शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

समाजकार्य महाविद्यालयाचे ९० टक्के विद्यार्थी नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 13:05 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  येथील समाजकार्य महाविद्यालयातील ९० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून या प्रकाराची चौकशी होऊन ...

  लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  येथील समाजकार्य महाविद्यालयातील ९० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून या प्रकाराची चौकशी होऊन विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करण्याची मागणी अभाविपने कुलगुरुंकडे केली आहे.सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची मानसिकता नसताना शासन-प्रशासन अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांशी खेळत होते. पण अशाही परिस्थितीत समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे पदवीचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून ऑक्टोबर २०२० मध्ये बी.एस.डब्ल्यू. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा दिल्या. परंतु विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणींमुळे पदवी पूर्ण करणारे, भविष्याची दिशा आणि दशा ठरवण्याच्या वर्षात ( हेल्थ सिस्टम इन इंडिया) या एकाच विषयात समाजकार्य महाविद्यालयाचे जवळपास ९० टक्के विद्यार्थी नापास झालेले आहेत. या विषयाची दखल घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने  विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणी दूर करून जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा यासाठी तळोदा येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले.  या विषयाची चौकशी करून विद्यार्थ्यांचे सुधारित निकाल विद्यापीठाने लवकर लावावे अन्यथा विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशारा या वेळी अभाविपचे तळोदा शहरमंत्री प्रेम माळी यांनी दिला. यावेळी अभाविपचे जिल्हा संयोजक नीलेश हिरे, ललीत देसले, राहुल पाटील, दीपक पाडवी, देवीसिंग ठाकरे, शुभम पाटील, सागर वळवी, पृथ्वीराज चव्हाण व विद्यार्थी उपस्थित होते.