शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दुर्घटना टळली, पण प्रशासन मात्र निद्रीस्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 11:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदाच्या पावसळ्यातच नदीला आलेल्या अचानक पुरामुळे ज्या ठिकाणी सहा जण वाहून गेले होते, सुदैवाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदाच्या पावसळ्यातच नदीला आलेल्या अचानक पुरामुळे ज्या ठिकाणी सहा जण वाहून गेले होते, सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले. अशा राजापूर येथील शिवण नदीवरील फरशी पुलाची उंची वाढविण्याबाबत यंदाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे याच नदीवर इतर पुलांची उंची वाढविली जात असतानां याकडेच दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.नंदुरबार तालुक्यातून वाहणाऱ्या शिवण नदीला पावसाळ्याच्या कालावधीत मोठे पूर येतात. या पुरांमुळे नंदुरबार व नवापूर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी वाढतात, काही प्रमाणात जनजीवनच विस्कळीत होते. जिल्ह्याचे तथा बाजारपेठेचेही मुख्य ठिकाण असलेल्या नंदुरबारचा संपर्क तुटतो. अशी अडचण येऊ नये यासाठी शिवण नदीवर येणाºया सर्व पुलांची आवश्यकतेनुसार उंची अधिक ठेवण्यात आली आहे. परंतु पुलाची उंची तथा विकासाबाबत राजापूर येथील पुलाकडे शासन यंत्रणेने सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. हा पुल सर्वाधिक गावांना सोयीचा ठरत असतांनाही या पुलाची उंची सर्वात कमी ठेवण्यात आली असल्याने राजापूरसह शेजाारील गावांमधील नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.शिवण नदीवर सुंदरदे, बद्रीझिरा, भवाली, धुळवद येथे दोन व व्याहूर येथे एकुण सहा पूल आहेत. त्या सर्व पुलांची आवश्यतेनुसार उंची ठेवण्यात आली आहे. त्यातून राजापूरचा पूल सुटला आहे. या पुलाचीही उंची वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही.४शिवण नदीवर बांधण्यात आलेल्या विरचक धरणातील पाणी पातळी वाढल्याच काठावरील नागरिकांना कुठलीही पूर्वसूचना न देता पाणी सोडले जात होते, त्यामुळे अनेक जण अडचणीत आले होते. अशी अडचण निर्माण होऊ नये, यासाठी केलेल्या पाठपुराव्याचीच दखल घेत सुचना केल्या गेल्या.लोकसभा व विधानसभेपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत राजापूरसह शेजारिल गावातील मतदारांनी भाजपाला भरीव मदत केल्याचे आढळून येते. तसे विधानसभा मतदार क्षेत्रासह गट व गणातही भाजपाच्या उमेदवारालाच प्रतिनिधीत्वाची संधी दिली आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा परिषदेतही भाजपाला संधी मिळाली आहे. त्यामुळे भाजपाच्या लोकप्रतिनिधींकडून या भागातील नागरिकांच्या नवीन पुल निर्मितीबाबत अपेक्षा वाढल्या आहे.पुलाची उंची वाढविणे तथा नवीन पुलाबाबत नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य राजश्री गावीत यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी या कामासाठी निधी मिळवून देण्यास प्रयत्नशिल असल्याचे सांगितले, त्यामुळे त्यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींकडूनही नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहे.