शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

३० कोटींचा निधी शासन समर्पित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेला मिळालेला ३० कोटींचा निधी अखर्चित असल्याने तो शासन समर्पित होणार आहे. परंतु ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेला मिळालेला ३० कोटींचा निधी अखर्चित असल्याने तो शासन समर्पित होणार आहे. परंतु खर्चासाठी मुदत वाढवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद सीईओ विनय गौडा यांनी बैठकीत दिली.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी, सभापती अभिजीत पाटील, रतन पाडवी, निर्मला राऊत, जयश्री पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते. बैठकीत जिल्हा परिषदेच्या अखर्चित निधीबाबत विषय चर्चेला आला. यंदा विविध निवडणुकांच्या आचारसंहिता व इतर कारणांमुळे ३० कोटींचा निधी अखर्चीत राहिला आहे. तो शासन समर्पित होणार असल्याची माहिती कॅफो अतुल गायकवाड यांनी दिली. त्यावर सदस्यांनी आक्षेप घेतला असता मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी शासनाकडे हा निधी खर्च करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.गेल्या सभेत तीन ठराव कुणाच्या संमतीने झाले अशी विचारणा करून त्याला विजय पराडके व अर्चना गावीत यांनी विरोध केला. गेल्या सभेत ९ ते ११ क्रमांकाचे ठराव झाले आहेत. ते कोणाच्या स्वाक्षरीने झाले त्याची माहिती मिळावी, प्रोसेडिंगची प्रत देण्यात यावी अशी मागणी या सदस्यांनी केली.आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. अशा काळात तक्रारी येणे योग्य नाही असे अध्यक्षा सीमा वळवी यांनी सांगितले. भरत गावीत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्ण कल्याण समितींची पुनर्रचना तातडीने करावी अशी मागणी केली. सी.के.पाडवी यांनी तेलखेडी आरोग्य केंद्रात सात महिन्यापासून डॉक्टर नाही, वडफळीचीही तीच स्थिती आहे. राजबर्डी आरोग्य केंद्र बंद असल्याची बातमी वृत्तपत्रात येते याबाबत काय कारवाई केली याची माहिती त्यांनी मागितली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी.बोडके यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून अहवाल मागवतो, राजबर्डीचा अहवाल आला असल्याचे डॉ.बोडके यांनी यावेळी स्पष्ट केले.बैठकीत पाणी टंचाई, कोरोनावर उपाययोजना यासह इतर विषयांवर देखील चर्चा झाली.