शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

निराधार योजनेतील ८२ प्रकरणे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गेल्या सहा-सात महिन्यांपासून नवीन समितीचे पुनर्गठण व कोरोना महामारीमुळे रखडलेली संजय गांधी निराधार योजनेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गेल्या सहा-सात महिन्यांपासून नवीन समितीचे पुनर्गठण व कोरोना महामारीमुळे रखडलेली संजय गांधी निराधार योजनेच्या प्रस्तावांवर कार्यवाहीसाठी महसूल प्रशासनातर्फे संबंधीत यंत्रणांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत साधारण ८२ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. नवीन लाभार्थ्यांना आता पुढील महिन्यापासून लाभ मिळणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.राज्यात महाविकास आघाडीचे शासन सत्तारूढ झाल्यानंतर जवळपास सर्वच अशासकीय समित्यांचे पुनर्गठण रखडले आहे. यात दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांसाठी असलेली संजय गांधी निराधार समिती अपवाद ठरलेली नाही. त्यामुळे बैठक घेण्याबाबत प्रशासनाने सुद्धा उदासिन भूमिका घेतल्याचा आरोप केला जात होता. तब्बल सहा ते सात महिन्यापासून तळोदा तालुकास्तरीय समितीची बैठकदेखील रखडली होती. साहजिकच लाभार्थ्यांचे प्रस्ताव कार्यवाही अभावी तसेच कार्यालयात धुळखात पडले होते. साधारण १५० ते २०० लाभार्थ्यांचे प्रस्ताव दाखल झाले होते.गेल्या अनेक महिन्यांपासून प्रस्तावांवर कार्यवाही होत नसल्यामुळे लाभार्थीही सारखे संजय गांधी कार्यालयात हेलपाटे मारत असत. त्यांना आज होईल, उदञया होईल, असे वायदे दिले जात असे. त्यानंतर कोरोेना महामारीच्या उद्रेकामुळे मिटींग रखडल्याचा बहाना केला जात होता. वैतागलेल्या काही लाभार्र्थींनी आपली कैफीयत लोकमतकडे मांडल्यानंतर गेल्या महिन्यात या संदर्भात वस्तुनिष्ठ वृत्त प्रकाशीत केले होते.या वृत्ताची दखल घेत येथील महसूल प्रशासनाने लगेच संजय गांधी निराधार यंत्रणेतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दाखल झालेल्या १५० प्रकरणांवर कार्यवाही करून त्यातील १४ प्रकरणे मंजूर करण्यात आली. उर्वरित प्रकरणांमध्ये त्रुटी असल्याने नामंजूर झाल्याचे सांगण्यात आले, असे असले तरी कागद पत्रांच्या पूर्ततेसाठी महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांना ही कागदपत्रे पुन्हा नवीन काढण्यासाठी लाभार्थ्यांना मदत करण्याची सूचना प्रशासनाने देण्याची आवश्यकता आहे. कारण लाभार्थीस कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कोणीच मदत करीत नाहीत. त्यामुळे मिळाले त्या कागद पत्रांची पूर्तता करून जसा-तसा प्रस्ताव दाखल करून तो मोकळा होता. इकडे त्रुटींमुळे प्रस्ताव नाकारण्यात आल्यानंतर त्यांच्या अंगी नैराश्य येते. निदान याबाबत महसूल विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने दखल घेऊन लाभार्र्थींचा प्रस्ताव तयार करण्याची संबंधीत तलाठी अथवा ग्रामसेवकास सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी आहे. वास्तविक तालुक्यात दारिद्र्य रेषेखालील वृद्ध-निराधार दाम्पत्यांची संख्या मोठी आहे. परंतु या योजनेच्या लाभासाठी लागणारी कागद पत्रांची कटकटमुळे लाभार्थी प्रस्ताव दाखल करण्यास पुढे येत नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणी सकारात्मक दृष्टीकोन घेण्याची अपेक्षा आहे.या बैठकीत दाखल झालेल्या प्रस्तावावर तहसीलदार पंकज लोखंडे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, संजय गांधी समितीचे नायब तहसीलदार पी.व्ही. अहिरराव यांनी कार्यवाही केली. दरम्यान, गेल्या सहा-सात महिन्यानंतर आपल्या रखडलेल्या प्रकरणांवर कार्यवाही होऊन प्रकरण मंजूर करण्यात आल्याने लाभार्थ्यांना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तथापि महसूल प्रशासनाने आता दाखल झालेल्या प्रस्तावांवर कार्यवाहीसाठी नियमितपणे बैठक घेण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.