शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

67 गाव-पाडय़ांसाठी खाजगी विहिरी अधिग्रहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पावसाळा लांबतो आहे तशी पाणी टंचाईच्या झळा देखील तीव्र होत आहेत. आजच्या स्थितीत जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पावसाळा लांबतो आहे तशी पाणी टंचाईच्या झळा देखील तीव्र होत आहेत. आजच्या स्थितीत जिल्ह्यातील 67 गावांमध्ये खाजगी विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. दोन पाडय़ांवर टँकरद्वारे तर दोन गावे व त्याच्या पाडय़ांवर गाढवांद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाऊस आणखी महिनाभर लांबल्यास भिषण स्थिती निर्माण होणार आहे. यंदाची पाणी टंचाई भिषण स्वरूप धारण करणारी ठरली आहे. जिल्ह्यातील अडीचशेपेक्षा अधीक गावांना व हजारापेक्षा अधीक पाडय़ांना पाणी टंचाईची झळ यंदा बसली आहे. डिसेंबर महिन्यापासूनच नंदुरबार व शहादा तालुक्यातील काही गावे पाण्यासाठी होरपळताहेत. मार्च महिन्यापासून तर टंचाईची तीव्रता अधीकच वाढली आहे. ज्या गावांना विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत त्या विहिरी देखील कोरडय़ा झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. ज्या भागात धरणे आणि बॅरेजस जवळ आहेत त्या भागात थेट तेथून पाईपलाईन करून टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. 240 गावे टंचाईग्रस्तजिल्ह्यातील 240 गावे पिण्याच्या पाण्यासाठी होरपळत आहेत. सर्वाधिक 109 गावे ही नंदुरबार तर 80 गावे ही शहादा तालुक्यातील आहेत. सर्वाधिक पाडे ही अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आहेत. जवळपास पाच लाख लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी होरपळत आहेत. आतार्पयत जवळपास एक कोटीपेक्षा अधीक रक्कम यासाठीच्या उपाययोजनांवर खर्च झाली आहे. नवापूर तालुक्यातील 19, तळोदा तालुक्यातील 25 गावांना देखील दुष्काळाचा फटका बसला आहे. अधिग्रहीत विहिरी आटल्याटंचाईग्रस्त गावाला उपाययोजना म्हणून गाव शिवारातील खाजगी विहिर किंवा विंधन विहिर अधीग्रहीत करण्यात आल्या होत्या. आतार्पयत एकुण 67 ठिकाणी अधिग्रहण करण्यात आलेले आहे. त्यात नंदुरबार तालुक्यात 58, शहादा तालुक्यात सात तर धडगाव तालुक्यात दोन ठिकाणांचा समावेश आहे. यापैकी अनेक विहिरी, विंधन विहिरी आटल्या आहेत. परिणामी अशा गावांना पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. उपाययोजनांना गतीटंचाईग्रस्त गावांना उपाययोजना करण्यासाठी केलेल्या नियोजनातील अनेक कामे अद्यापही पुर्ण झालेली नाहीत. 13 ठिकाणी विहिर खोल करणे किंवा गाळ काढण्याचे प्रस्तावीत होते ते सर्व ठिकाणी झाले आहे. टँकर किंवा बैलगाडीने पाणी पुरवठा करण्याचे 20 ठिकाणी प्रस्तावीत होते, पैकी केवळ दोन ठिकाणी टँकर सुरू आहे. नव्याने विंधन विहिरी घेण्याचे 302 ठिकाणी प्रस्तावीत होते. त्यापैकी अडीचशे ठिकाणी ते झाले आहे. परंतु विंधन विहिरींवर मशिनरी बसविण्यात न आल्याने त्यांचा उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना 19 ठिकाणी घेण्याचे प्रस्तावीत होते. त्यातही अपेक्षीत प्रगती झालेली नसल्याची स्थिती आहे. पावसाळा लांबल्यास..पावसाळा लांबल्यास टंचाई ग्रस्त गावांची स्थिती आणखी भिषण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पर्यायी उपाययोजना करणे आवश्यक ठरणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस होण्याची शक्यता आधीच वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. 

जिल्ह्यात विशेषत: नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात अनेक गावांना टँकरची मागणी केली आहे. परंतु या ना त्या कारणाने प्रशासन ते टाळत आहे. चारा छावणीप्रमाणेच टँकरचेही नियम किचकट आहेत. त्या फंद्यात प्रशासन पडत नसल्याचे एकुणच चित्र आहे. त्यामुळे केवळ धडगाव तालुक्यातील गौ:याचा बोदलापाडा येथेच दोन टँकर सुरू आहेत. तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील गाव पाडय़ांवर रस्ता नाही अशा ठिकाणी गाढवांवरून पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात कोयलीडाबर आणि चिडीमाळ या दोन गाव व पाडय़ांचा समावेश आहे. प्रती माणसी तीन लिटर पाणी या द्वारे पुरविले जात असल्याचे चित्र आहे.