शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

पावसामुळे शेतकऱ्यांना उभारी खरीप क्षेत्राची ९९ टक्के भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पावसाने जोर धरला असल्याने जिल्ह्यात थांबवण्यात आलेल्या पेरण्यांचे आकडे पुन्हा वाढत असून सोमवारअखेरीस ९९ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पावसाने जोर धरला असल्याने जिल्ह्यात थांबवण्यात आलेल्या पेरण्यांचे आकडे पुन्हा वाढत असून सोमवारअखेरीस ९९ टक्के क्षेत्रावर पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती आहे़ शेतकऱ्यांनी सरासरी ४० टक्के पाऊस असताना ९० टक्के पेरण्या गेल्या १५ दिवसांपूर्वीच पूर्ण केल्या होत्या़जिल्ह्यात पाऊस बरसणार असल्याची माहिती असून येत्या दोन-चार दिवसात १०० टक्के पेरणीक्षेत्रावर खरीप पिके दिसून येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ शेतकºयांनी यंदा प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, भात, ज्वारी आणि मका या पिकांवर भर दिला आहे़ पावसाअभावी यंदा कडधान्य पिक पेरणीत घट येऊन क्षेत्रही कमी झाल्याचे दिसून आले आहे़ गेल्या वर्षी जिल्ह्यात झालेल्या विक्रमी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी १०० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रात पेरण्या केल्या होत्या़ पाऊस उशिराने आल्याने पेरणीचा कालावधी लांबला होता़ यंदाही तीच स्थिती निर्माण झाल्याने शहादा तालुका वगळता इतर पाच तालुक्यातील शेतकºयांनी पावसाचा अंदाज घेत पिकांच्या पेरणीला सुरूवात केली होती़ यातून अद्याप ठिकठिकाणी पेरणीची कामे शेतकरी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे़यंदाच्या हंगामात शहादा तालुक्यात ९९ टक्के, तळोदा ११०, धडगाव १०९ तर अक्कलकुवा तालुक्यात १०१ टक्के पेरण्या झाल्या आहेत़ पावसाची स्थिती समाधानकारक असल्याने या तालुक्यांमध्ये निर्धारित क्षेत्रापेक्षा वाढीव पेरण्या झाल्या आहेत़दुसरीकडे सर्वाधिक पसंतीचा कापूस यंदा १ लाख २४ हजार ६६४ हेक्टरवर लागवड करण्यात आला आहे़ यात नंदुरबार ४८ हजार ८१, नवापूर ८ हजार ५३१, शहादा ५० हजार ४८२, तळोदा १० हजार १०६, धडगाव १ हजार १४ तर अक्कलकुवा तालुक्यात ६ हजार ३९० हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे़जिल्ह्यात आजअखेरीस १८ हजार ८१ हेक्टर क्षेत्रात भात़, ३० हजार ४७ हेक्टर क्षेत्रात ज्वारी़३१ हजार ४५५ हेक्टरवर मका़२१ हजार १४६ हेक्टर सोयाबीन पेरा पूर्ण झाला आहे़धान्य आणि तेलबिया पिकांचे क्षेत्र वाढताना मात्र कडधान्य पिकांचे क्षेत्र घटले आहे़ १७ हजार हेक्टरव होणार तूर १० हजार, मूग ४ हजार तर उडीद ९ हजार ३२५ हेक्टरपर्यंत आहे़जिल्ह्यात २ लाख ९५ हजार २१९ हेक्टरवर यंदा पेरण्यांचे नियोजन होते़ त्यातुलनेत आजअखेर २ लाख ८० हजार २०१ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या पूर्ण करण्यात झाल्या आहेत़ यात नंदुरबार ६७ हजार ८ हेक्टर, नवापूर ५५ हजार १७३, शहादा ७५ हजार ३६८, तळोदा २३ हजार ७४७, धडगाव १९ हजार ७२३ तर अक्कलकुवा तालुक्यात ३९ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़