शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

नंदुरबारातील 254 शाळा क्रीडांगणाच्या प्रतिक्षेत

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: December 29, 2017 13:19 IST

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे राज्य शासनाकडून चला खेळूया, अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय आदी विविध क्रीडा उपक्रमांचा गवगवा करण्यात येत आह़े परंतु प्रत्यक्षात मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील तब्बल 254 शाळांना क्रीडांगणच नसल्याचे समोर आले आह़े त्यामुळे एकीकडे मराठी शाळांमध्ये क्रीडांगण नसताना नवनवीन उपक्रमांचा उदोउदो कशासाठी असा ...

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे राज्य शासनाकडून चला खेळूया, अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय आदी विविध क्रीडा उपक्रमांचा गवगवा करण्यात येत आह़े परंतु प्रत्यक्षात मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील तब्बल 254 शाळांना क्रीडांगणच नसल्याचे समोर आले आह़े त्यामुळे एकीकडे मराठी शाळांमध्ये क्रीडांगण नसताना नवनवीन उपक्रमांचा उदोउदो कशासाठी असा प्रश्न आता पालकांकडून विचारण्यात येत आह़े जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची सख्या एकूण 1 हजार 393 इतकी आह़े त्यापैकी 235 शाळांना क्रीडांगण नसल्याची माहिती आह़े तर, दुसरीकडे माध्यमिक विभागाच्या एकूण 406 शाळांपैकी 19 शाळांना क्रीडांगण नसल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ़ राहुल चौधरी यांनी सांगितल़े त्यामुळे जिल्ह्यातील 254 मराठी शाळांना आपल्या हक्काचे क्रीडांगण नसल्याने अंगी प्रतिभा असूनही येथील खेळाडूंना भौतिक सुविधांअभावी आपल्या डोळ्यातील स्वपA पुर्ण करण्यास अडचणी येत आह़े प्राथमिक शिक्षण, क्रीडा यापासूनच भाविष्यातील खेळाडू, सशक्त पिढीची निर्मिती होत असत़े परंतु शिक्षणाच्या पहिल्या पायरीवरच विद्याथ्र्याना आवश्यक भौतिक सोयी-सुविधा मिळत नसल्याने यातून भावी पिढी कशी काय निर्माण होणार असा प्रश्न उपस्थित होत आह़े क्रीडांगण नसल्यामुळे अनेक होतकरु विद्याथ्र्याना आपल्या आवडीच्या खेळांचा आनंद घेता येत नाही़ अनेक खेळाडून शाळेपासून कोसोदुर क्रीडांगणाच्या शोधात फिरत असतात़ त्यामुळे त्यांची यातून मोठी हेडसांडही होत असत़े उपक्रमांचा होतेय उदोउदोराज्य शासनाकडून चला खेळूया, अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत़ परंतु एकीकडे जिल्ह्यातील 254 शाळा व शेकडो विद्यार्थी कुठलाही  क्रीडा प्रकार खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रीडांगणापासूनच वंचित रहावे लागत  असताना नवनवीन उपक्रमांचा उदोउदो कशासाठी? असा प्रश्न विचारत आहेत़ जिल्ह्यात मोठय़ा संख्येने आदिवासी विद्यार्थी आहेत़ आधिच जेमतेम शिक्षणाचा खर्च उचलने त्यांना शक्य होत असत़े त्यामुळे  मराठी शाळांमध्येच प्रवेश घेण्याची त्यांची क्षमता असत़े खाजगी शाळांचा शुल्क, डोनेशन त्यांना परवडणारा नसतो़ शासनाचे उपक्रम हे खाजगी शाळांमध्ये राबविणे शक्य असल्याने मराठी शाळेतील विद्यार्थी मात्र या उपक्रमांपासून काही अंशी वंचितच म्हणावा लागेल़ त्यामुळे मराठी शाळांमधील विद्याथ्र्याच्या कलागुणांना वाव मिळत नाही़शेतशिवारात होतोय सराव.जिल्ह्यातील अनेक होतकरु विद्याथ्र्यी विविध खेळात पारंगत आहेत़ परंतु क्रीडांगणाअभावी त्यांना विविध खेळांचा सराव करणेही शक्य होत नाही़ त्यामुळे ते शेतशिवारातच आपल्या खेळाचा सराव करताना दिसून येत असतात़ नंदुरबार जिल्ह्यातील अनेक खेळाडू प्रतिभासंपन्न आहेत़ याआधिही जिल्ह्यातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या क्रीडा कौशल्यामुळे त्यांनी नावलौकिक मिळवले आह़े परंतु अजूनही पाहिजे त्या प्रमाणात भौतिक सुविधा मिळत नसल्याने याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची आवश्यकता आह़े