शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

बसेस अभावी विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील गावांना तळोदा बसस्थानकातून सकाळी सुटणा:या  बसेसला विलंब होत असल्यामुळे शाळा-महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी वेळेत ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील गावांना तळोदा बसस्थानकातून सकाळी सुटणा:या  बसेसला विलंब होत असल्यामुळे शाळा-महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी वेळेत पोहचत नसल्याने त्यांचे वर्षभरापासून शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत तळोदा बसस्थानकाच्या प्रमुखास विद्याथ्र्यानी निवेदन देऊनही बसच्या वेळेत बदल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. या प्रकरणी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी तातडीने दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्याथ्र्यानी दिला आहे. दरम्यान याबाबत बसस्थानकातील प्रमुखास विचारले असता अक्कलकुवा आगाराकडे निवेदन पाठविले असल्याचे सांगण्यात आले.तळोदा तालुक्यातील रांझणी परिसरातील गोपाळपूर, नवागाव व चिनोदा या गावांमधील साधारण 70 ते 80 मुले व मुली शाळा व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तळोद्याला येत असतात. या विद्याथ्र्याना अपडाऊन करण्यासाठी अक्कलकुवा आगाराकडून तळोद्याहून सकाळी सव्वासात वाजता बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसमधून प्रवास करून सर्व शाळा, महाविद्यालयीन मुले तळोद्याला येत असतात, असे असले तरी या बसच्या वेळापत्रकामुळे विद्याथ्र्याना अडचणीचे ठरत आहे. कारण ही बस तळोद्याहून साडेसहा, पावणेसात वाजेला सुटून ती साधारण साडेसातला पोहचत असते. साहजिकच यामुळे विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहचू शकत नाही. शाळा, महाविद्यालय भरण्याची वेळ, सव्वासात, साडेसात वाजेला असते. त्यामुळे विद्याथ्र्याचा पहिला तास कामस्वरूपी वाया जात असतो. त्यातही शालेय विद्याथ्र्याचा पहिला तास गणित अथवा इंग्रजीचा असतो. बसमुळे वेळेवर पोहोतच नसल्याने या कठीण विषयांचे नुकसान होत असल्याचे विद्यार्थी सांगतात. रस्त्याच्या दुरवस्थेने बसला रांझणीर्पयत पोहोचणे तेथून पुन्हा तळोद्याला येण्यात बराच वेळ लागतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन तळोदा-रांझणी या सकाळी सुटणा:या बसच्या वेळेत बदल करावा, अशी विद्याथ्र्याची मागणी आहे. तसे निवेदनही महिनाभरापूर्वी तळोदा बसस्थानकाच्या प्रमुखांना दिले आहे. याप्रकरणी तातडीने दखल घेऊन वेळेत बदल करण्याची आवश्यकता असतांना विद्याथ्र्याच्या निवेदनास केराची टोपली दाखवत उदासिन धोरण घेतल्याचा विद्याथ्र्याचा आरोप आहे. वास्तविक बसच्या वेळेत थोडासा बदल करण्याची मागणी आहे. ही बस सकाळी सहा वाजेला तळोद्याूहन रांझणीस साडेसहा तेथून सातवाजेला तळोद्यात पोहोचली तर विद्याथ्र्याना सकाळच्या तासिका सुरळीत सापडतील. मात्र अक्कलकुवा आगारप्रमुख एवढी तसदी घ्यायलादेखील तयार नसल्याने या प्रशासनाच्या हेकेखोर प्रवृत्तीबाबत विद्याथ्र्यानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थिनींसाठी एस.टी महामंडळाने मानव विकास मिशन अंतर्गत स्वतंत्र बस असतांना या बसमध्ये इतर प्रवाशांना बसवून विद्यार्थिनींना अक्षरश: कोंबून        आणले जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. त्याचबरोबर हे विद्यार्थी वेळेवर पोहोचत नसल्यामुळे त्यांना शिक्षकांचा रोषदेखील पत्करावा लागत असल्याचे विद्यार्थी म्हणात. या मार्गावरील विद्याथ्र्याचे होत असलेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ प्रशासनाने दखल घेऊन तातडीने बसच्या वेळेस बदल करावा, अशी मागणी विद्याथ्र्यानी केली आहे.