शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

२७ हजार शेतकरी खरीप कर्जाला मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 11:54 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे शेतीची अर्थव्यवस्था कोलमडली असतांना अशा संकटाच्या काळात जिल्ह्यातील सुमारे २७ ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे शेतीची अर्थव्यवस्था कोलमडली असतांना अशा संकटाच्या काळात जिल्ह्यातील सुमारे २७ हजार ५०० शेतकरी शासनाच्या आश्वासनाला बळी ठरून यंदाच्या खरीप कर्जालाही मुकणार आहेत. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम घ्यावा कसा या विवंचनेत हे शेतकरी आहेत.राज्य शासनाने मोठी गाजा वाजा करून गेल्या वर्षी कर्ज माफीची घोषणा केली होती. या कर्जमाफीत जिल्ह्यातील २७ हजार ५०४ शेतकरी पात्र ठरले होते. त्यांची यादी पोर्टलवरही जाहीर करण्यात आली. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असतांना जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामुळे या आचार संहितेच्या कारणाने कर्जमाफीची पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे आचार संहिता लांबल्याने कर्जमाफीची प्रक्रियाही रेंगाळली. याच काळात कोरोनाचे संकट उभे ठाकले त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनची स्थिती आहे.सध्या खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना सुरूवात केली आहे. अनेकांनी कापूस लागवडीची तयारीही केली आहे. त्यासाठी खरीप कर्जाची प्रक्रिया बँकांनी सुरू केली आहे. मात्र कर्जमाफी घोषित झालेले २७ हजार शेतकरी अद्यापही शासनाच्या दप्तरात कर्जदार आहेत.यासंदर्भात मंत्री मंडळाच्या बैठकीत कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांना थकबाकीदार न समजता त्यांना बँकांनी कर्ज द्यावे, अशी शिफारस करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्याची कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यामुळे कर्जमाफीचे पात्र शेतकरी केवळ बँकांच्या चकरा मारत आहेत. त्यांना खरीप कर्ज मिळत नसल्याने खरीपाची तयारी करावी कशी असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. कोरोनामुळे आधीच शेतकरी देशोधडीला लागत आहे. गेल्या वर्षाचा कापूस व इतर धान्य माल अजून घरातच पडून आहे. विक्रीसाठी अनेक अडथळे येत आहेत. बागायतदार शेतकºयांचे हालही अधिकच वाईट आहे. केळी व पपई खरेदीसाठी वेळेवर व्यापारी येत नसल्याने निम्मा माल शेतातच सडला.व्यापारी मिळाले पण भाव नसल्याने ही शेतीदेखील तोट्याची ठरली. अशा स्थितीत कर्जमाफीबाबतही अनिश्चितता निर्माण होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे.जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असले तरी त्यांची कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने बँकांच्या यादीत अद्यापही ते थकबाकीदार आहेत. या शेतकºयांना कर्ज देण्याबाबत बँकांकडून रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव गेले असले तरी तांत्रिक अडचणींमुळे अद्यापतरी त्याबाबतचे कुठलेही आदेश बँकांना नाही. तसे आदेश आल्यास कर्जमाफीतील शेतकºयांना कर्ज देता येईल. इतर शेतकºयांना मात्र कर्जदेणे सुरू आहे.-धीरज चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा बँक धुळे.२१५ कोटींचे कर्ज माफजिल्ह्यातील कर्जमाफीच्या यादीत २७,५०४ शेतकरी पात्र आहेत. त्यातील १३,१९१ शेतकºयांना विविध १३ बँकांनी कर्ज दिले आहे तर जिल्हा बँकेने १४,३१३ शेतकºयांना कर्ज दिले आहे. या सर्व शेतकºयांना एकुण २१५ कोटी सात लाख रुपयांचे कर्ज माफीचा फायदा होणार आहे.