शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

कळंबू येथे ९७ वर्षीय आजीबाईंनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST

कोरोनाचा वाढता फैलाव कसा रोखावा, यासाठी जिल्ह्यात लाॅकडाऊन व आठवड्यातून चार दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच ...

कोरोनाचा वाढता फैलाव कसा रोखावा, यासाठी जिल्ह्यात लाॅकडाऊन व आठवड्यातून चार दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच शासनाच्यावतीने राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम ग्रामीण भागासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये राबविली जात आहे. कोरोना लस सुरक्षित आहे व तिचे कुठलेच दुष्परिणाम नाहीत. तरी प्रत्येक नागरिकाने या लसीकरणात सहभागी व्हावे, विषयावर प्रबोधन करुन जनजागृती केली जात आहे. कळंबू येथील जमुनाबाई चिंधा रोकडे (माळी) या ९७ वर्षांच्या आजीबाईंनी सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणात सहभाग घेऊन कोरोना लस घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतिलाल पावरा, डॉ. राकेश पाटील, आरोग्य सेविका दीपाली गिरासे, आरोग्य सेवक योगेश ठाकूर आदी उपस्थित होते. कोरोनाला आपल्याला हरवायचे आहे, तर सर्व नागरिकांनी कोरोना लसीबद्दल भीती न बाळगता लसीकरणात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी या आजीबाईंनी केले.

शासनाच्यावतीने ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण राबविले जात आहे. लस सुरक्षित असून, नागरिकांनी मनात कुठलीही भीती न बाळगता लसीकरणात सहभाग घ्यावा.

-डॉ. राकेश पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी, उपकेंद्र, कळंबू, ता. शहादा