शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घाट रस्त्याच्या दोषयुक्त कामांमुळेच झाला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

शहादा : तोरणमाळ ते सिंधीदिगर घाटातील अपघात हा चुकीच्या पद्धतीने रस्ता बनविण्यात आला असल्याने घडला आहे. नियमानुसार रस्त्याला संरक्षक ...

शहादा : तोरणमाळ ते सिंधीदिगर घाटातील अपघात हा चुकीच्या पद्धतीने रस्ता बनविण्यात आला असल्याने घडला आहे. नियमानुसार रस्त्याला संरक्षक कठडे आवश्यक असताना तेथे कठडेच नाहीत, त्याचप्रमाणे अतितीव्र चढ-उतार असल्याने वाहनाचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला असल्याचा प्राथमिक निष्कर्ष असल्याची माहिती नाशिक येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शांताराम वळवी यांनी दिली.

रविवारी दुपारच्या सुमारास तोरणमाळ ते सिंधीदिगर या घाट रस्त्यात क्रुझर गाडीचा अपघात होऊन त्यात आठ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर १५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले होते. अपघात झाल्यानंतर सोमवारी या अपघाताची चौकशी करण्यासाठी नाशिक येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे उपविभागीय अधिकारी शांताराम वळवी, पोलीस निरीक्षक काजी, जमादार के. आर. नागरे, हवालदार गोलवड यांच्या पथकाने आज अपघातस्थळी पाहणी करून तपासणी केली. संपूर्ण दिवसभर या घाट रस्त्यावर पथकाने विविध बाजूंनी पाहणी करत अहवाल तयार केला आहे.

विभागीय अधिकारी वळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घाट रस्त्यात अनेक तीव्र चढ-उतार आहेत. नियमानुसार रस्त्याचे काम झाले पाहिजे. त्याचप्रमाणे अवघड वळणांच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक कठडे आवश्यक असताना या रस्त्यावर अपघाती अवघड वळणाच्या ठिकाणी कुठलेही संरक्षक कठडे आढळून आलेले नाहीत. अनेक ठिकाणी तीव्र चढ-उतार असल्याने वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. परिणामी घाटात ब्रेक दाबल्यानंतर गाडीचे ब्रेक फेल होणे व त्यामुळे वाहन चालकाचा वाहनावरील कंट्रोल सुटत अपघात होणे, असा प्रकार घडला आहे.

मुळात जानेवारी महिन्यात याच रस्त्यावर असा अपघात झालेला असताना आमच्या पथकाने या रस्त्याची पाहणी व तपासणी केली होती. त्यानंतर रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून संरक्षक कठडे नसल्याबाबतचा अहवाल दिल्यानंतरही ठेकेदाराने व संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडला आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या कार्यालयाने नियमानुसार या रस्त्याची निर्मिती केली नाही तर भविष्यात असे अपघात घडतील, अशी शक्यता वळवी यांनी व्यक्त केली.

पथकाने केलेल्या तपासणीत अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या असून, याबाबतचा सविस्तर अहवाल आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग, पंतप्रधान ग्राम सडक योजना कार्यालय यांना देणार असून, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी या अहवालावर गांभीर्याने या विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे भविष्यात या रस्त्यावर कायमस्वरूपी प्रवासी वाहतूक सुरू करण्यापूर्वी संबंधित विभागांनी महामार्ग सुरक्षा पथकाच्या अभियंत्यांशी चर्चा करून त्यांच्याद्वारे रस्त्याची तपासणी करून प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, असेही वळवी म्हणाले.