शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
3
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
4
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
5
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
6
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
7
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
8
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
9
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
10
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
11
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
12
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
13
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
15
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
16
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
17
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
18
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
19
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
20
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

२७ हजार शेतकरी खरीप कर्जाला मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 11:54 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे शेतीची अर्थव्यवस्था कोलमडली असतांना अशा संकटाच्या काळात जिल्ह्यातील सुमारे २७ ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे शेतीची अर्थव्यवस्था कोलमडली असतांना अशा संकटाच्या काळात जिल्ह्यातील सुमारे २७ हजार ५०० शेतकरी शासनाच्या आश्वासनाला बळी ठरून यंदाच्या खरीप कर्जालाही मुकणार आहेत. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम घ्यावा कसा या विवंचनेत हे शेतकरी आहेत.राज्य शासनाने मोठी गाजा वाजा करून गेल्या वर्षी कर्ज माफीची घोषणा केली होती. या कर्जमाफीत जिल्ह्यातील २७ हजार ५०४ शेतकरी पात्र ठरले होते. त्यांची यादी पोर्टलवरही जाहीर करण्यात आली. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असतांना जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामुळे या आचार संहितेच्या कारणाने कर्जमाफीची पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे आचार संहिता लांबल्याने कर्जमाफीची प्रक्रियाही रेंगाळली. याच काळात कोरोनाचे संकट उभे ठाकले त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनची स्थिती आहे.सध्या खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना सुरूवात केली आहे. अनेकांनी कापूस लागवडीची तयारीही केली आहे. त्यासाठी खरीप कर्जाची प्रक्रिया बँकांनी सुरू केली आहे. मात्र कर्जमाफी घोषित झालेले २७ हजार शेतकरी अद्यापही शासनाच्या दप्तरात कर्जदार आहेत.यासंदर्भात मंत्री मंडळाच्या बैठकीत कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांना थकबाकीदार न समजता त्यांना बँकांनी कर्ज द्यावे, अशी शिफारस करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्याची कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यामुळे कर्जमाफीचे पात्र शेतकरी केवळ बँकांच्या चकरा मारत आहेत. त्यांना खरीप कर्ज मिळत नसल्याने खरीपाची तयारी करावी कशी असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. कोरोनामुळे आधीच शेतकरी देशोधडीला लागत आहे. गेल्या वर्षाचा कापूस व इतर धान्य माल अजून घरातच पडून आहे. विक्रीसाठी अनेक अडथळे येत आहेत. बागायतदार शेतकºयांचे हालही अधिकच वाईट आहे. केळी व पपई खरेदीसाठी वेळेवर व्यापारी येत नसल्याने निम्मा माल शेतातच सडला.व्यापारी मिळाले पण भाव नसल्याने ही शेतीदेखील तोट्याची ठरली. अशा स्थितीत कर्जमाफीबाबतही अनिश्चितता निर्माण होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे.जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असले तरी त्यांची कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने बँकांच्या यादीत अद्यापही ते थकबाकीदार आहेत. या शेतकºयांना कर्ज देण्याबाबत बँकांकडून रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव गेले असले तरी तांत्रिक अडचणींमुळे अद्यापतरी त्याबाबतचे कुठलेही आदेश बँकांना नाही. तसे आदेश आल्यास कर्जमाफीतील शेतकºयांना कर्ज देता येईल. इतर शेतकºयांना मात्र कर्जदेणे सुरू आहे.-धीरज चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा बँक धुळे.२१५ कोटींचे कर्ज माफजिल्ह्यातील कर्जमाफीच्या यादीत २७,५०४ शेतकरी पात्र आहेत. त्यातील १३,१९१ शेतकºयांना विविध १३ बँकांनी कर्ज दिले आहे तर जिल्हा बँकेने १४,३१३ शेतकºयांना कर्ज दिले आहे. या सर्व शेतकºयांना एकुण २१५ कोटी सात लाख रुपयांचे कर्ज माफीचा फायदा होणार आहे.