शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

डिझेल नसल्याने २० हजार ग्राहकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : खंडित वीजपुरवठ्याच्या कालावधीत मोबाईल व लॅण्डलाईन फोनची सेवा सुरळीत राहावी यासाठी येथील दूरसंचार कार्यालयास ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : खंडित वीजपुरवठ्याच्या कालावधीत मोबाईल व लॅण्डलाईन फोनची सेवा सुरळीत राहावी यासाठी येथील दूरसंचार कार्यालयास जनरेटर उपलब्ध करून दिले आहे. तथापि ते डिझेल अभावी अक्षरश: धुळखात पडले आहे. साहजिकच त्याचा परिणाम मोबाईल व इतर सेवांवर पडत असून, २० हजार ग्राहकांचे मोबाईल निरूपयोगी ठरत असल्याचे म्हटले जात आहे.वाढत्या स्पर्धेत भारत दूरसंचार विभागाच्या उदासिन धोरणाबाबत ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डिझेलच्या इंधनाबाबत ठोस उपाययोजना हाती घ्याव्या, अशी मागणी ग्राहकांमधून जोर धरू लागली आहे.भारतीय दूरसंचार निगमाकडून तळोद्यासह अक्कलकुवा, खापर, मोलगी परिसरात आपली मोबाईल व दूरध्वनी सेवा उभारण्यात आली आहे. ही सेवा ग्राहकांना देण्यासाठी याठिकाणी साधारण १५ टॉवर उभारण्यात आली आहेत. जवळपास २० हजार ग्राहकांनी भारत दूरसंचारची लॅण्डलाईन व भ्रमणध्वनीची सेवा घेतली आहे. यात या परिसरातील सहकारी व राष्टÑीयकृत बँकांनी देखील सेवा घेतली आहे.ग्राहकांबरोबरच सर्व संबंधित यंत्रणांना वीज भारनियमन अथवा खंडित वीजपुरवठा दरम्यान सुरळीत सेवा पुरविण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून तळोदा यथील भारत दूरसंचार निगमच्या कार्यालयाला जनरेटर उपलब्ध करून दिले आहे. परंतु त्यासाठी लागणाºया डिझेल इंधनाअभावी हे जनरेटर गेल्या अनेक महिन्यांपासून धुळखात पडले आहे. परिणामी त्याचा मोठा परिणाम नेट कनेक्टीव्हीटीवर होत असून, सततच्या आऊट आॅफ कव्हरेजच्या उत्तरामुळे ग्राहक अक्षरश: वैतागले आहे.वास्तविक भारनियमना दरम्यान मोबाईल टॉवरची बॅटरी चार्जिंगसाठी जनरेटरला इंधन उपलब्ध होणे करीता येथील कार्यालयाकडून निधीची मागणी केली जात असते. आताही कार्यालयाने वरिष्ठांकडे डिझेलची मागणी केली आहे. मात्र आजतागायत इंधन अथवा त्यासाठीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचे कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. आधीच इतर तांत्रिक अडचणींमुळे नेटवर्कचा सामना ग्राहकांना करावा लागत असतो. जेम तेम ते तांत्रिक अडचणी दूर होतात. त्यात पुन्हा भारनियमन व खंडित वीजपुरवठ्याचा व्यत्यय साहजिकच दूरसंचारच्या सेवेस ग्राहक कंटाळले असून, त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याबाबत या यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या उदासिन भूमिकेबाबत ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.विशेषत: अनेक बँकांनी भारत दूरसंचार निगमच्या सेवेला जोडली आहेत आणि ज्या दिवशी वीजवितरण कंपनीतर्फे भारतनियमन केले जाते त्या दिवशी दिवसभर पुरवठाही खंडित केला जातो. तेव्हा भारत दूरसंचारची सेवादेखील बंद होते. त्यादिवशी बँकेचे व्यवहारदेखील बंद होत असतात. ज्या ग्राहकांनी आपला मोबाईल नंबर आधार कार्ड, बँकखाते लिंक केला आहे. त्यामुळे त्यांची कामेच ठप्प होत असल्याचे ग्राहक सांगतात. विशेष म्हणजे ग्राहकांनी आपले व्हाऊचर रिचार्ज केल्यानंतर या सेवेचा पुरेपूर फायदा त्यांना मिळत नाही. नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याची व्यथा ग्राहकांनी बोलून दाखविली आहे.तळोद्यासह अक्कलकुवा, खापर, मोलगीपर्यंतच्या परिसरातील मोबाईल व दूरध्वनीचे ग्राहक भारत दूरसंचारच्या सेवेने जोडली आहेत. या परिसरात साधारण २० हजारापेक्षा अधिक ग्राहक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु त्यांना सुविधा देण्यासाठी फक्त २० टॉवर उभारण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या ग्राहकांची संख्या पाहता टॉवर्सची संख्या कमी पडते. पुरेशा संख्येअभावी त्यांना नेटवर्कची रेंजदेखील पुरेशा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे सातत्याने व्यत्यय येत असतो. वास्तविक आपल्या नेटवर्कला ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी खाजगी कंपन्या प्रयत्न करीत असतात. मात्र भारत दूसरंचार निगमकडे ग्राहकांची संख्या असून, ही त्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. संबंधीत अधिकाºयांनी याप्रकरणी सुधारणा करून सुरळीत सेवा उपलब्ध करावी, अन्यथा भारत दूरसंचार निगमची सेवाच बंद करण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे.