शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
2
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
3
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
4
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
5
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
6
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
8
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
9
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
10
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
11
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
12
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
13
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
14
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
15
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
16
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
17
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
18
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
19
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
20
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती

सानुग्रह अनुदानाचे ७६ प्रस्ताव प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जिल्ह्यातील ७६ जोडप्यांना सानुग्रह अनुदानाची प्रकरणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जिल्ह्यातील ७६ जोडप्यांना सानुग्रह अनुदानाची प्रकरणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने मंजूर केली असली तरी अनुदानाअभावी गेल्या दोन वर्षापासून तशीच रखडली असून, पैशांसाठी हे जोडपे संबंधितांकडे थेटे घालत आहे. याप्रकरणी दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने रक्कम उपलब्ध करून देण्याची मागणी दाम्पत्यांनी केली आहे.समाजात जास्तीत जास्त अंतर जातीय विवाह व्हावे यासाठी केंद्र व राज्य शासन अशा जोडप्यांच्या संसारासाठी सानुग्रह अनुदान देत असते. प्रत्येक जोडप्यांना साधारण ५० हजार रूपये आर्थिक मदत दिली जाते. यात केंद्र शासनाच्या ५० टक्के व राज्य शासनाचीही तेवढीच म्हणजे निम्मी रक्कमेचा हिस्सा असतो. ही योजना नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविली जात असते. समाजातील ओबीसी, एस.सी, एस.टी या प्रवर्गासाठी ही योजना राबविली जात आहे. या तिन्ही प्रवर्गातील उपवर मुले-मुली आंतरजातीय विवाह करतात तेव्हा त्यांच्या संसाराला आर्थिक मदत दिली जाते.नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे सन २०१८-१९ व २०२० या दोन वर्षात जिल्ह्यातील साधारण ७६ जोडप्यांनी आपल्या कागद पत्रांची संपूर्ण पूर्तता करून दाखल केली आहेत. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण प्रशासनानेदेखील प्रकरणांची पडताळणी करून मंजूर केली आहेत. तथापि निधीअभावीही प्रकरणे तशीच प्रलंबित पडली आहेत. दोन वर्षे होऊनही अजून पावेतो रक्कम हातात न आल्यामुळे हे जोडपे संबंधीतांकडे सारखे हेलपाटे मारत आहेत. यात त्यांचा वेळ व पैसा वाया जात असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली आहे.वास्तविक समाजात अधिका-अधिक प्रमाणात असे विवाह होण्यासाठी सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून शासनाचा प्रयत्न होत असताना शासनाचीच वरिष्ठ यंत्रणा निधी उपलब्ध करून देण्याबाबत उदासीन धोरण घेत असल्याचा आरोप आहे. निधी बाबत जिल्हा परिषदेच्या संबंधीत अधिकाºयांना विचारले असता यासाठी शासनाचे वेगवेगळे अनुदान येत असते. आम्ही दोन्ही म्हणजे केंद्र व राज्याकडे अनुदानाची मागणी केली आहे.दरवर्षी आलेल्या प्रस्तावाची मागणी वेगवेगळी करीत असतो. साधारण ४० लाख रूपयांची मागणी सुद्धा केली आहे. तथापि केंद्र शासनाचे २० लाख रूपयांचे अनुदान नुकतेच प्राप्त झाले आहे. परंतु राज्य शासनाचे अनुदान येणे बाकी आहे. त्यासाठी संबंधीत यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा ही करीत आहोत. मात्र अजूनही आलेले नाही. परिणामी लाभार्थ्यांना अनुदान वाटप करता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने तरी याजोडप्यांवरील आर्थिक संकट लक्षात घेऊन तत्काळ रखडलेले अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे.केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाकडून ही समाजातील आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांसाठी अडीच लाख रूपयांचे अनुदान दिले जात असते. संचालक डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून ही योजना राबविली जाते. या अनुदानासाठी जिल्ह्यातून चार जोडप्यांची प्रकरणे समाज कल्याण विभागाकडून केंद्राकडे पाठविण्यात आली आहे. ५० टक्के रक्कम जोडप्यांच्या खात्यावर व उर्वरित ५० टक्के रक्कम पाच वर्षानंतर म्हणजे असे इतर ५०० विवाह संख्या झाल्यानंतर देण्यात येते, असे असले तरी पहिल्या टप्प्यातील ५० टक्के रक्कमही अजून पावेतो देण्यात आली नसल्याचे एका जोडप्याने सांगितले. वास्तविक विवाह झाल्याबरोबर कागद पत्रांची पडताळणी करून त्या लाभार्र्थींना रक्कम देण्याचा शासनाचा नियम आहे. परंतु वर्ष-दोन वर्ष होऊनही रक्कम हातात पडत नसल्याने यंत्रणेच्या दिरंगाईच्या धोरणाबाबत लाभार्र्थींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.