शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

३० वर्षांचा अनुभव व कार्य हाच प्रचाराचा मुद्दा : आमदार के.सी.पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:26 IST

एकसंघतेने काँग्रेस पक्ष निवडणुकीला सामोरा जातोय

नंदुरबार : आमदार या नात्याने ३० वर्षे शहादा, अक्कलकुवा आणि धडगाव या विधानसभा मतदारसंघात केलेली विकास कामे जनतेसमोर आहेत. त्यामुळे या कामाच्या बळावर आणि काँग्रेससारख्या धर्मनिरपेक्ष आणि दलित, आदिवासी समाजासाठी तळमळीने काम करणाऱ्या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्याच्या सहकार्याने नंदुरबार लोकसभा मतदारसंघातूून निवडणूक लढवत असल्याची माहिती काँग्रेसचे उमेदवार आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.‘लोकमत’च्या ‘चाय पे चर्चा’ उपक्रमात सहभागी झालेल्या आमदार अ‍ॅड.पाडवी यांनी काँग्रेसची उमेदवारी, प्रचाराचे मुद्दे, लोकसभा मतदारसंघासाठीचे व्हीजन, संघटनात्मक प्रयत्न याविषयी बातचित केली.प्रश्न : आमदार असताना लोकसभा निवडणुकीकडे वळण्याचे कारण ?आ.के.सी.पाडवी : नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. इंदिराजी गांधी या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात या मतदारसंघापासून करीत असत. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत यांनी अनेक वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले. परंतु, गेल्यावेळी हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून गेला. तो पुन्हा मिळविण्यासाठी सर्व नेत्यांनी माझे नाव एकमताने सुचविले. पक्षाचा निष्ठावंत सैनिक या नात्याने मी तो आदेश शिरसावंद्य मानला आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो.प्रश्न : आपले प्रचाराचे मुद्दे काय राहणार आहेत?आ.के.सी.पाडवी : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाने केलेली कामे आणि गेल्या पाच वर्षात भाजपाच्या काळात झालेली कामे यांची तुलनात्मक स्थिती आम्ही मतदारांपुढे मांडणार आहोत. ज्येष्ठ नेते स्व.पी.के.अण्णा पाटील यांच्या सान्निध्यात राहण्याचा योग आला. त्यामुळे सिंचनाच्या कामाची दृष्टी मला मिळाली. विधानसभा मतदारसंघात सिंचनाची मोठी कामे मी करु शकलो. तेही मांडणार आहोत.प्रश्न : भाजपाच्या पाच वर्षातील कार्यकाळाचे मूल्यमापन लोकप्रतिनिधी आणि प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून तुम्ही कसे कराल?आ.के.सी.पाडवी : भाजपाच्या पाच वर्षातील कार्यकाळात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात कोणतेही भरीव काम झालेले नाही. ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली, कार्यादेश दिलेली विकास कामेच या पाच वर्षांत पूर्ण झाली आहेत. विद्यमान खासदार जुन्या कामांचे श्रेय स्वत: घेत आहेत. मात्र जनतेला सत्य माहिती आहे. त्यामुळे आम्ही आमच्या विकास कामांची माहितीच मतदारांपुढे नेणार आहोत. प्रमुख मुद्दा म्हणजे, वनविभागाच्या परवानगीसाठी अडून राहिलेली सिंचन, रस्ते आणि वीज प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न, त्याचा दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना झालेला लाभ, मुंबई ते दिल्लीपर्यंत केलेला पाठपुरावा हे सगळे जनतेपुढे असल्याने विरोधकांनी कितीही भूलथापा मारल्या तरी जनता काँग्रेसवर विश्वास ठेवेल, याची खात्री आहे. प्रश्न: नंदुरबार आणि कॉंग्रेसचे ऋणानुबंध या मुद्यावर भर राहील ?आमदार के.सी.पाडवी : निश्चितच. आदिवासी जनतेने माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्यावर अलोट प्रेम केले. गांधी परिवार आणि कॉंग्रेस पक्षाने आदिवासी जनता आणि येथील मतदारांना भरपूर काही दिले. या ऋणानुबंधाला पुन्हा उजाळा दिला जाईल.

टॅग्स :nandurbar-pcनंदुरबार