शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रामाणिकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील एकूण २७ हजार शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील एकूण २७ हजार शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत़ या शेतकऱ्यांची माहिती अपलोड केल्यानंतर त्यांचे आधार प्रामाणिकरण करण्याची कारवाई लॉकडाऊनमुळे रखडली होती़ ही प्रक्रिया गेल्या आठवड्यात पूर्ववत सुरू झाली असून यांतर्गत आजअखेरीस १८ हजार शेतकऱ्यांनी आधार प्रामाणिकरण करण्यासाठी ‘थंब’ दिले आहेत़आधार प्रामाणिकरण पूर्ण करणाºया या शेतकºयांना आता केवळ खात्यावर शासनाने रक्कम देण्याची प्रतिक्षा आहे़ ही रक्कम मिळाल्यानंतर शेतकºयांवर असलेली कर्ज बँका वजा करुन उर्वरित रक्कम शेतकºयांना परत मिळणार आहे़ परंतु अद्याप शासनाने याबाबत कोणतीही सूचना केलेली नसल्याने बँका आधार प्रामाणिकरण पूर्ण झाल्याचे रिपोर्ट तयार करत आहेत़ जिल्ह्यात केवळ १० दिवसात अत्यंत वेगाने झालेल्या या प्रक्रियेतून शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे़ एकीकडे २७ हजार शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असल्याचे शासनाच्या पोर्टलवर दिसत असताना दुसरीकडे जानेवारी महिन्यात १५ राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आधार लिंक केलेल्या ३१ हजार ३६४ शेतकरी खातेदारांचे काय, असाही प्रश्न आता उपस्थित होतो आहे़ केवळ २७ हजार शेतकºयांची माहिती अपलोड केली गेली असल्याने उर्वरित पाच हजार शेतकºयांची माहिती अपलोड होणार आहे किंवा काही तांत्रिक त्रुटींमुळे ही माहिती भरणे बँकानी राखून ठेवले याबाबत माहिती देण्यात आलेली नाही़आधार प्रामाणिकरण करणाºया शेतकºयांना मोबाईलद्वारे खात्यावर रक्कम आल्याचा मेसेज देण्यात येणार असल्याचे बँकांकडून सांगण्यात आले आहे़ यामुळे शेतकºयांची बँकांबाहेर होणारी गर्दी कमी होणार आहे़

जिल्ह्यातील एकूण ६ हजार ३४२ शेतकऱ्यांचे आधार प्रामाणिकरण अद्याप शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली आहे़ येत्या आठवड्यात हे सर्व कामकाज पूर्ण होणार आहे़ दरम्यान जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांना कृषी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाल्याची माहितीही समोर आली आहे़ या शेतकºयांना २ कोटी ४६ लाख रुपयांचे पीककर्ज माफ करण्यात आले आहे़ ही कर्जमाफी जिल्हा बँककडून झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे़जिल्हा बँकेचे सर्वाधिक १४ हजार ३१३ तर राष्ट्रीयकृत बँकांचे १७ हजार ५१ शेतकºयांच्या बँक खात्यांबाबत ही कारवाई सुरु आहे़ जिल्हा बँकेच्या कर्जमाफीची रक्कम ही ८५ कोटी १५ लाख ६६ एवढी आहे़ तर राष्ट्रीयकृत बँकांची कर्जमाफीची रक्कम ही १५० कोटींच्या पुढे आहे़ ही रक्कम शासनाने शेतकºयांच्या खात्यावर दिल्यानंतर आधार प्रमाणिकरण पूर्ण झालेल्या शेतकºयांना दिलासा मिळणार आहे़सोमवारी जिल्ह्यातील १०३ राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांंतर्गत पीककर्ज मेळावे घेण्यात आले होते़ मेळाव्यात कर्जमुक्तीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांना बोलावले गेले होते़ यातील बहुतांश शेतकºयांनी नव्याने कर्जासाठी अर्जही केले आहेत़

जिल्ह्यातील बँकांनी त्यांच्याकडील २७ हजार १३५ खात्यांचे अपडेशन करुन माहिती शासनाकडे पाठवून दिली होती़ यातील २४ हजार ७२० ही नियमित कर्जखाती आहेत़ यापैकी एकूण १८ हजार ३७८ जणांच्या आधार प्रामाणिकरणाची कारवाई शिल्लक आहे़ यातील १३८ बँक खाती विविध तक्रारींची असल्याने त्यांचे कामकाज थांबले आहे़ केवळ चार खात्यांच्या तक्रारींचे निरसन झाल्याने त्यांचे आधार प्रामाणिकरण होणार आहे़ जिल्हास्तरीय समितीकडे २५ खात्यांच्या तक्रारी प्रलंबित असून त्यावर लवकरच कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़

४जिल्हास्तरावर सोबत तहसीलदार यांच्याकडेही कर्जमुक्ती योजनेंतर्गत येणाऱ्या कर्जखात्याबाबत तक्रार करण्याचे शेतकऱ्यांना सुचवले गेले होते़ यात १०२ तक्रारी तहसीलदारांकडे प्रलंबित आहेत़ तर सात तक्रारी ह्या निकाली काढल्या आहेत़आधार प्रामाणिकरण होणाºया खात्यांमध्ये सर्वाधिक खाती ही जिल्हा बँकेची आहेत़ तब्बल १२ हजार शेतकºयांच्या खात्यांचे आधार प्रामाणिकरण झाल्याची माहिती आहे़

शासनस्तरावरुन आधार अपडेशन करुन घेण्याचे आदेश आहेत़ त्यानुसार कारवाई सुरु आहे़ पुढील निर्णय शासन घेणार आहे़ बँकांनी अपलोड केलेल्या माहिती आधारे प्रामाणिकरण करण्यात येत आहे़-अशोक चाळक,जिल्हा उपनिबंधक, नंदुरबाऱ