शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
3
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
4
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
5
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
6
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
7
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
8
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
9
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
10
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
12
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
13
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
14
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
15
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
16
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
17
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
18
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
19
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
20
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

तांत्रिक कारणांनी रस्त्यावर बंद प­डणा-या ६२ बसेसने सोडली साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST

नंदुरबार जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे चार आगार आहेत. या आगारातून दिवसभरात दीड हजारापेक्षा अधिक फेऱ्या करुन प्रवाशांची ...

नंदुरबार जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे चार आगार आहेत. या आगारातून दिवसभरात दीड हजारापेक्षा अधिक फेऱ्या करुन प्रवाशांची वाहतूक केली जाते. गुजरात राज्यातील सीमेवर असल्याने राज्यांबाहेर वाहतुकीतही नंदुरबारचा मोठा वाटा आहे. चारही आगारातून दर दिवशी होणाऱ्या प्रवासी वाहतूकीतून साधारण ३५ लाख रूपयांची रक्कम गोळा करण्यात येते. यासाठी एसटीच्या चारही आगारांनी बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. १० वर्षे अविरत चालणा-या बसेस ह्या कालानुरुप तांत्रिक अडचणीत येण्याचे प्रमाण वाढते. यंत्रशाळेत त्यांची दुरुस्ती होत असली तरी लांब पल्ल्याचा प्रवास करु शकत नसल्याने या बसेस ग्रामीण रस्त्यांवर चालवून प्रवाशांची सोय होते. परंतू खराब रस्ते आणि खाचखळगे यामुळे या बसेस शेवटी बिघाडांना सामो-या जातातच, अशा बसेसला धुळे विभागाच्या अवधान येथील स्क्रॅप यार्डात जमा करुन त्यांची विल्हेवाट लावली जात आहे. जिल्ह्यातून दरवर्षी किमान १० ते १२ बसेसची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरटीओ नियमानुसार ही कार्यवाही होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

रस्त्यातच बंद पडणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांसह चालक-वाहकांना त्रास

रस्त्यात एसटी बंद पडण्याच्या कारणांमुळे ब-याचशा बसेस ह्या आगारातच लावण्यात आल्या होत्या. या बसेसचे तांत्रिक मूल्यामापन करुन त्यांना रस्त्यावर न धावू देता आगारात थांबवले जाते. रात्री-अपरात्री रस्त्यात बंद पडणाऱ्या बसेसमुळे प्रवासी आणि चालक-वाहक यांचे हाल होत असल्याने या बसेस थांबवण्यात आल्या.

दहा लाख किलोमीटरची मुदत पूर्ण

नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा आणि नवापूर या चार आगारातून धुळे विभागाकडे देण्यात आलेल्या सर्वच बसेस ह्या १० लाख किलोमीटर अंतर पार करुन गेल्या आहेत. १० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. आरटीओ नियमानुसार बसची स्थिती चांगली असल्यास तिला प्रवासासाठी पाठवले जावू शकते. तांत्रिक बांबींचा आढावा घेत या बसेसबाबत धुळे विभागीय कार्यालयाकडून निर्णय घेण्यात येऊन आगारांना सूचना करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

मेंटेनंन्स वाढल्यास बसची विल्हेवाट

बसेसचा मेंटनन्स अर्थात देखभाल खर्च वाढल्यास बसेसची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात येतो. नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगारांकडे सध्या एकूण ३२५ बसेस आहेत. या सर्व बसेसची स्थिती ही चांगली आहे. एका बसचा देखभाल दुरुस्तीचा खर्च हा वर्षाला १० लाखांच्या घरात जातो. यातून जुन्या आणि भंगार बसेसच्या फेऱ्या करणे परवडत नसल्याने त्यांना स्क्रॅपमध्ये देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील चारही आगारांमध्ये सर्वाधिक बसेस ह्या नंदुरबार तर त्याखालोखाल शहादा आगाराकडे आहेत. अक्कलकुवा आगाराच्या निम्म्या बसेस ह्या दुर्गम भागात चालतात.