शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

तांत्रिक कारणांनी रस्त्यावर बंद प­डणा-या ६२ बसेसने सोडली साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST

नंदुरबार जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे चार आगार आहेत. या आगारातून दिवसभरात दीड हजारापेक्षा अधिक फेऱ्या करुन प्रवाशांची ...

नंदुरबार जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे चार आगार आहेत. या आगारातून दिवसभरात दीड हजारापेक्षा अधिक फेऱ्या करुन प्रवाशांची वाहतूक केली जाते. गुजरात राज्यातील सीमेवर असल्याने राज्यांबाहेर वाहतुकीतही नंदुरबारचा मोठा वाटा आहे. चारही आगारातून दर दिवशी होणाऱ्या प्रवासी वाहतूकीतून साधारण ३५ लाख रूपयांची रक्कम गोळा करण्यात येते. यासाठी एसटीच्या चारही आगारांनी बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. १० वर्षे अविरत चालणा-या बसेस ह्या कालानुरुप तांत्रिक अडचणीत येण्याचे प्रमाण वाढते. यंत्रशाळेत त्यांची दुरुस्ती होत असली तरी लांब पल्ल्याचा प्रवास करु शकत नसल्याने या बसेस ग्रामीण रस्त्यांवर चालवून प्रवाशांची सोय होते. परंतू खराब रस्ते आणि खाचखळगे यामुळे या बसेस शेवटी बिघाडांना सामो-या जातातच, अशा बसेसला धुळे विभागाच्या अवधान येथील स्क्रॅप यार्डात जमा करुन त्यांची विल्हेवाट लावली जात आहे. जिल्ह्यातून दरवर्षी किमान १० ते १२ बसेसची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरटीओ नियमानुसार ही कार्यवाही होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

रस्त्यातच बंद पडणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांसह चालक-वाहकांना त्रास

रस्त्यात एसटी बंद पडण्याच्या कारणांमुळे ब-याचशा बसेस ह्या आगारातच लावण्यात आल्या होत्या. या बसेसचे तांत्रिक मूल्यामापन करुन त्यांना रस्त्यावर न धावू देता आगारात थांबवले जाते. रात्री-अपरात्री रस्त्यात बंद पडणाऱ्या बसेसमुळे प्रवासी आणि चालक-वाहक यांचे हाल होत असल्याने या बसेस थांबवण्यात आल्या.

दहा लाख किलोमीटरची मुदत पूर्ण

नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा आणि नवापूर या चार आगारातून धुळे विभागाकडे देण्यात आलेल्या सर्वच बसेस ह्या १० लाख किलोमीटर अंतर पार करुन गेल्या आहेत. १० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. आरटीओ नियमानुसार बसची स्थिती चांगली असल्यास तिला प्रवासासाठी पाठवले जावू शकते. तांत्रिक बांबींचा आढावा घेत या बसेसबाबत धुळे विभागीय कार्यालयाकडून निर्णय घेण्यात येऊन आगारांना सूचना करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

मेंटेनंन्स वाढल्यास बसची विल्हेवाट

बसेसचा मेंटनन्स अर्थात देखभाल खर्च वाढल्यास बसेसची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात येतो. नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगारांकडे सध्या एकूण ३२५ बसेस आहेत. या सर्व बसेसची स्थिती ही चांगली आहे. एका बसचा देखभाल दुरुस्तीचा खर्च हा वर्षाला १० लाखांच्या घरात जातो. यातून जुन्या आणि भंगार बसेसच्या फेऱ्या करणे परवडत नसल्याने त्यांना स्क्रॅपमध्ये देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील चारही आगारांमध्ये सर्वाधिक बसेस ह्या नंदुरबार तर त्याखालोखाल शहादा आगाराकडे आहेत. अक्कलकुवा आगाराच्या निम्म्या बसेस ह्या दुर्गम भागात चालतात.