लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील कलसाडी व असलोद महसूल मंडळात शुक्रवारी झालेल्या वादळी वारा व पावसामुळे सुमारे ५३२ घरांची पडझड व पत्रे उडालेले आहेत. यात सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या केळी, पपई, ऊस या पिकांचे अंदाजे ६५ ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळामुळे घरांचे व शेतपिकांचे सुमारे एक कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.गेल्या अडीच-तीन महिन्यापासून कोरोना विषाणू या महामारीमुळे सर्वत्र लॉकडाईन करण्यात आल्याने अनेक व्यवहार ठप्प झाले होते. आर्थिक क्षेत्र मंदावलेले होते. शेतकऱ्यांची विक्रीसाठी तयार झालेली पपई व केळी शेतातच नाशवंत होऊन करोडो रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर गेल्या शुक्रवारी शहादा व तळोदा तालुक्यातील काही भागात आलेल्या वादळाने शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे. शहादा तालुक्यातील कलसाडी महसूल मंडळातील सोनवलतर्फे बोरद, नांदर्डे, काथर्दे दिगर, कलसाडी, भादे, वैजाली, करणखेडा या सात गावांना या वादळी वाºयाचा जोरदार तडाखा बसला. मिळालेल्या माहितीनुसार, सोनवल गावात १५५ घरांचे छप्पर उडालेली आहेत. यामुळे चार लाख १७ हजार २०० रुपयांचे नुकसान तर ७७ घरांच्या पूर्ण नुकसानीमुळे १३ लाख ७४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नांदर्डे गावात १८ घरांची अंशत: पडझड झाल्याने २९ हजार ४०० रुपयांचे तर दोन घरांचे पूर्णत: नुकसान होऊन १७ हजार ८०० रुपयांचे नुकसान झालेले आहे. काथर्दे गावात १०३ घरांचे अंशत: नुकसान होऊन दोन लाख ९९ हजार ६०० तर पूर्णत: नुकसान झालेल्या घरांचे एक लाख ३९ हजार ९० रुपयांचे नुकसान झाले आहे. कलसाडी येथे ३३ घरांचे अंशत: नुकसान होऊन एक लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. भादे गावात १८ घरांच्या नुकसानीमुळे ६८ हजार ८०० रुपयांचे तर वैजाली येथे १३ घरांचे अंशत: नुकसान होऊन ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. परिवर्धे येथे २७ घरांचे अंशत: नुकसान होऊन ६५ हजार रुपयांचे तर करणखेडा गावात पाच पाच घरांच्या अंशत: नुकसानीमुळे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सोनवल या गावात आरिफ मुस्तफा बोहरी यांच्या घराजवळ असलेल्या चक्कीवर विद्युत रोहित्रचा फॉल पडल्यामुळे त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.शहादा तालुक्यातील कलसाडी व असलोद या महसूल मंडळातील गावांमध्ये अंशत: व पूर्णत: ५३२ घरांची पडझड होऊन ३० ते ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून शेतकºयांच्या ऊस, केळी व पपई या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून ६५ ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी महसूल, कृषी व वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांच्या सतत संपर्कात राहून ग्रामस्थांच्या अडचणी दूर करण्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पंचनामे युद्धपातळीवर सुरु असून त्यांचा अहवाल जिल्हाधिकाºयांमार्फत राज्य शासनाला पाठवून शेतकºयांना व नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वादळामुळे कलसाडी महसूल मंडळ अंतर्गत येणाºया अनेक गावांमध्ये वीज वितरण कंपनीचे विद्युत रोहित्रांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवस वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे घरगुती वीज व पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. या परिस्थितीत पाडळदा गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य धनराज पाटील यांनी अनेक गावात जाऊन जनरेटरच्या माध्यमातून ग्रामस्थांना व गुरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. पाटील यांनी महसूल व वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांशी वारंवार संपर्क करीत ग्रामस्थांना लागणाºया जीवनावश्यक व इतर अडचणींच्या समस्यांचे निराकरण केले. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाºयांनी युद्धपातळीवर काम करीत दीड दिवसात वीजपुरवठा सुरळीत केला.
आठ गावात ५३२ घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:49 IST