शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

आठ गावात ५३२ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील कलसाडी व असलोद महसूल मंडळात शुक्रवारी झालेल्या वादळी वारा व पावसामुळे सुमारे ५३२ ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील कलसाडी व असलोद महसूल मंडळात शुक्रवारी झालेल्या वादळी वारा व पावसामुळे सुमारे ५३२ घरांची पडझड व पत्रे उडालेले आहेत. यात सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या केळी, पपई, ऊस या पिकांचे अंदाजे ६५ ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळामुळे घरांचे व शेतपिकांचे सुमारे एक कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.गेल्या अडीच-तीन महिन्यापासून कोरोना विषाणू या महामारीमुळे सर्वत्र लॉकडाईन करण्यात आल्याने अनेक व्यवहार ठप्प झाले होते. आर्थिक क्षेत्र मंदावलेले होते. शेतकऱ्यांची विक्रीसाठी तयार झालेली पपई व केळी शेतातच नाशवंत होऊन करोडो रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर गेल्या शुक्रवारी शहादा व तळोदा तालुक्यातील काही भागात आलेल्या वादळाने शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे. शहादा तालुक्यातील कलसाडी महसूल मंडळातील सोनवलतर्फे बोरद, नांदर्डे, काथर्दे दिगर, कलसाडी, भादे, वैजाली, करणखेडा या सात गावांना या वादळी वाºयाचा जोरदार तडाखा बसला. मिळालेल्या माहितीनुसार, सोनवल गावात १५५ घरांचे छप्पर उडालेली आहेत. यामुळे चार लाख १७ हजार २०० रुपयांचे नुकसान तर ७७ घरांच्या पूर्ण नुकसानीमुळे १३ लाख ७४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नांदर्डे गावात १८ घरांची अंशत: पडझड झाल्याने २९ हजार ४०० रुपयांचे तर दोन घरांचे पूर्णत: नुकसान होऊन १७ हजार ८०० रुपयांचे नुकसान झालेले आहे. काथर्दे गावात १०३ घरांचे अंशत: नुकसान होऊन दोन लाख ९९ हजार ६०० तर पूर्णत: नुकसान झालेल्या घरांचे एक लाख ३९ हजार ९० रुपयांचे नुकसान झाले आहे. कलसाडी येथे ३३ घरांचे अंशत: नुकसान होऊन एक लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. भादे गावात १८ घरांच्या नुकसानीमुळे ६८ हजार ८०० रुपयांचे तर वैजाली येथे १३ घरांचे अंशत: नुकसान होऊन ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. परिवर्धे येथे २७ घरांचे अंशत: नुकसान होऊन ६५ हजार रुपयांचे तर करणखेडा गावात पाच पाच घरांच्या अंशत: नुकसानीमुळे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सोनवल या गावात आरिफ मुस्तफा बोहरी यांच्या घराजवळ असलेल्या चक्कीवर विद्युत रोहित्रचा फॉल पडल्यामुळे त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.शहादा तालुक्यातील कलसाडी व असलोद या महसूल मंडळातील गावांमध्ये अंशत: व पूर्णत: ५३२ घरांची पडझड होऊन ३० ते ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून शेतकºयांच्या ऊस, केळी व पपई या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून ६५ ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी महसूल, कृषी व वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांच्या सतत संपर्कात राहून ग्रामस्थांच्या अडचणी दूर करण्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पंचनामे युद्धपातळीवर सुरु असून त्यांचा अहवाल जिल्हाधिकाºयांमार्फत राज्य शासनाला पाठवून शेतकºयांना व नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वादळामुळे कलसाडी महसूल मंडळ अंतर्गत येणाºया अनेक गावांमध्ये वीज वितरण कंपनीचे विद्युत रोहित्रांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवस वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे घरगुती वीज व पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. या परिस्थितीत पाडळदा गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य धनराज पाटील यांनी अनेक गावात जाऊन जनरेटरच्या माध्यमातून ग्रामस्थांना व गुरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. पाटील यांनी महसूल व वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांशी वारंवार संपर्क करीत ग्रामस्थांना लागणाºया जीवनावश्यक व इतर अडचणींच्या समस्यांचे निराकरण केले. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाºयांनी युद्धपातळीवर काम करीत दीड दिवसात वीजपुरवठा सुरळीत केला.