देखील केले जात नाही. यापूर्वी काही पक्षांनी तालुकानिहाय मेळावे घेवून कार्यकत्र्याना कामाला लागण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यात राजकीय वातावरण आणि परिस्थिती पुर्णपणे बदलल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते सैरभर झाले आहेत. भाजपने 26 रोजी निवडणुकांसंदर्भात व्यापक बैठक आयोजित केली होती. परंतु मुंबईतील राजकीय घडामोडींमुळे अनेक पदाधिकारी तेथे गेल्याने बैठक ऐनवेळी रद्द करावी लागली. आता लवकरच ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेच्या गोटात देखील शांतता आहे. काँग्रेसही सत्ता स्थापनेच्या पेचात अडकल्याने नेतेमंडळी मुंबईत होती. राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू असला तरी निवडणुकीबाबत आहे ते पदाधिकारीही उत्सूक आहेत. इतर लहान मोठय़ा पक्षांमध्येही तयारी सुरू आहे. जिल्हा परिषदेचे 56 गट व पंचायत समितीचे 112 गण आहेत. जास्तीत जास्त पंचायत समिती ताब्यात याव्या यासाठी राजकीय पक्षांचा प्रय} राहील. जिल्हा परिषद देखील ताब्यात यावी यासाठी प्रयत्न होतील. परंतु राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीमुळे नेतेमंडळी देखील संभ्रमात आहेत.निवडणूक प्रक्रिया अवघ्या 15 ते 20 दिवसांवर येवून ठेपली आहे. कार्यकत्र्यामध्ये उत्सूकता आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर बैठका होऊन कार्यकत्र्यामधील संभ्रम दूर केला पाहिजे. आवश्यक त्या रणनितीसाठी व्यापक बैठक घेवून तयारी केली गेली पाहिजे. -अभिजीत पाटील, माजी जि.प.सदस्य.