शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

तळोद्यातील कन्यादान योजनेचे 522 प्रस्ताव रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत राबविण्यात येणा:या कन्यादान योजनेसाठी 522 प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. मात्र या प्रस्तावांवर गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून कार्यवाही रखडल्याने भिल्लीस्थान टायगर सेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर संबंधित लाभार्थीना या योजनेचा लाभ देण्यासाठी तातडीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.लगAाच्या वाढत्या खर्चाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत राबविण्यात येणा:या कन्यादान योजनेसाठी 522 प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. मात्र या प्रस्तावांवर गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून कार्यवाही रखडल्याने भिल्लीस्थान टायगर सेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर संबंधित लाभार्थीना या योजनेचा लाभ देण्यासाठी तातडीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.लगAाच्या वाढत्या खर्चाच्या पाश्र्वभूमीवर समाजातील गरीब घटकांनी सामूहिक विवाहासाठी पुढे यावे यासाठी राज्य शासनाने आदिवासी विकास विभागामार्फत 2004 पासून कन्यादान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत संबंधित लाभार्थीना 10 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. ही योजना एकात्मिक आदिवासी प्रकल्पाकडून राबविली जाते. या योजनेसाठी संबंधित जोडपे आदिवासी अथवा त्यापैकी कुणीही एक आदिवासी असावा. याशिवाय जन्माचा अथवा शाळा सोडल्याचा दाखला, राज्याचा रहिवासी, तिसरे अपत्य नसल्याचा दाखला, जातीचा दाखला, बालविवाह प्रतिबंधक, हुंडा प्रतिबंधक कायद्याचा 20 रुपयांचा स्टॅम्प अशी कागदपत्रांची पूर्तता आवश्यक असते. तळोदा एकात्मिक आदिवासी प्रकल्पामार्फत 2016 मध्ये साधारण 225 लाभार्थीना या योजनेचा लाभ देण्यात आला होता. त्यानंततर प्रकल्प अधिका:यांच्या बदल्या व दुस:या अधिका:यांकडील अतिरिक्त कार्यभारामुळे ही योजना वर्षभर रखडली होती. तथापि, या योजनेसाठी प्रकल्पाकडे पुन्हा 522 प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून ही प्रकरणे प्रकल्पाकडे पडून असल्याचे समजते. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी भिल्लीस्थान टायगर सेनेच्या पदाधिका:यांनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशा:यानंतर प्रकल्पाने तातडीने कार्यवाही करून आठ-दहा दिवसात कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे लेखी आश्वासन दिले. या प्रकरणांमध्ये कागदपत्रांची त्रुटी असल्याचे संबंधित अधिका:यांचे म्हणणे आहे. दरम्यान, याप्रकरणी भिल्लीस्थान टायगर सेनेचे अध्यक्ष राजन पाडवी, सादीक अन्सारी, विनोद पाडवी, मुकेश कोळी आदी पदाधिका:यांनी सहायक प्रकल्प अधिकारी ए.टी. मेटकर यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या या योजनेचा लाभ समाजातील गरजू जोडप्यांना मिळणार आहे.