शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

पर्यायी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील लांबोळा गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने पर्यायी कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील लांबोळा गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने पर्यायी कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र या पर्यायी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कापसाच्या गाठी वाहून नेणारा ट्रक उलटून अपघात झााला.कोळदा ते खेतिया रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने ठिकठिकाणी पर्यायी कच्चे रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र या पर्यायी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे रुंदीकरणाच्या कामाला गती देण्याची गरज आहे. प्रकाशापासून ते करजई गावापर्यंत तर रस्त्यावर ठिकठिकाणी चढ-उतार तयार झाले आहेत. या रस्त्यावरुन दुचाकी वाहन चालविण्यासाठी कसरत करावी लागते तर अवजड वाहन चालकांची काय अवस्था होत असेल. शिवाय पर्यायी रस्ते कच्चे असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने वाहनधारकांसह त्या त्या गावाच्या नागरिकांचा आरोग्यासाठी घातक ठरत आहे. धुळीमुळे दुपारच्या वेळेस तर समोरुन येणारे वाहनही दिसत नाही. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे वाहनधारकांना हा त्रास सहन करावा लागत असून दररोज लहान मोठे दोनपेक्षा जास्त अपघात या मार्गावर होत आहेत.सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अकोला येथून कापसाच्या गाठी भरुन जाणारा ट्रक (क्रमांक जे.जी.१० एक्स- ७४४९) लांबोळा गावाजवळील पर्यायी रस्त्यावरुन जात होते. या रस्त्यावरील खड्ड्यात ट्रक आदळल्याने तो उलटला. या अपघातात कुठलीही जिवीतहानी अगर गंभीर जखमी झाले नसले तरी ट्रकचे व कापसाच्या गाठींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूकही काही वेळ ठप्प झाल्याने इतर वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला.या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने कोळदा ते खेतिया मार्गावर तीन वर्षापासून वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पर्यायी रस्ते योग्य नसल्याने अपघातही वाढले आहेत. तीन-चार किलोमीटरच्या अंतरावर जागोजागी अपूर्ण काम असल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळेही अपघात वाढले आहेत. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग देण्याची मागणी त्रस्त वाहनधारकांकडून होत आहे.