शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक कारणांनी रस्त्यावर बंद प­डणा-या ६२ बसेसने सोडली साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST

नंदुरबार जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे चार आगार आहेत. या आगारातून दिवसभरात दीड हजारापेक्षा अधिक फेऱ्या करुन प्रवाशांची ...

नंदुरबार जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे चार आगार आहेत. या आगारातून दिवसभरात दीड हजारापेक्षा अधिक फेऱ्या करुन प्रवाशांची वाहतूक केली जाते. गुजरात राज्यातील सीमेवर असल्याने राज्यांबाहेर वाहतुकीतही नंदुरबारचा मोठा वाटा आहे. चारही आगारातून दर दिवशी होणाऱ्या प्रवासी वाहतूकीतून साधारण ३५ लाख रूपयांची रक्कम गोळा करण्यात येते. यासाठी एसटीच्या चारही आगारांनी बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. १० वर्षे अविरत चालणा-या बसेस ह्या कालानुरुप तांत्रिक अडचणीत येण्याचे प्रमाण वाढते. यंत्रशाळेत त्यांची दुरुस्ती होत असली तरी लांब पल्ल्याचा प्रवास करु शकत नसल्याने या बसेस ग्रामीण रस्त्यांवर चालवून प्रवाशांची सोय होते. परंतू खराब रस्ते आणि खाचखळगे यामुळे या बसेस शेवटी बिघाडांना सामो-या जातातच, अशा बसेसला धुळे विभागाच्या अवधान येथील स्क्रॅप यार्डात जमा करुन त्यांची विल्हेवाट लावली जात आहे. जिल्ह्यातून दरवर्षी किमान १० ते १२ बसेसची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरटीओ नियमानुसार ही कार्यवाही होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

रस्त्यातच बंद पडणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांसह चालक-वाहकांना त्रास

रस्त्यात एसटी बंद पडण्याच्या कारणांमुळे ब-याचशा बसेस ह्या आगारातच लावण्यात आल्या होत्या. या बसेसचे तांत्रिक मूल्यामापन करुन त्यांना रस्त्यावर न धावू देता आगारात थांबवले जाते. रात्री-अपरात्री रस्त्यात बंद पडणाऱ्या बसेसमुळे प्रवासी आणि चालक-वाहक यांचे हाल होत असल्याने या बसेस थांबवण्यात आल्या.

दहा लाख किलोमीटरची मुदत पूर्ण

नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा आणि नवापूर या चार आगारातून धुळे विभागाकडे देण्यात आलेल्या सर्वच बसेस ह्या १० लाख किलोमीटर अंतर पार करुन गेल्या आहेत. १० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. आरटीओ नियमानुसार बसची स्थिती चांगली असल्यास तिला प्रवासासाठी पाठवले जावू शकते. तांत्रिक बांबींचा आढावा घेत या बसेसबाबत धुळे विभागीय कार्यालयाकडून निर्णय घेण्यात येऊन आगारांना सूचना करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

मेंटेनंन्स वाढल्यास बसची विल्हेवाट

बसेसचा मेंटनन्स अर्थात देखभाल खर्च वाढल्यास बसेसची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात येतो. नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगारांकडे सध्या एकूण ३२५ बसेस आहेत. या सर्व बसेसची स्थिती ही चांगली आहे. एका बसचा देखभाल दुरुस्तीचा खर्च हा वर्षाला १० लाखांच्या घरात जातो. यातून जुन्या आणि भंगार बसेसच्या फेऱ्या करणे परवडत नसल्याने त्यांना स्क्रॅपमध्ये देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील चारही आगारांमध्ये सर्वाधिक बसेस ह्या नंदुरबार तर त्याखालोखाल शहादा आगाराकडे आहेत. अक्कलकुवा आगाराच्या निम्म्या बसेस ह्या दुर्गम भागात चालतात.