लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदाच्या पावसळ्यातच नदीला आलेल्या अचानक पुरामुळे ज्या ठिकाणी सहा जण वाहून गेले होते, सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले. अशा राजापूर येथील शिवण नदीवरील फरशी पुलाची उंची वाढविण्याबाबत यंदाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे याच नदीवर इतर पुलांची उंची वाढविली जात असतानां याकडेच दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.नंदुरबार तालुक्यातून वाहणाऱ्या शिवण नदीला पावसाळ्याच्या कालावधीत मोठे पूर येतात. या पुरांमुळे नंदुरबार व नवापूर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी वाढतात, काही प्रमाणात जनजीवनच विस्कळीत होते. जिल्ह्याचे तथा बाजारपेठेचेही मुख्य ठिकाण असलेल्या नंदुरबारचा संपर्क तुटतो. अशी अडचण येऊ नये यासाठी शिवण नदीवर येणाºया सर्व पुलांची आवश्यकतेनुसार उंची अधिक ठेवण्यात आली आहे. परंतु पुलाची उंची तथा विकासाबाबत राजापूर येथील पुलाकडे शासन यंत्रणेने सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. हा पुल सर्वाधिक गावांना सोयीचा ठरत असतांनाही या पुलाची उंची सर्वात कमी ठेवण्यात आली असल्याने राजापूरसह शेजाारील गावांमधील नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.शिवण नदीवर सुंदरदे, बद्रीझिरा, भवाली, धुळवद येथे दोन व व्याहूर येथे एकुण सहा पूल आहेत. त्या सर्व पुलांची आवश्यतेनुसार उंची ठेवण्यात आली आहे. त्यातून राजापूरचा पूल सुटला आहे. या पुलाचीही उंची वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही.४शिवण नदीवर बांधण्यात आलेल्या विरचक धरणातील पाणी पातळी वाढल्याच काठावरील नागरिकांना कुठलीही पूर्वसूचना न देता पाणी सोडले जात होते, त्यामुळे अनेक जण अडचणीत आले होते. अशी अडचण निर्माण होऊ नये, यासाठी केलेल्या पाठपुराव्याचीच दखल घेत सुचना केल्या गेल्या.लोकसभा व विधानसभेपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत राजापूरसह शेजारिल गावातील मतदारांनी भाजपाला भरीव मदत केल्याचे आढळून येते. तसे विधानसभा मतदार क्षेत्रासह गट व गणातही भाजपाच्या उमेदवारालाच प्रतिनिधीत्वाची संधी दिली आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा परिषदेतही भाजपाला संधी मिळाली आहे. त्यामुळे भाजपाच्या लोकप्रतिनिधींकडून या भागातील नागरिकांच्या नवीन पुल निर्मितीबाबत अपेक्षा वाढल्या आहे.पुलाची उंची वाढविणे तथा नवीन पुलाबाबत नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य राजश्री गावीत यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी या कामासाठी निधी मिळवून देण्यास प्रयत्नशिल असल्याचे सांगितले, त्यामुळे त्यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींकडूनही नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहे.
दुर्घटना टळली, पण प्रशासन मात्र निद्रीस्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 11:20 IST