शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय शेतकरी कार्यकर्ता संमेलनासाठी २३ सत्यशोधक शेतकरी दिल्लीला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST

केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन शेतकरीविरोधी कायद्यांमुळे शेती उद्योग तसेच पशुपालन व एकूणच शेतीशी संबंधित उद्योग हे देशातील व ...

केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन शेतकरीविरोधी कायद्यांमुळे शेती उद्योग तसेच पशुपालन व एकूणच शेतीशी संबंधित उद्योग हे देशातील व विदेशातील भांडवलदारांचे शिकार होणार आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना कृषी माल विकण्यास बंधने येणार आहेत. शेतकऱ्यांना तोटा व भांडवलदारांना फायदा होऊन शेतकरी कर्जबाजारी होतील. शेतकऱ्यांकडून शेतजमिनी काढून घेऊन पूर्ण शेती व्यवसायालाच या कायद्यांमुळे धोका निर्माण होणार असून, या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी कृषीविरोधी तिन्ही कायदे रद्द करावेत, सीटू ५०% निर्धारित एमपीएस गॅरंटी कायदा करावा, नवीन वीज कायदा, जो कृषी आणि ग्रामीण भागातील अनुदानित विजेचा हक्क शेतकऱ्यांकडून हिरावत आहे, तो रद्द करण्यात यावा, एनसीआर व वायू गुणवत्ता प्रबंधन कायदा, २०२१ रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

या दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन दिल्ली येथील सिंघू बाॅर्डरवर केले आहे. या कार्यकर्ता संमेलनासाठी धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे येथून सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, श्रमिक शेतकरी संघटना, धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त संघटना इ. संघटनांचे किशोर ढमाले, रामा गावित, विक्रम गावित, करणसिंग कोकणी, मनोहर वळवी, चिंतामण पाडवी, रविदास वळवी, कांतीलाल गावित, देवीदास पाडवी, प्रभाकर गावित, बाल्या गावित हे कार्यकर्ते रवाना झाले आहेत. सत्यशोधक शेतकरी सभा राज्य अध्यक्ष रामसिंग गावित यांच्या उपस्थितीत विसरवाडी, ता. नवापूर येथे कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास रणजित गावित, दिलीप गावित, सुनील गावित, बलमा गावित, सोन्या कोकणी, रमेश गावित यांची प्रमुख उपस्थिती होती.