शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

पावसामुळे शेतकऱ्यांना उभारी खरीप क्षेत्राची ९९ टक्के भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पावसाने जोर धरला असल्याने जिल्ह्यात थांबवण्यात आलेल्या पेरण्यांचे आकडे पुन्हा वाढत असून सोमवारअखेरीस ९९ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पावसाने जोर धरला असल्याने जिल्ह्यात थांबवण्यात आलेल्या पेरण्यांचे आकडे पुन्हा वाढत असून सोमवारअखेरीस ९९ टक्के क्षेत्रावर पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती आहे़ शेतकऱ्यांनी सरासरी ४० टक्के पाऊस असताना ९० टक्के पेरण्या गेल्या १५ दिवसांपूर्वीच पूर्ण केल्या होत्या़जिल्ह्यात पाऊस बरसणार असल्याची माहिती असून येत्या दोन-चार दिवसात १०० टक्के पेरणीक्षेत्रावर खरीप पिके दिसून येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ शेतकºयांनी यंदा प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, भात, ज्वारी आणि मका या पिकांवर भर दिला आहे़ पावसाअभावी यंदा कडधान्य पिक पेरणीत घट येऊन क्षेत्रही कमी झाल्याचे दिसून आले आहे़ गेल्या वर्षी जिल्ह्यात झालेल्या विक्रमी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी १०० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रात पेरण्या केल्या होत्या़ पाऊस उशिराने आल्याने पेरणीचा कालावधी लांबला होता़ यंदाही तीच स्थिती निर्माण झाल्याने शहादा तालुका वगळता इतर पाच तालुक्यातील शेतकºयांनी पावसाचा अंदाज घेत पिकांच्या पेरणीला सुरूवात केली होती़ यातून अद्याप ठिकठिकाणी पेरणीची कामे शेतकरी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे़यंदाच्या हंगामात शहादा तालुक्यात ९९ टक्के, तळोदा ११०, धडगाव १०९ तर अक्कलकुवा तालुक्यात १०१ टक्के पेरण्या झाल्या आहेत़ पावसाची स्थिती समाधानकारक असल्याने या तालुक्यांमध्ये निर्धारित क्षेत्रापेक्षा वाढीव पेरण्या झाल्या आहेत़दुसरीकडे सर्वाधिक पसंतीचा कापूस यंदा १ लाख २४ हजार ६६४ हेक्टरवर लागवड करण्यात आला आहे़ यात नंदुरबार ४८ हजार ८१, नवापूर ८ हजार ५३१, शहादा ५० हजार ४८२, तळोदा १० हजार १०६, धडगाव १ हजार १४ तर अक्कलकुवा तालुक्यात ६ हजार ३९० हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे़जिल्ह्यात आजअखेरीस १८ हजार ८१ हेक्टर क्षेत्रात भात़, ३० हजार ४७ हेक्टर क्षेत्रात ज्वारी़३१ हजार ४५५ हेक्टरवर मका़२१ हजार १४६ हेक्टर सोयाबीन पेरा पूर्ण झाला आहे़धान्य आणि तेलबिया पिकांचे क्षेत्र वाढताना मात्र कडधान्य पिकांचे क्षेत्र घटले आहे़ १७ हजार हेक्टरव होणार तूर १० हजार, मूग ४ हजार तर उडीद ९ हजार ३२५ हेक्टरपर्यंत आहे़जिल्ह्यात २ लाख ९५ हजार २१९ हेक्टरवर यंदा पेरण्यांचे नियोजन होते़ त्यातुलनेत आजअखेर २ लाख ८० हजार २०१ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या पूर्ण करण्यात झाल्या आहेत़ यात नंदुरबार ६७ हजार ८ हेक्टर, नवापूर ५५ हजार १७३, शहादा ७५ हजार ३६८, तळोदा २३ हजार ७४७, धडगाव १९ हजार ७२३ तर अक्कलकुवा तालुक्यात ३९ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़