शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

600 कृषीपंपांना वीज जोडणी मिळणार : तळोदा तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:47 IST

तळोदा : निधीअभावी गेल्या दोन-तीन वर्षापासून प्रलंबीत असलेले तालुक्यातील 600 शेतक:यांचा कृषीपंपाच्या जोडणीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे कृषीपंपाच्या ...

तळोदा : निधीअभावी गेल्या दोन-तीन वर्षापासून प्रलंबीत असलेले तालुक्यातील 600 शेतक:यांचा कृषीपंपाच्या जोडणीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे कृषीपंपाच्या विजेचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील संपूर्ण वीज जोडण्यांसाठी साधारण 53 कोटी रूपयांचा निधी संबंधित वीज वितरण कंपनीला देण्यात आल्याची माहिती आहे.कृषी पंपाच्या प्रलंबीत वीज जोडणीबरोबरच तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्पबाधितांच्या पंपाच्या वीज जोडण्यांबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांची बैठक घेवून बाधितांच्या कृषीपंपांना वीज जोडणीचे काम नोव्हेंबरअखेर्पयत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या   आहेत.तळोदा तालुक्यातील साधारण 600 कृषीपंपधारक शेतक:यांनी आपल्या कृषीपंपाच्या वीज जोडण्यांसाठी येथील वीज वितरण कंपनीकडे सन 2016 मध्ये प्रकरण दाखल केले होते. यात तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन, रेवानगर, नर्मदानगर, गोपाळपूर पुनर्वसन, त:हावद, सरदारनगर या वसाहतींमधील प्रकल्पग्रस्त शेतक:यांचा समावेश होता.           यासाठी कंपनीच्या कार्यालयाकडेही वीज जोडणीची डिमांड भरली होती. तथापि वीज जोडणीच्या साहित्यासाठी लागणारा निधी नसल्याने शेतक:यांची ही प्रकरणे गेल्या दोन-तीन वर्षापासून अक्षरश: धुळखात पडली होती. इकडे जोडणी अभावी कृषी पंपाचा पाणीपुरवठादेखील बंदच होता. नाईलाजास्तव शेतक:यांना पाण्याची व्यवस्था असतांना कोरडवाहू            शेती करावी लागत होती.         डिमांडसाठी शेतकरी वीज                वितरण कंपनीच्या संबंधित कार्यालयाकडे सातत्याने हेलपाटे मारत असत. येथील कार्यालयातील संबंधित अधिकारी शहादा उपविभागाकडे बोट दाखवत होते.               त्या वेळी शेतकरी शहादा            येथेही हेलपाटे मारीत असत.                मात्र तरीही दाद मिळत नव्हती. एवढेच नव्हे तर विस्थापित शेतक:यांनी दर गुरूवारी वसाहतींमध्ये होणा:या पुनर्वसन ‘डे’च्या दिवशी सुद्धा रखडलेल्या वीज जोडणीच्या प्रश्न लावून धरला होता.वीज वितरण कंपनीच्या प्रशासनानेदेखील कृषी पंपाच्या जोडण्यासाठी शासनाकडे निधीचा प्रस्ताव पाठविला होता. बिरसामुंडा व उच्चदाब नियंत्रण योजनातून  साधारण 60 कोटीच्या निधीची मागणी करण्यात आली होती. वीज वितरण कंपनी बरोबरच प्रशासनानेदेखील शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यानंतर शासनाने जिल्ह्यातील गेल्या दोन-तीन वर्षापासून प्रलंबीत असलेल्या शेतक:यांच्या कृषी पंपाच्या वीज जोडणीस 53 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. संपूर्ण जिल्ह्यातून साधारण तीन हजार शेतक:यांच्या कृषी पंपाना यातून वीज जोडणी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.या निधीतून प्रत्येक शेतक:यांना स्वतंत्र 10 के.व्ही क्षमतेच्या ट्रान्सफार्मर देण्यात येणार आहे. साहजिकच या शेतक:यांच्या कृषी पंपांना पूर्ण क्षमतेचा वीजपुरवठा मिळणार असून, वीज दाबामुळे सातत्याने होणा:या तांत्रिक बिघाडातून शेतक:यांची मुक्तता होणार आहे. मात्र आता वीज वितरण कंपनीला निधी मिळाल्यामुळे युद्ध पातळीवर कामाला सुरूवात करण्याची अपेक्षा शेतक:यांनी व्यक्त केली आहे. निदान शेतक:यांच्या रब्बी हंगामात तरी पिकांना पाण्याची व्यवस्था करता येईल. गेल्या दोन वर्षापासून शेतक:यांचे कृषीपंपही निकामी ठरले असल्याची शेतक:यांची व्यथा आहे.दरम्यान प्रकल्प ग्रस्तांच्या प्रलंबीत वीज जोडणीबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी  वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांची बैठक रंगावली सभागृहात घेतली होती. त्या वेळी बाधितांच्याही वीज जोडण्याबाबत अधिका:यांशी चर्चा केली. जोडण्यासाठी आता निधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या जोडणीच्या कामांना प्राधान्य             देवून नोव्हेंबर अखेर्पयत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी दिली. या कामांचा ठेकेदारास ठेका देण्यात आला असून, त्यांच्या मार्फत सव्रे    सुरू असल्याचे अधिका:यांनी सांगितले. या बैठकीस सरदार सरोवर प्रकल्पाचे सहायक जिल्हाधिकारी जयसिंग वळवी, अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरूडे, पुनर्वसन अधिकारी एस.डी. मोते, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता कु:हाडे, उपविभागीय अभियंता नितीन अंबीटकर, सचिन काळे, जगदीश पावरा, तहसीलदार राजेंद्र दराडे आदी उपस्थित होते.