शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

शहाद्यात ५० दुचाकी चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कारण नसताना विनाकारण शहरात फिरू नका, ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कारण नसताना विनाकारण शहरात फिरू नका, असे प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करण्यात येत होते. तरीही दुचाकींची संख्या कमी न होता वाढतच होती. त्यानुसार प्रशासनाने बुधवार व गुरुवारी विनाकारण फिरणाऱ्या ५० जणांची दुचाकी जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजाराप्रमाणे ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.कोरोनाच्या अनुषंगाने संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आलेला आहे. त्यात अत्यावश्यक सेवा सुविधा वगळण्यात आलेल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांना सूट देण्यात आलेली आहे. त्याचा काही जण गैरफायदा घेताना दिसतात. एकदा भाजीपाला, किराणा भरल्यानंतर किमान सात ते आठ दिवस घराबाहेर पडू नये असे असताना दररोज किराणा, भाजीपाला घेणाऱ्यांची संख्या वाढतेच कशी हादेखील प्रश्न आहे. आपल्या घराजवळ असलेल्या किराणा दुकानात पायी जाऊन एकाने जीवनावश्यक वस्तू आल्यानंतर पुन्हा पुन्हा जाण्याची आवश्यकता नसते. हे लक्षात आल्याने प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासनाने अशा विनाकारण फिरणाºयांवर कारवाई करत त्यांना लाठीचा प्रसाद दिला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, स्टेट बँक चौक परिसरात विनाकारण फिरणाºया ५० दुचाकी वाहनांवर कारवाई करत जुन्या पोलीस स्टेशनला वाहने जमा करण्यात आले आहेत. जनता कर्फ्यू लावल्यापासून प्रशासनाच्या वतीने वारंवार कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात येत होते. तरीही काही हुल्लडबाजी करत गावात फिरत होते. यामुळे रस्त्यांवर दुचाकींची संख्या वाढल्याने प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचाºयांनी ही कारवाई केली. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करण्यात येत आहे की, आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करायला एकट्यानेच घराबाहेर पडावे. मुलगा किंवा महिलेला सोबत आणू नये. तसेच जे काही विनाकारण रस्त्यांवर फिरत आहेत व गल्लीबोळात गर्दी करून बसत आहेत. अशांवर कारवाई करत वाहने जमा करण्याची मोहीम सुरू केली आहे.-डॉ.चेतन गिरसे, प्रांताधिकारी, शहादा.पोलिसांच्या वतीने विविध भागात जाऊन कारण नसताना बाहेर पडू नका अशा वारंवार सूचना दिल्या जात आहेत. तरीही काही कारण नसताना बाहेर पडत आहेत व सर्वांचे जीव धोक्यात घालत आहेत. अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.-किसन नजन पाटील, पोलीस निरीक्षक, शहादा.

अक्कलकुवा शहरात विनाकारण भटकाणाऱ्यांवर कारवाई, १७ दुचाकी जप्त

अक्कलकुवा येथे पोलीस उप अधीक्षक विक्रम कदम, व तहसीलदार विजय कच्छवे यांच्या मार्गदर्शनात पोलीसांनी दोन दिवसात १७ मोटारसायकली जप्त त्यांच्या करुन त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच विनाकारण फिरणाºया तिघांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहे़ अक्कलकुवा शहरात सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत ेिठकेिठकाणी नाकाबंदी करून पॉर्इंट लावण्यात आले आहेत. अशा ठिकाणी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनचालक आढळून आल्यास आधी त्याची चौकशी करुन त्या जमा करण्याचे सत्र सुरु आहे़ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक रुपाली महाजन, हेड कॉन्स्टेबल शिरसाळे, मोहने वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय धनगर, शरद पाटील, कन्हैयालाल परदेशी यांनी ही कारवाई केली़