शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नंदुरबारातील 254 शाळा क्रीडांगणाच्या प्रतिक्षेत

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: December 29, 2017 13:19 IST

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे राज्य शासनाकडून चला खेळूया, अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय आदी विविध क्रीडा उपक्रमांचा गवगवा करण्यात येत आह़े परंतु प्रत्यक्षात मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील तब्बल 254 शाळांना क्रीडांगणच नसल्याचे समोर आले आह़े त्यामुळे एकीकडे मराठी शाळांमध्ये क्रीडांगण नसताना नवनवीन उपक्रमांचा उदोउदो कशासाठी असा ...

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे राज्य शासनाकडून चला खेळूया, अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय आदी विविध क्रीडा उपक्रमांचा गवगवा करण्यात येत आह़े परंतु प्रत्यक्षात मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील तब्बल 254 शाळांना क्रीडांगणच नसल्याचे समोर आले आह़े त्यामुळे एकीकडे मराठी शाळांमध्ये क्रीडांगण नसताना नवनवीन उपक्रमांचा उदोउदो कशासाठी असा प्रश्न आता पालकांकडून विचारण्यात येत आह़े जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची सख्या एकूण 1 हजार 393 इतकी आह़े त्यापैकी 235 शाळांना क्रीडांगण नसल्याची माहिती आह़े तर, दुसरीकडे माध्यमिक विभागाच्या एकूण 406 शाळांपैकी 19 शाळांना क्रीडांगण नसल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ़ राहुल चौधरी यांनी सांगितल़े त्यामुळे जिल्ह्यातील 254 मराठी शाळांना आपल्या हक्काचे क्रीडांगण नसल्याने अंगी प्रतिभा असूनही येथील खेळाडूंना भौतिक सुविधांअभावी आपल्या डोळ्यातील स्वपA पुर्ण करण्यास अडचणी येत आह़े प्राथमिक शिक्षण, क्रीडा यापासूनच भाविष्यातील खेळाडू, सशक्त पिढीची निर्मिती होत असत़े परंतु शिक्षणाच्या पहिल्या पायरीवरच विद्याथ्र्याना आवश्यक भौतिक सोयी-सुविधा मिळत नसल्याने यातून भावी पिढी कशी काय निर्माण होणार असा प्रश्न उपस्थित होत आह़े क्रीडांगण नसल्यामुळे अनेक होतकरु विद्याथ्र्याना आपल्या आवडीच्या खेळांचा आनंद घेता येत नाही़ अनेक खेळाडून शाळेपासून कोसोदुर क्रीडांगणाच्या शोधात फिरत असतात़ त्यामुळे त्यांची यातून मोठी हेडसांडही होत असत़े उपक्रमांचा होतेय उदोउदोराज्य शासनाकडून चला खेळूया, अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत़ परंतु एकीकडे जिल्ह्यातील 254 शाळा व शेकडो विद्यार्थी कुठलाही  क्रीडा प्रकार खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रीडांगणापासूनच वंचित रहावे लागत  असताना नवनवीन उपक्रमांचा उदोउदो कशासाठी? असा प्रश्न विचारत आहेत़ जिल्ह्यात मोठय़ा संख्येने आदिवासी विद्यार्थी आहेत़ आधिच जेमतेम शिक्षणाचा खर्च उचलने त्यांना शक्य होत असत़े त्यामुळे  मराठी शाळांमध्येच प्रवेश घेण्याची त्यांची क्षमता असत़े खाजगी शाळांचा शुल्क, डोनेशन त्यांना परवडणारा नसतो़ शासनाचे उपक्रम हे खाजगी शाळांमध्ये राबविणे शक्य असल्याने मराठी शाळेतील विद्यार्थी मात्र या उपक्रमांपासून काही अंशी वंचितच म्हणावा लागेल़ त्यामुळे मराठी शाळांमधील विद्याथ्र्याच्या कलागुणांना वाव मिळत नाही़शेतशिवारात होतोय सराव.जिल्ह्यातील अनेक होतकरु विद्याथ्र्यी विविध खेळात पारंगत आहेत़ परंतु क्रीडांगणाअभावी त्यांना विविध खेळांचा सराव करणेही शक्य होत नाही़ त्यामुळे ते शेतशिवारातच आपल्या खेळाचा सराव करताना दिसून येत असतात़ नंदुरबार जिल्ह्यातील अनेक खेळाडू प्रतिभासंपन्न आहेत़ याआधिही जिल्ह्यातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या क्रीडा कौशल्यामुळे त्यांनी नावलौकिक मिळवले आह़े परंतु अजूनही पाहिजे त्या प्रमाणात भौतिक सुविधा मिळत नसल्याने याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची आवश्यकता आह़े