शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
3
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
4
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
5
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
6
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
7
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
8
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
9
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
10
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
11
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
12
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
13
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
14
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
15
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
16
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
17
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
19
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
20
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!

३० वर्षांचा अनुभव व कार्य हाच प्रचाराचा मुद्दा : आमदार के.सी.पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:26 IST

एकसंघतेने काँग्रेस पक्ष निवडणुकीला सामोरा जातोय

नंदुरबार : आमदार या नात्याने ३० वर्षे शहादा, अक्कलकुवा आणि धडगाव या विधानसभा मतदारसंघात केलेली विकास कामे जनतेसमोर आहेत. त्यामुळे या कामाच्या बळावर आणि काँग्रेससारख्या धर्मनिरपेक्ष आणि दलित, आदिवासी समाजासाठी तळमळीने काम करणाऱ्या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्याच्या सहकार्याने नंदुरबार लोकसभा मतदारसंघातूून निवडणूक लढवत असल्याची माहिती काँग्रेसचे उमेदवार आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.‘लोकमत’च्या ‘चाय पे चर्चा’ उपक्रमात सहभागी झालेल्या आमदार अ‍ॅड.पाडवी यांनी काँग्रेसची उमेदवारी, प्रचाराचे मुद्दे, लोकसभा मतदारसंघासाठीचे व्हीजन, संघटनात्मक प्रयत्न याविषयी बातचित केली.प्रश्न : आमदार असताना लोकसभा निवडणुकीकडे वळण्याचे कारण ?आ.के.सी.पाडवी : नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. इंदिराजी गांधी या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात या मतदारसंघापासून करीत असत. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत यांनी अनेक वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले. परंतु, गेल्यावेळी हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून गेला. तो पुन्हा मिळविण्यासाठी सर्व नेत्यांनी माझे नाव एकमताने सुचविले. पक्षाचा निष्ठावंत सैनिक या नात्याने मी तो आदेश शिरसावंद्य मानला आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो.प्रश्न : आपले प्रचाराचे मुद्दे काय राहणार आहेत?आ.के.सी.पाडवी : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाने केलेली कामे आणि गेल्या पाच वर्षात भाजपाच्या काळात झालेली कामे यांची तुलनात्मक स्थिती आम्ही मतदारांपुढे मांडणार आहोत. ज्येष्ठ नेते स्व.पी.के.अण्णा पाटील यांच्या सान्निध्यात राहण्याचा योग आला. त्यामुळे सिंचनाच्या कामाची दृष्टी मला मिळाली. विधानसभा मतदारसंघात सिंचनाची मोठी कामे मी करु शकलो. तेही मांडणार आहोत.प्रश्न : भाजपाच्या पाच वर्षातील कार्यकाळाचे मूल्यमापन लोकप्रतिनिधी आणि प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून तुम्ही कसे कराल?आ.के.सी.पाडवी : भाजपाच्या पाच वर्षातील कार्यकाळात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात कोणतेही भरीव काम झालेले नाही. ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली, कार्यादेश दिलेली विकास कामेच या पाच वर्षांत पूर्ण झाली आहेत. विद्यमान खासदार जुन्या कामांचे श्रेय स्वत: घेत आहेत. मात्र जनतेला सत्य माहिती आहे. त्यामुळे आम्ही आमच्या विकास कामांची माहितीच मतदारांपुढे नेणार आहोत. प्रमुख मुद्दा म्हणजे, वनविभागाच्या परवानगीसाठी अडून राहिलेली सिंचन, रस्ते आणि वीज प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न, त्याचा दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना झालेला लाभ, मुंबई ते दिल्लीपर्यंत केलेला पाठपुरावा हे सगळे जनतेपुढे असल्याने विरोधकांनी कितीही भूलथापा मारल्या तरी जनता काँग्रेसवर विश्वास ठेवेल, याची खात्री आहे. प्रश्न: नंदुरबार आणि कॉंग्रेसचे ऋणानुबंध या मुद्यावर भर राहील ?आमदार के.सी.पाडवी : निश्चितच. आदिवासी जनतेने माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्यावर अलोट प्रेम केले. गांधी परिवार आणि कॉंग्रेस पक्षाने आदिवासी जनता आणि येथील मतदारांना भरपूर काही दिले. या ऋणानुबंधाला पुन्हा उजाळा दिला जाईल.

टॅग्स :nandurbar-pcनंदुरबार