शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

25 टक्के आरक्षणात 72 जणांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 13:01 IST

शिक्षणाचा हक्क कायदा : वाढीव मुदतही संपली, दुसरा टप्पा लवकरच होणार

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना 25 टक्के आरक्षणाअंतर्गत देण्यात येणा:या प्रवेशासाठी 13 रोजी शेवटची मुदत होती. याअंतर्गत पहिल्या फेरीत जिल्ह्यातील 72 बालकांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे. आता 13 एप्रिलनंतर आणखी दोन फे:या होऊन प्रवेश निश्चिती होणार आहे. प्रवेश देण्यासाठी अनेक शाळा हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे. विद्याथ्र्याच्या प्रवेशाच्या रक्कमेचे अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे संस्थाचालक नाखुश आहेत.आर्थिक दुर्बल घटकातील बालकांनाही दज्रेदार शिक्षण मिळावे यासाठी आरटीईअंतर्गत खाजगी व अनुदानीत शिक्षण संस्थांमध्ये 25 टक्के प्रवेश हे आरक्षीत करण्यात आले आहेत.  यंदा ऑनलाईन अजर्आपल्या पाल्याला चांगलीत चांगली शाळा मिळावी यासाठी पालकांकडून अर्ज भरतांना अशा शाळांची नोंद करावी लागते. त्यासाठी आतरयत वरिष्ठ अधिका:यांकडे देखील तगादा लावला जात होता. परंतु यंदा शासनाने असे अर्ज ऑनलाईन भरण्याची सक्ती यंदा केली होती. त्यामुळे पालकांना पारदर्शकपणे आपल्या आवडीच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून घेण्यासाठी फारशी कसरत होत नसल्याचे चित्र आहे. ऑनलाईन अर्जात एका शाळेत प्रवेश क्षमतेच्या अधीक अर्ज आले असल्यास त्या ठिकाणी ड्रॉ काढून विद्यार्थी निवडले जात आहेत. पहिल्या फेरीत ही पक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात आली.अचानक मुदतवाढया प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार प्रवेशाचा पहिला टप्पा पार पडत असतांना 16 मार्च रोजी शासनाने यासाठी मुदतवाढ दिली. 13 एप्रिल ही ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची मुदत देण्यात आली होती. पहिल्या मुदतीत 300 पेक्षा अधीक पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज भरले होते.टाळाटाळ..25 टक्के आरक्षीत जागेवर ज्या विद्याथ्र्याना प्रवेश दिला जातो. त्या विद्याथ्र्याची शासकीय नियमानुसारचे शैक्षणिक शुल्क हे शासन भरत असते. परंतु शासकीय शुल्क अगदीच नगण्य असते. याउलट इतर पालकांकडून अशा संस्थांना भरमसाठ शुल्क मिळत असते. शिवाय शासनाकडून येणा:या शुल्काची रक्कम देखील वेळेवर मिळत नाही. त्यामुळे संस्थाचालक प्रवेशांबाबत नाखुश असतात.नामांकित शाळांना पसंतीपालकांकडून नामांकित शाळांनाच सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येते. त्यामुळे एका शाळेसाठी प्रवेश संख्या निश्चितीपेक्षा अधीक अर्ज येत असतात. नंदुरबारातील एका शाळेत केवळ 15 प्रवेशसंख्या असतांना त्या ठिकाणासाठी तब्बल 85 अर्ज आले होते. त्यामुळे अशा  ठिकाणी सोडतद्वारे प्रवेश निश्चिती केली जाते. पहिल्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून मुदतवाढीचा आदेश आल्यामुळे पालक संभ्रमात होते. परंतु पहिल्या टप्प्यातील झालेली प्रवेश निवड प्रक्रिया कायम राहणार आहे. त्याव्यतिरिक्त ही प्रक्रिया    राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.