शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

तळोदा तालुक्यातील ३५ अंगणवाड्या नळ कनेक्शन विना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST

तळोदा : तालुक्यातील ३५ लहान बालकांच्या अंगणवाड्या विना नळ कनेक्शन अभावी असल्याची माहिती आढावा बैठकीतून समोर आली आहे. सध्या ...

तळोदा : तालुक्यातील ३५ लहान बालकांच्या अंगणवाड्या विना नळ कनेक्शन अभावी असल्याची माहिती आढावा बैठकीतून समोर आली आहे. सध्या कोरोना महामारीमुळे अंगणवाड्या बंद असल्या तरी यापूर्वी तेथील बालकांसाठी मदतनीस लांबच्या हातपंपावरून पाणी आणत असे. यातील २० अंगणवाड्या अतिदुर्गम भागातील आहेत. शासनाच्या जल जीवन मिशन अभियानात तरी त्यांच्या नळ कनेक्शनचा प्रश्न मार्गी लावावा, अशी पालकांची मागणी आहे.

तीन ते सहा वयोगटातील बालकांना सकस आहार पुरविण्यासाठी तळोदा तालुक्यात साधारण २३८ अंगणवाड्या शासनाच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पामार्फत चालवल्या जात आहेत. त्यातील ३५ अंगणवाड्यांना आजही पिण्याच्या पाण्याो नळ कनेक्शन नाहीत. त्यामुळे या बालकांसाठी संबंधित अंगणवाड्यांमधील मदतनीस जवळच्या हात पंपावर जाऊन पाणी आणत असतात. न्यूबन मधील दोन, नर्मदा नगरमधील सहा, रतनपडा येथील दोन, अंमलपडा येथील दोन, सोजरबार, अलवान, ओडीबारी, वेरीमाळ, सेंदवाई पाडा, मोकासमाल, चिनिपडा, गायमुखी, केलीपणी, थेवापणी, अक्राणी, खाकरबरी, बेडवाई, टाकळी, घोडमार, रावलापाणी, हातबारी, सिलींगपूर, कुयरी दाबर, पाल्हाबारी या अंगणवाड्याचा समावेश आहे. यातील २० अंगणवाड्या या सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात आहेत. त्यामुळे तेथे पिण्याच्या पाण्याचा नेहमीच प्रश्न असतो. कारण तेथील रहिवाशी लांबावर असलेल्या झऱ्यातील पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात. साहजिकच तेथे उपाय योजना करण्यासाठी प्रशासनापुढे आव्हान असते. असे असले तरी केंद्र शासनाने जल जीवन मिशन गेल्या वर्षापासून सुरू केले आहे. या मिशन अंतर्गत हर घर नळ कनेक्शन देण्याचे शासनाचे नियोजन आहे. सदर अभियाना अंतर्गत संबंधित अंगणवाड्यांना नळ कनेक्शन योजना राबविण्याची पालकांची मागणी आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सद्या कोरोना महामारीमुळे अंगणवाड्या शासनाने बंद केल्या असल्या तरी पुढील शैक्षणिक वर्षापासून त्या नियमित उघडतील. त्यामुळे या कालावधीत तरी ग्रामपंचायतीने त्यांना कनेक्शन उपलब्ध करून देण्याची पालकांची अपेक्षा आहे.

बहुतेक ठिकाणी बालके जवळच्या हात पंपावर अंगणवाडीतून आहार खाल्यानंतर नजीकच्या हात पंपावर पाणी पीत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे जिल्हा परिषदेने निरागस बालकांना पाणी उपलब्ध होण्यासाठी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आहे.

नर्मदा नगर सारख्या मोठ्या ग्राम पंचायतीत कनेक्षणाच्या अभाव

तळोदा तालुक्यातील बोरद, अमोणी व नर्मदा नगर या तीन ग्रामपंचायती सर्वात मोठ्या आहेत. नर्मदा नगर येथे तब्बल सहा अंगणवाड्या आहेत. या सहाही अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी बालकांना साधे नळ कनेक्शन नाही. त्यामुळे साहजिकच पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक ही वसाहत सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांची आहे. शिवाय सर्वात जुनी वसाहत आहे.

तळोदा तालुक्यातील ३५ अंगणवाड्यांमध्ये पाण्याचे नळ कनेक्शन नाही. जल जीवन मिशन योजनेतून तातडीने जोडणी करून देण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना पत्रदेखील दिले आहे. त्यामुळे लवकरच जोडणी करून देणार आहेत. - भाऊसाहेब बोरकर, बाल विकास अधिकारी, एकात्मिक बालविकास कार्यालय, तळोदा.