शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रीक ‘थंब’ घेत कर्जमाफी प्रक्रियेला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा ज्योतिबा फुले कृषीमुक्ती योजनेला वेग आला असून शासनाने शेतकऱ्यांचे बायोमेट्रीक थंब स्विकारणे सुरु ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा ज्योतिबा फुले कृषीमुक्ती योजनेला वेग आला असून शासनाने शेतकऱ्यांचे बायोमेट्रीक थंब स्विकारणे सुरु केले आहे़ यातून सात हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ‘अंगठा’ दिल्याने लवकरच त्यांची बँक खाती ‘निल’ होण्याचे संदेश शासनाकडून देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे़खरीप हंगामासाठी पीककर्जाची मागणी करणाºया शेतकºयांना शासनाने केलेल्या कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा नसल्याने नवीन कर्ज घेण्यास अडचणी येत आहेत़ यावर मार्ग काढून शासनाने राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकांसोबत चर्चा केली होती़ ही चर्चा एकीकडे सुरु असतानाच ‘लॉकडाऊन’मुळे बंद करण्यात आलेली कर्जमाफी योजनेची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली आहे़ जिल्हास्तरावर यापूर्वी बँकांनी शेतकºयांची संपूर्ण माहिती अपलोड करुन तयार केली होती़ यातून ९ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकेच्या शाखांसह खाजगी व कोआॅपरेटीव्ह बँकांनी ३१ हजार शेतकºयांची खाती आधार सोबत जोडण्यात आली होती़ या प्रक्रियेनंतर आधार लिंक झालेल्या खात्याला केवळ शेतकºयांचा बायोमेट्रीक थंब देण्याची गरज होती़ परंतू लॉकडाऊनमुळे बायोमेट्रीक थंब देण्याची ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती़ गेल्या आठवड्यात शासनाने ही प्रक्रिया पुन्हा सुरु केली असून थंब करणाºया शेतकºयांना लवकरच कर्जमुक्तीचा मेसेज येण्याची शक्यता बँकिंग वर्तुळातून वर्तवली जात आहे़ शेतकºयांच्या ‘थंब’मुळे त्यांच्या थकीत कर्जाची माहिती आॅनलाईन होवून बँकांना कामकाज करणे सोपे होणार आहे़ दरम्यान सोमवारी जिल्ह्यात होणाºया कर्जमाफी मेळाव्यात कर्जमुक्तीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांनाही अर्ज देता यावे असे नियोजन करण्यात आल्याची माहिती बँकांकडून देण्यात आली आहे़ज्या शेतकºयांनी आतापर्यंत माहिती सुविधा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक थंब करुन घेतले आहे़ त्यांना अद्याप कर्जमाफ झाल्याचा मेसेज आलेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे़

 

सर्वाधिक शेतकरी जिल्हा बँकेचे

जिल्ह्यात एकूण ३१ हजार ३६४ शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी कर्जमुक्ती योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे़ यात सर्वाधिक १४ हजार ३१३ शेतकरी हे धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सभासद आहेत़ त्याखालोखाल स्टेट बँक आॅफ इंडिया ४ हजार ४५६, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ३ हजार ५९० अशा १५ बँकांमधील ३१ हजार शेतकरी पात्र आहेत़ या शेतकऱ्यांच्या खात्यावर शिल्लक असलेले थकीत कर्जाच्या रकमेची माहिती यापूर्वीच अपलोड झाली आहे़ बायोमेट्रिक थंब झाल्याने कर्जमाफीवर शिक्कामोर्तब झाले आहे़

९० कोटींच्या मागणीकडे लक्ष लागून

४शनिवार सायंकाळपर्यंत जिल्हा बँकेच्या १४ हजारपैकी सात हजार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी बायोमेट्रिक थंब करुन दिला आहे़ नवीन आठवड्यात सर्व शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करतील अशी शक्यता आहे़४१४ राष्ट्रीयकृत बँकांच्या १५ हजार ८५१ शेतकऱ्यांची बायोमेट्रिकची प्रक्रियाही याच आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे़४दरम्यान १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात जिल्हा बँकेने वाटप केलेल्या पीक कर्जाची माफी होणार आहे़ कर्ज घेणाºया १४ हजार शेतकºयांच्या नावांच्या ३०७ याद्यांची तपासणी लेखापरीक्षक यांनी केली आहे़ यानुसार शेतकºयांची ८५ कोटी १५ लाख ६६ हजार रुपयांची कर्जमाफी प्रलंबित आहे़ या माफीच्या रकमेसाठी जिल्हा बँकेने शिखर बँकेकडे ९० कोटी रुपयांची मागणी केली आहे़ परंतू अद्याप त्यात यश आलेले नाही़ लवकरच शिखर बँक यावर निर्णय घेणार असल्याची माहिती आहे़ २०१५ ते २०१९ या काळात धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेने १४ हजार शेतकºयांना दिलेले कर्ज हे केवळ ६३ कोटी रुपये असून २१ कोटी २५ लाख रुपये हे त्या रकमेचे व्याज आहे़