शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

दुर्घटना टळली, पण प्रशासन मात्र निद्रीस्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 11:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदाच्या पावसळ्यातच नदीला आलेल्या अचानक पुरामुळे ज्या ठिकाणी सहा जण वाहून गेले होते, सुदैवाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदाच्या पावसळ्यातच नदीला आलेल्या अचानक पुरामुळे ज्या ठिकाणी सहा जण वाहून गेले होते, सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले. अशा राजापूर येथील शिवण नदीवरील फरशी पुलाची उंची वाढविण्याबाबत यंदाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे याच नदीवर इतर पुलांची उंची वाढविली जात असतानां याकडेच दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.नंदुरबार तालुक्यातून वाहणाऱ्या शिवण नदीला पावसाळ्याच्या कालावधीत मोठे पूर येतात. या पुरांमुळे नंदुरबार व नवापूर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी वाढतात, काही प्रमाणात जनजीवनच विस्कळीत होते. जिल्ह्याचे तथा बाजारपेठेचेही मुख्य ठिकाण असलेल्या नंदुरबारचा संपर्क तुटतो. अशी अडचण येऊ नये यासाठी शिवण नदीवर येणाºया सर्व पुलांची आवश्यकतेनुसार उंची अधिक ठेवण्यात आली आहे. परंतु पुलाची उंची तथा विकासाबाबत राजापूर येथील पुलाकडे शासन यंत्रणेने सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. हा पुल सर्वाधिक गावांना सोयीचा ठरत असतांनाही या पुलाची उंची सर्वात कमी ठेवण्यात आली असल्याने राजापूरसह शेजाारील गावांमधील नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.शिवण नदीवर सुंदरदे, बद्रीझिरा, भवाली, धुळवद येथे दोन व व्याहूर येथे एकुण सहा पूल आहेत. त्या सर्व पुलांची आवश्यतेनुसार उंची ठेवण्यात आली आहे. त्यातून राजापूरचा पूल सुटला आहे. या पुलाचीही उंची वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही.४शिवण नदीवर बांधण्यात आलेल्या विरचक धरणातील पाणी पातळी वाढल्याच काठावरील नागरिकांना कुठलीही पूर्वसूचना न देता पाणी सोडले जात होते, त्यामुळे अनेक जण अडचणीत आले होते. अशी अडचण निर्माण होऊ नये, यासाठी केलेल्या पाठपुराव्याचीच दखल घेत सुचना केल्या गेल्या.लोकसभा व विधानसभेपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत राजापूरसह शेजारिल गावातील मतदारांनी भाजपाला भरीव मदत केल्याचे आढळून येते. तसे विधानसभा मतदार क्षेत्रासह गट व गणातही भाजपाच्या उमेदवारालाच प्रतिनिधीत्वाची संधी दिली आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा परिषदेतही भाजपाला संधी मिळाली आहे. त्यामुळे भाजपाच्या लोकप्रतिनिधींकडून या भागातील नागरिकांच्या नवीन पुल निर्मितीबाबत अपेक्षा वाढल्या आहे.पुलाची उंची वाढविणे तथा नवीन पुलाबाबत नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य राजश्री गावीत यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी या कामासाठी निधी मिळवून देण्यास प्रयत्नशिल असल्याचे सांगितले, त्यामुळे त्यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींकडूनही नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहे.