शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

जिल्ह्यातील ५९२ गावे तूर्त कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:30 IST

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना समाधानाची बाब म्हणजे आजच्या दिवशी तब्बल ५९२ गावांमध्ये एकही सक्रिय ...

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना समाधानाची बाब म्हणजे आजच्या दिवशी तब्बल ५९२ गावांमध्ये एकही सक्रिय रुग्ण नाही तर ३५५ गावांमध्ये सुमारे तीन हजार ९७२ रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शहरी भागात सहाही शहरांमध्ये चार हजार ५६६ पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्यावर्षी सुरुवातीच्या काळात कोरोना नियंत्रणात होता. १७ एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर मात्र विविध ठिकाणी रुग्ण सापडत होते. परंतु सुरुवातीच्या लाॅकडाऊनच्या काळात विविध गावांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले. नव्हे तर अनेक गावांनी आपल्या सीमांवर सुरक्षा रक्षक बसवून बाहेरील लोकांना गावबंदी केली. काहींनी तर रस्त्यावर दगड ठेवून, काटे ठेवून, खोदकाम करून रस्तेच बंद केले होते. रात्रीची गस्त ग्रामस्थांनी सुरू केली होती. त्यामुळे रुग्ण आटोक्यात होते. मात्र ऑगस्ट-सप्टेंबरनंतर प्रमाण वाढले. नोव्हेंबरपासून प्रमाण पुन्हा कमी झाले होते. परंतु मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेली दुसरी लाट मात्र पहिल्या लाटेपेक्षा गंभीर असून त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण झाले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाने सुरुवातीला शनिवार-रविवार दोन दिवसाचा जनता कर्फ्यू, त्यानंतर पूर्ण संचारबंदी राज्यात प्रथमच लागू केली होती. मात्र रुग्णसंख्या रोज ८०० ते हजारापर्यंत आढळून येत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे.

आजच्या स्थितीत जिल्ह्यातील गावांचा आढावा घेतला असता तब्बल ५९२ गावांमध्ये एकही सक्रिय रुग्ण नाही. यातील अनेक गावात रुग्ण आढळले होते पण ते बरे झाले आहेत. या ५९२ गावांमध्ये सर्वाधिक गावे धडगाव तालुक्यातील आहेत. या तालुक्यातील १२९ गावांमध्ये एकही रुग्ण नाही. तर त्यापाठोपाठ अक्कलकुवा तालुक्यातील १६८ गावांमध्ये एकही रुग्ण नाही. नंदुरबार तालुक्यातीलही ११६ गावांमध्ये एकही रुग्ण नाही. तर शहाद्यातील ६६, नवापुरातील ५९ आणि तळोद्यातील ५४ गावांमध्ये एकही रुग्ण नाही.

३५५ गावांमध्ये सध्या सक्रिय रुग्ण

जिल्ह्यात सध्या ३५५ गावांमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या गावांमध्ये कमीत कमी एक किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे शहादा तालुक्यात ११४ गावांमध्ये रुग्ण आहेत तर नवापूर तालुक्यातील १०५, तळोदा ४०, नंदुरबार ३९, धडगाव ३१ आणि अक्कलकुवा तालुक्यातील २६ गावांमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आहेत. या सर्व गावांमध्ये सुमारे ३५९ कन्टेन्मेन्ट झोन असून तीन हजार ९७२ रुग्ण उपचार घेत आहेत.

शहरी भागात चार हजार ५६६ रुग्ण

जिल्ह्यात तालुका मुख्यालयाची एकूण सहा शहरे असून सर्व ठिकाणी सध्या सक्रिय रुग्ण कार्यान्वित आहेत. या सहाही शहरांमध्ये १९२ कन्टेन्मेन्ट झोन असून तेथे चार हजार ५६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात नंदुरबारला ३ हजार ४८४, नवापुरात ४४३, शहाद्यात २९१, तळोद्यात १९७, अक्कलकुव्यात ८० तर धडगाव येथे ७१ रुग्ण आहेत. हे सर्व शहरी भागातील रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.